शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मुंबई-गोवा महामार्गावरील पुलाच्या भेंगांनी उडवली धावपळ

By admin | Updated: July 16, 2017 18:06 IST

यंत्रणा जागी : पूलाला धोका नसल्याचा अभियंत्यांचा निर्वाळा

आॅनलाईन लोकमतलांजा (जि. रत्नागिरी), दि. १५ : मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड येथील पुलावर भेगा पडल्याचे वृत्त कळताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि सर्वांचीच धावपळ उडाली. मात्र, या भेगांपासून पुलाला कोणताही धोका नसल्याचे ‘मुंबई एन्ट्री पॉर्इंट’ या कंपनीचे अभियंता दत्तात्रय कदम यांनी सांगितले.वाकेड पुलावर भेगा पडल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. लांजा बसस्थानक नियंत्रक दिलीप वाडेकर यांनी लांजा पोलिसांना याची पूर्वकल्पना दिली. त्यानुसार पोलिसांनी तहसीलदार मारूती कांबळे यांना पुलाला भेगा पडल्याची खबर दिल्यानंतर तहसीलदार कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पांगरीकर, हेडकॉन्टेबल संतोष झापडेकर, वाकेड सरपंच जयश्री भितळे, पोलीसपाटील जयवंत जाधव, माजी सरपंच गोपाळ सावंत, ग्रामसेविका आर. व्ही. घाग, संदेश जाधव उपस्थित होते.

वाकेड पुलावर भेगा पडल्याचे दिसल्याने तहसीलदार कांबळे यांनी लांजा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गाची देखभाल करणाऱ्या ‘मुंबई एन्ट्री पॉर्इंट’ या कंपनीकडे संपर्क साधला. त्यानुसार कंपनीचे अभियंता दत्तात्रय कदम व सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देत पुलाची पाहणी केली. यावेळी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरील भागालाच भेग पडल्याचे निदर्शनास आले. मात्र, या भेगेचा पुलाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले. महामार्गावरील या पुलाचे पंधरा वर्षापूर्वी सहा ते सात फूट रुंदीकरण करण्यात आले होते. हे रुंदीकरण व जुन्या पुलाचे डांबरीकरण एकजीव न झाल्याने दहा ते बारा फुटांपर्यंत ही भेग गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महाड सावित्री नदीवर गेल्यावर्षी झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र हादरून गेला होता. वाकेड पुलावर भेगा पडल्याचे समजताच काहींनी महाड दुर्घटनेच्या आठवणी जाग्या केल्या. मात्र, संबंधित कंपनीच्या अभियंत्यांनी वाकेड पुलाला कोणताही धोका नसल्याचे सांगताच प्रशासनासह प्रवाशांचा जीवही भांड्यात पडला.