शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

केबल्स जाळल्याने बीएसएनएल ठप्प

By admin | Updated: April 17, 2017 18:54 IST

४०० ग्राहक, शासकीय कार्यालये, बँका यांनाही जोरदार फटका

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी , दि. १७ : : शहरानजीकच्या टीआरपी येथील ‘बीएसएनएल’ची केबल जाळल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. अज्ञात व्यक्तीने पेट्रोल किंवा डिझेल वापरून केबल्स जाळल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे या एक्सचेंजअंतर्गत येणाऱ्या ४०० ग्राहकांची दूरध्वनी सेवा ठप्प झाली आहे. शासकीय कार्यालये, बँका यांनाही याचा जोरदार फटका बसला असून, ही सेवा सुरळीत होण्यासाठी आणखी तीन दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले.टीआरपीजवळील पुलावर ‘बीएसएनएल’ एक्सचेंजअंतर्गत असणारी केबल अज्ञात व्यक्तीने जाळल्याची घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली. पावसाचे पाणी जाण्यासाठी या पुलावरील सिमेंटच्या लाद्यांना छिद्र ठेवण्यात आली आहेत. यातून पेट्रोल किंवा डिझेल ओतून हा प्रकार करण्यात आला असावा, असा संशय ‘बीएसएनएल’च्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.

यासंबंधी रविवारी रात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास ‘बीएसएनएल’कडे पहिली तक्रार करण्यात आली. त्यानंतर ग्राहकांच्या तक्रारींचे फोन खणखणू लागले. सोमवारी सकाळी हा प्रकार घडल्याचे लक्षात आले. ग्राहकांच्या सेवेबरोबरच शासकीय कार्यालये, बँका यांनाही याचा फटका बसला. साईनगर, कुवारबाव, गयाळवाडी, रेल्वे स्टेशन, पोलीस स्थानक या परिसरातील दूरध्वनी सेवा ठप्प झाली.

हे वृत्त कळताच सोमवारी सकाळी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी ‘बीएसएनएल’बरोबरच अन्य कंपन्यांच्याही केबल्स जळल्याचे निदर्शनास आले. १५ मीटर लांबीची केबल या आगीत जळून खाक झाली आहे.

आग लावण्यात आलेला परिसर तापल्याने कर्मचारी वर्गाला काम करण्यात अडथळा येत होता. कुणीतरी जाणूनबुजून हा प्रकार केल्याचे ‘बीएसएनएल’च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकाराबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात ‘बीएसएनएल’तर्फे तक्रार नोंदविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)