शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

बजेट कोलमडलेलेच

By admin | Updated: September 14, 2014 23:54 IST

आठवड्यात दर दुप्पट : भाज्यांचे दर अजूनही महाग

रत्नागिरी : दररोजच्या आहारात भाजीपाला शिजवला जातो. परंतु भाजीपाल्याचे दर पुन्हा कडाडल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मटारच्या दराने तर उच्चांक गाठला आहे. २०० रूपये किलो दराने मटारची विक्री सुरू आहे. गेल्या आठवड्यात २० रूपये किलो दराने टोमॅटो विक्री सुरू होती. मात्र, या आठवड्यात त्याच टोमॅटोचा दर दुप्पट झाला आहे. ४० रूपये किलो दराने टोमॅटोची विक्री सुरू आहे.आहारात पालेभाज्या किंवा भाज्यांचा प्रामुख्याने वापर करण्याची आवश्यकता असताना भाज्यांचे दर मात्र कमालीचे वाढले आहेत. कोबी ३० रूपये, वांगी ४० रूपये, सिमला मिरची ६० रूपये, फरसबी ६० रूपये, गवार ६० रूपये, फ्लॉवर ५० रूपये, हिरवी मिरची ६० रूपये, भेंडी ७० रूपये, काकडी ४० रूपये, बीट ४० रूपये, गाजर ६० रूपये, घेवडा ६० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. पालेभाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. मेथी, पालक, शेपू, चवळी, माठ जूडी १५ रूपये दराने विकण्यात येत आहेत. कोथिंबीर जूडी २० रूपये दराने विकण्यात येत आहे.गावठी भाज्यादेखील बाजारात विक्रीस येऊ लागल्या आहेत. भोपळ्याची शेड १० ते १५ रूपये दराने विकण्यात येत आहे. दोडके, पडवळ यांची २० ते २५ रूपये नग दराने विक्री सुरू आहे. दुधी भोपळा ३० ते ३५ रूपये दराने विकले जात आहेत. शिवाय छोट्या काकड्यांची २० रूपये वाटाप्रमाणे विक्री सुरू आहे. मोठ्या काकड्या ४० रूपयांपासून १२० रूपयांपर्यंत विकण्यात येत आहेत. ग्रामीण भागातून महिला गावठी भाज्या विक्रीला आणतात. त्यामुळे शहरातील नाकानाक्यावर भाजी विके्रत्या दिसून येत आहेत. भेंडीची १५ रूपयाने ३ जुड्या विकण्यात येत आहेत.मटारच्या दराने उच्चांक गाठला आहे. ५० रूपये पाव किलो दराने मटार विकण्यात येत आहेत. कोवळा मटार असून, दरही वधारलेला आहे. बहुतांश ग्राहक फ्रोजन मटार खरेदी करत आहेत. टोमॅटोचा वापर नियमित केला जातो. ४० रूपये किलो दराने टोमॅटो विक्री सुरू आहे. भाज्यांच्या दरात वाढ झाल्याने गृहिणी वर्गाचे हाल होत आहेत.गत आठवड्यात २० रूपये किलो दराने विक्री होती. परंतु या आठवड्यात दुप्पट वाढ झाली आहे. कांदा ३० ते ४० रूपये, तर बटाटा ४० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)सामान्यांवर परिणाम भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याने सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले.आठवड्यात दुपटीने दर वाढले.एकदम दर वाढण्याचे कारण गुलदस्त्यात.पालेभाज्या महागल्या तर करायचे काय हा गृहिणींसमोर प्रश्न.कोबी, वांगी, फरसबी महाग.पितृपक्षात महागाईने केला कहर.ग्रामीण भागातून महिला येतात काकड्या चिबूड घेऊन गावठी भाज्यांना मागणी वाढतेय .मटार २०० रूपये किलोटोमॅटो ४० रूपये किलो