शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सरकारने कंपनीचे दायित्व स्वीकारावे, या मागणीसाठी बीएसएनएलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST

रत्नागिरी : केंद्र सरकारने बी. एस. एन. एल.चे दायित्व स्वीकारावे, या मागणीसाठी भारतीय दूरसंचार निगमचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी ...

रत्नागिरी : केंद्र सरकारने बी. एस. एन. एल.चे दायित्व स्वीकारावे, या मागणीसाठी भारतीय दूरसंचार निगमचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी शुक्रवारी देशभरात निदर्शने केली. रत्नागिरीतील कार्यालयासमोरही ही निदर्शने करण्यात आली.

सध्या बी. एस. एन. एल. व एम. टी. एन. एल. यांची अवस्था बिकट असून, कमी प्रमाणात असणारे मनुष्यबळ हे मुख्य कारण आहे. सुमारे सत्तर हजार म्हणजे ६० टक्के कर्मचारी घरी जाऊनही या कंपनीची आर्थिक स्थिती सुधारत नसल्याने, उर्वरित ४० टक्के कर्मचारी व अधिकारी यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही धोबीपछाड थांबवावी, याकरिता कर्मचारी, अधिकारी पुन्हा एकदा मैदानात उतरले असून, शुक्रवारी देशभर निदर्शने करण्यात आली. सर्व संघटना कर्मचारी, अधिकारी महासंघ यांनी कोरोना नियम पाळून ही निदर्शने केली होती. यात प्रामुख्याने वेळेत वेतन मिळावे, तिसऱ्या पे रिवजनची अमलबजावणी तत्काळ करावी, बी. एस. एन. एल. मार्केटमध्ये स्पर्धा करेल म्हणून फोर जी यंत्रणा तत्काळ बसवावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. याचे नेतृत्व अधिकारी महासंघाचे नेते महादेव अडसूळ यांनी केले.

बीएसएनलचे संचार निगम एक्झक्युटिव्ह असोसिएशनचे सचिव नंदू कदम यांनी सांगितले की, सरकारी दूरसंचार विभाग सध्या बी. एस. एन. एल. व एम. टी. एन. एल. म्हणून ओळखला जातो. खासगी दूरसंचार कंपन्यांच्या शिरकावाने हा विभाग आजारी झाला असून, केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने तो अधिकच आजारी झाला आहे. या दोन्ही विभागांनी नुकतीच भरीव कामगार कपात करूनही दोन्ही उद्योग समूहांची उभारणी पुन्हा मजबूत होईल, ही आशा फारशी नसल्याचे सध्या तरी चित्र आहे. यामध्ये कामगार संघटन अधिक प्रभावी झाल्याचे दिसून येत आहे, असे ते म्हणाले.

मुंबई येथे प्रतिनिधीबरोबर बोलताना अधिकारी महासंघाचे नेते महादेव अडसूळ यांनी या सर्व मागण्यांचे सविस्तर विश्लेषण केले आहे. फोर जी सेवेमुळे बी. एस. एन. एल.च्या उत्पादनात भरीव वाढ होणार असून, बीएसएनएलचे दातृत्व सरकारने दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे म्हटले आहे. कामगार व अधिकारी यांचे वेतन दरमहा निर्धारित वेळेत करावे, सध्या कोरोना महामारी चालू असून, सुमारे दोन महिने वेतन मिळत नसल्याने कर्मचारी, अधिकारी व बीएसएनएलचे ठेकेदार कर्मचारी यांची मोठी उपासमार होत आहे. सरकारने बीएसएनएलच्या दातृत्वाची राष्ट्रीय संमती द्यावी, असेही ते पुढे म्हणाले. सरकारने तातडीने यावर तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.