शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

कोरोनामुक्त रुग्णांच्या उपचाराकरिता रुग्णालय उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांना उपचारानंतर इतर आजाराच्या उपचाराकरिता स्वतंत्र रुग्णालये असावित किंवा प्रत्येक तालुका स्तरावर सर्व सुविधा ...

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांना उपचारानंतर इतर आजाराच्या उपचाराकरिता स्वतंत्र रुग्णालये असावित किंवा प्रत्येक तालुका स्तरावर सर्व सुविधा असलेल्या खासगी रुग्णालयात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना दाखल करून घ्यावे़, तसेच तेथे उपचाराची व्यवस्था करण्याची मागणी मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रशांत परांजपे यांनी केली आहे़ रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बोलून निर्णय कळवतो, असे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले़

कोरोना बाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करून उपचारानंतर घरी सोडले जाते. रुग्णालयामधून घरी सोडल्यावर सात दिवसांचा क्वाॅरंटिन काळ असतो. नंतर तो रुग्ण पूर्णतः निगेटिव्ह समजला जातो; मात्र नियमानुसार रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यापासून एक महिना कोणत्याही खासगी रुग्णालयात (त्या रुग्णाचा क्वाॅरंटिन काळ संपला तरीही) उपचाराकरिता दाखल करता येत नाही, असे परांजपे यांनी सांगितले़

कोरोनामुक्त झालेल्या किंवा क्वाॅरंटिन काळ संपलेल्या एखाद्या रुग्णाला अचानक काही इतर आजार बळावल्यास कोणत्याही खासगी रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करता येत नाही. प्रसंगी व्यवस्था असूनही कायद्याने हात बांधले असल्याने एखाद्या रुग्णाला वेळेत उपचार मिळत नाहीत आणि प्रसंगी प्राणही गमवावे लागत आहेत. त्यामुळे काेराेनामुक्त रुग्णांच्या उपचाराकरिता रुग्णालय उभारावे, अशी मागणी परांजपे यांनी केली़