शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

राजापुरात इच्छुकांची भाऊगर्दी

By admin | Updated: July 17, 2014 23:52 IST

काँग्रेस पक्षाकडून राजन देसाई अग्रेसर

पाचल : काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्थानिक उमेदवारांसाठी आग्रह धरल्याने इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीकडे वरिष्ठ पातळीवर कोणती भूमिका घेणार याविषयी राजकीय वर्तुळात लक्ष लागून राहिले आहे.राजापूर - लांजा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून स्थानिक उमेदवार म्हणून प्रकाश वाघधरे, पांडुरंग उपळकर, तर लांजातून दत्ता कदम यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेस पक्षाकडून राजन देसाई याचे नावे अग्रेसर आहे. मात्र, आमदार राजन साळवी यांनी या मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवला असून, आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तसेच रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रमेश कीर यांनी या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.आमदार राजन साळवी राजापूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी या मतदारसंघातून पोटनिवडणुकीसह दोनवेळा निवडणूक लढवली आहे. त्यांच्या अगोदर रत्नागिरीचे आप्पा साळवी यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे यावेळी स्थानिक उमेदवार मिळावा, यासाठी लांजा - राजापूर तालुक्यातून मागणी केली जात आहे. राजन साळवी यांनी मुंबईस्थित राजापूरवासीयांना डावलून तालुक्यात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजापूर मतदारसंघात आतापासूनच इच्छुकांची संख्या वाढत असून, काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण तयार झाल्याने आता याबाबत कोण काय भूमिका घेणार, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीसाठी स्थानिक उमेदवाराची मागणी केल्याने वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची उमेदवार निवडीच्या वेळी डोकेदुखी वाढणार आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीबाबत वरिष्ठ कोणती भूमिका घेतात, याकडे राजापूर आणि लांजावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)