शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

बजेट कोलमडलेलेच

By admin | Updated: September 14, 2014 23:54 IST

आठवड्यात दर दुप्पट : भाज्यांचे दर अजूनही महाग

रत्नागिरी : दररोजच्या आहारात भाजीपाला शिजवला जातो. परंतु भाजीपाल्याचे दर पुन्हा कडाडल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मटारच्या दराने तर उच्चांक गाठला आहे. २०० रूपये किलो दराने मटारची विक्री सुरू आहे. गेल्या आठवड्यात २० रूपये किलो दराने टोमॅटो विक्री सुरू होती. मात्र, या आठवड्यात त्याच टोमॅटोचा दर दुप्पट झाला आहे. ४० रूपये किलो दराने टोमॅटोची विक्री सुरू आहे.आहारात पालेभाज्या किंवा भाज्यांचा प्रामुख्याने वापर करण्याची आवश्यकता असताना भाज्यांचे दर मात्र कमालीचे वाढले आहेत. कोबी ३० रूपये, वांगी ४० रूपये, सिमला मिरची ६० रूपये, फरसबी ६० रूपये, गवार ६० रूपये, फ्लॉवर ५० रूपये, हिरवी मिरची ६० रूपये, भेंडी ७० रूपये, काकडी ४० रूपये, बीट ४० रूपये, गाजर ६० रूपये, घेवडा ६० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. पालेभाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. मेथी, पालक, शेपू, चवळी, माठ जूडी १५ रूपये दराने विकण्यात येत आहेत. कोथिंबीर जूडी २० रूपये दराने विकण्यात येत आहे.गावठी भाज्यादेखील बाजारात विक्रीस येऊ लागल्या आहेत. भोपळ्याची शेड १० ते १५ रूपये दराने विकण्यात येत आहे. दोडके, पडवळ यांची २० ते २५ रूपये नग दराने विक्री सुरू आहे. दुधी भोपळा ३० ते ३५ रूपये दराने विकले जात आहेत. शिवाय छोट्या काकड्यांची २० रूपये वाटाप्रमाणे विक्री सुरू आहे. मोठ्या काकड्या ४० रूपयांपासून १२० रूपयांपर्यंत विकण्यात येत आहेत. ग्रामीण भागातून महिला गावठी भाज्या विक्रीला आणतात. त्यामुळे शहरातील नाकानाक्यावर भाजी विके्रत्या दिसून येत आहेत. भेंडीची १५ रूपयाने ३ जुड्या विकण्यात येत आहेत.मटारच्या दराने उच्चांक गाठला आहे. ५० रूपये पाव किलो दराने मटार विकण्यात येत आहेत. कोवळा मटार असून, दरही वधारलेला आहे. बहुतांश ग्राहक फ्रोजन मटार खरेदी करत आहेत. टोमॅटोचा वापर नियमित केला जातो. ४० रूपये किलो दराने टोमॅटो विक्री सुरू आहे. भाज्यांच्या दरात वाढ झाल्याने गृहिणी वर्गाचे हाल होत आहेत.गत आठवड्यात २० रूपये किलो दराने विक्री होती. परंतु या आठवड्यात दुप्पट वाढ झाली आहे. कांदा ३० ते ४० रूपये, तर बटाटा ४० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)सामान्यांवर परिणाम भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याने सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले.आठवड्यात दुपटीने दर वाढले.एकदम दर वाढण्याचे कारण गुलदस्त्यात.पालेभाज्या महागल्या तर करायचे काय हा गृहिणींसमोर प्रश्न.कोबी, वांगी, फरसबी महाग.पितृपक्षात महागाईने केला कहर.ग्रामीण भागातून महिला येतात काकड्या चिबूड घेऊन गावठी भाज्यांना मागणी वाढतेय .मटार २०० रूपये किलोटोमॅटो ४० रूपये किलो