शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सरकारने कंपनीचे दायित्व स्वीकारावे, या मागणीसाठी बीएसएनएलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST

रत्नागिरी : केंद्र सरकारने बी. एस. एन. एल.चे दायित्व स्वीकारावे, या मागणीसाठी भारतीय दूरसंचार निगमचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी ...

रत्नागिरी : केंद्र सरकारने बी. एस. एन. एल.चे दायित्व स्वीकारावे, या मागणीसाठी भारतीय दूरसंचार निगमचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी शुक्रवारी देशभरात निदर्शने केली. रत्नागिरीतील कार्यालयासमोरही ही निदर्शने करण्यात आली.

सध्या बी. एस. एन. एल. व एम. टी. एन. एल. यांची अवस्था बिकट असून, कमी प्रमाणात असणारे मनुष्यबळ हे मुख्य कारण आहे. सुमारे सत्तर हजार म्हणजे ६० टक्के कर्मचारी घरी जाऊनही या कंपनीची आर्थिक स्थिती सुधारत नसल्याने, उर्वरित ४० टक्के कर्मचारी व अधिकारी यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही धोबीपछाड थांबवावी, याकरिता कर्मचारी, अधिकारी पुन्हा एकदा मैदानात उतरले असून, शुक्रवारी देशभर निदर्शने करण्यात आली. सर्व संघटना कर्मचारी, अधिकारी महासंघ यांनी कोरोना नियम पाळून ही निदर्शने केली होती. यात प्रामुख्याने वेळेत वेतन मिळावे, तिसऱ्या पे रिवजनची अमलबजावणी तत्काळ करावी, बी. एस. एन. एल. मार्केटमध्ये स्पर्धा करेल म्हणून फोर जी यंत्रणा तत्काळ बसवावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. याचे नेतृत्व अधिकारी महासंघाचे नेते महादेव अडसूळ यांनी केले.

बीएसएनलचे संचार निगम एक्झक्युटिव्ह असोसिएशनचे सचिव नंदू कदम यांनी सांगितले की, सरकारी दूरसंचार विभाग सध्या बी. एस. एन. एल. व एम. टी. एन. एल. म्हणून ओळखला जातो. खासगी दूरसंचार कंपन्यांच्या शिरकावाने हा विभाग आजारी झाला असून, केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने तो अधिकच आजारी झाला आहे. या दोन्ही विभागांनी नुकतीच भरीव कामगार कपात करूनही दोन्ही उद्योग समूहांची उभारणी पुन्हा मजबूत होईल, ही आशा फारशी नसल्याचे सध्या तरी चित्र आहे. यामध्ये कामगार संघटन अधिक प्रभावी झाल्याचे दिसून येत आहे, असे ते म्हणाले.

मुंबई येथे प्रतिनिधीबरोबर बोलताना अधिकारी महासंघाचे नेते महादेव अडसूळ यांनी या सर्व मागण्यांचे सविस्तर विश्लेषण केले आहे. फोर जी सेवेमुळे बी. एस. एन. एल.च्या उत्पादनात भरीव वाढ होणार असून, बीएसएनएलचे दातृत्व सरकारने दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे म्हटले आहे. कामगार व अधिकारी यांचे वेतन दरमहा निर्धारित वेळेत करावे, सध्या कोरोना महामारी चालू असून, सुमारे दोन महिने वेतन मिळत नसल्याने कर्मचारी, अधिकारी व बीएसएनएलचे ठेकेदार कर्मचारी यांची मोठी उपासमार होत आहे. सरकारने बीएसएनएलच्या दातृत्वाची राष्ट्रीय संमती द्यावी, असेही ते पुढे म्हणाले. सरकारने तातडीने यावर तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.