शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सरकारने कंपनीचे दायित्व स्वीकारावे, या मागणीसाठी बीएसएनएलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST

रत्नागिरी : केंद्र सरकारने बी. एस. एन. एल.चे दायित्व स्वीकारावे, या मागणीसाठी भारतीय दूरसंचार निगमचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी ...

रत्नागिरी : केंद्र सरकारने बी. एस. एन. एल.चे दायित्व स्वीकारावे, या मागणीसाठी भारतीय दूरसंचार निगमचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी शुक्रवारी देशभरात निदर्शने केली. रत्नागिरीतील कार्यालयासमोरही ही निदर्शने करण्यात आली.

सध्या बी. एस. एन. एल. व एम. टी. एन. एल. यांची अवस्था बिकट असून, कमी प्रमाणात असणारे मनुष्यबळ हे मुख्य कारण आहे. सुमारे सत्तर हजार म्हणजे ६० टक्के कर्मचारी घरी जाऊनही या कंपनीची आर्थिक स्थिती सुधारत नसल्याने, उर्वरित ४० टक्के कर्मचारी व अधिकारी यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही धोबीपछाड थांबवावी, याकरिता कर्मचारी, अधिकारी पुन्हा एकदा मैदानात उतरले असून, शुक्रवारी देशभर निदर्शने करण्यात आली. सर्व संघटना कर्मचारी, अधिकारी महासंघ यांनी कोरोना नियम पाळून ही निदर्शने केली होती. यात प्रामुख्याने वेळेत वेतन मिळावे, तिसऱ्या पे रिवजनची अमलबजावणी तत्काळ करावी, बी. एस. एन. एल. मार्केटमध्ये स्पर्धा करेल म्हणून फोर जी यंत्रणा तत्काळ बसवावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. याचे नेतृत्व अधिकारी महासंघाचे नेते महादेव अडसूळ यांनी केले.

बीएसएनलचे संचार निगम एक्झक्युटिव्ह असोसिएशनचे सचिव नंदू कदम यांनी सांगितले की, सरकारी दूरसंचार विभाग सध्या बी. एस. एन. एल. व एम. टी. एन. एल. म्हणून ओळखला जातो. खासगी दूरसंचार कंपन्यांच्या शिरकावाने हा विभाग आजारी झाला असून, केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने तो अधिकच आजारी झाला आहे. या दोन्ही विभागांनी नुकतीच भरीव कामगार कपात करूनही दोन्ही उद्योग समूहांची उभारणी पुन्हा मजबूत होईल, ही आशा फारशी नसल्याचे सध्या तरी चित्र आहे. यामध्ये कामगार संघटन अधिक प्रभावी झाल्याचे दिसून येत आहे, असे ते म्हणाले.

मुंबई येथे प्रतिनिधीबरोबर बोलताना अधिकारी महासंघाचे नेते महादेव अडसूळ यांनी या सर्व मागण्यांचे सविस्तर विश्लेषण केले आहे. फोर जी सेवेमुळे बी. एस. एन. एल.च्या उत्पादनात भरीव वाढ होणार असून, बीएसएनएलचे दातृत्व सरकारने दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे म्हटले आहे. कामगार व अधिकारी यांचे वेतन दरमहा निर्धारित वेळेत करावे, सध्या कोरोना महामारी चालू असून, सुमारे दोन महिने वेतन मिळत नसल्याने कर्मचारी, अधिकारी व बीएसएनएलचे ठेकेदार कर्मचारी यांची मोठी उपासमार होत आहे. सरकारने बीएसएनएलच्या दातृत्वाची राष्ट्रीय संमती द्यावी, असेही ते पुढे म्हणाले. सरकारने तातडीने यावर तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.