शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

केबल्स जाळल्याने बीएसएनएल ठप्प

By admin | Updated: April 17, 2017 18:54 IST

४०० ग्राहक, शासकीय कार्यालये, बँका यांनाही जोरदार फटका

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी , दि. १७ : : शहरानजीकच्या टीआरपी येथील ‘बीएसएनएल’ची केबल जाळल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. अज्ञात व्यक्तीने पेट्रोल किंवा डिझेल वापरून केबल्स जाळल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे या एक्सचेंजअंतर्गत येणाऱ्या ४०० ग्राहकांची दूरध्वनी सेवा ठप्प झाली आहे. शासकीय कार्यालये, बँका यांनाही याचा जोरदार फटका बसला असून, ही सेवा सुरळीत होण्यासाठी आणखी तीन दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले.टीआरपीजवळील पुलावर ‘बीएसएनएल’ एक्सचेंजअंतर्गत असणारी केबल अज्ञात व्यक्तीने जाळल्याची घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली. पावसाचे पाणी जाण्यासाठी या पुलावरील सिमेंटच्या लाद्यांना छिद्र ठेवण्यात आली आहेत. यातून पेट्रोल किंवा डिझेल ओतून हा प्रकार करण्यात आला असावा, असा संशय ‘बीएसएनएल’च्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.

यासंबंधी रविवारी रात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास ‘बीएसएनएल’कडे पहिली तक्रार करण्यात आली. त्यानंतर ग्राहकांच्या तक्रारींचे फोन खणखणू लागले. सोमवारी सकाळी हा प्रकार घडल्याचे लक्षात आले. ग्राहकांच्या सेवेबरोबरच शासकीय कार्यालये, बँका यांनाही याचा फटका बसला. साईनगर, कुवारबाव, गयाळवाडी, रेल्वे स्टेशन, पोलीस स्थानक या परिसरातील दूरध्वनी सेवा ठप्प झाली.

हे वृत्त कळताच सोमवारी सकाळी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी ‘बीएसएनएल’बरोबरच अन्य कंपन्यांच्याही केबल्स जळल्याचे निदर्शनास आले. १५ मीटर लांबीची केबल या आगीत जळून खाक झाली आहे.

आग लावण्यात आलेला परिसर तापल्याने कर्मचारी वर्गाला काम करण्यात अडथळा येत होता. कुणीतरी जाणूनबुजून हा प्रकार केल्याचे ‘बीएसएनएल’च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकाराबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात ‘बीएसएनएल’तर्फे तक्रार नोंदविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)