शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

राजापुरात इच्छुकांची भाऊगर्दी

By admin | Updated: July 17, 2014 23:52 IST

काँग्रेस पक्षाकडून राजन देसाई अग्रेसर

पाचल : काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्थानिक उमेदवारांसाठी आग्रह धरल्याने इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीकडे वरिष्ठ पातळीवर कोणती भूमिका घेणार याविषयी राजकीय वर्तुळात लक्ष लागून राहिले आहे.राजापूर - लांजा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून स्थानिक उमेदवार म्हणून प्रकाश वाघधरे, पांडुरंग उपळकर, तर लांजातून दत्ता कदम यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेस पक्षाकडून राजन देसाई याचे नावे अग्रेसर आहे. मात्र, आमदार राजन साळवी यांनी या मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवला असून, आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तसेच रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रमेश कीर यांनी या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.आमदार राजन साळवी राजापूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी या मतदारसंघातून पोटनिवडणुकीसह दोनवेळा निवडणूक लढवली आहे. त्यांच्या अगोदर रत्नागिरीचे आप्पा साळवी यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे यावेळी स्थानिक उमेदवार मिळावा, यासाठी लांजा - राजापूर तालुक्यातून मागणी केली जात आहे. राजन साळवी यांनी मुंबईस्थित राजापूरवासीयांना डावलून तालुक्यात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजापूर मतदारसंघात आतापासूनच इच्छुकांची संख्या वाढत असून, काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण तयार झाल्याने आता याबाबत कोण काय भूमिका घेणार, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीसाठी स्थानिक उमेदवाराची मागणी केल्याने वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची उमेदवार निवडीच्या वेळी डोकेदुखी वाढणार आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीबाबत वरिष्ठ कोणती भूमिका घेतात, याकडे राजापूर आणि लांजावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)