शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

बंदर विकासाला अडसर लालफितीचा

By admin | Updated: March 19, 2015 23:54 IST

प्रश्न कायमच : अथर्संकल्पात होते तरतूद मात्र विकास नाहीच

रत्नागिरी : जिल्ह्यातील मच्छिमारांच्या अनेक समस्या आहेत. मच्छिमारांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा शासनाकडून नेहमीच दुर्लक्षित ठेवल्या गेल्या आहेत. या अथर्संकल्पात करण्यात आलेली तरतूद तुटपंूजी असल्यामुळे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करुनही त्या पूर्ण झालेल्या नाहीत, अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये मच्छिमारांच्या सोयीसुविधांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यात मासे उतरवण्यासाठी ४३ बंदरांवर केंद्रे आहेत. यामध्ये राजापूर तालुक्यातील साखरीनाटे, दापोली तालुक्यातील हर्णै बंदर आणि रत्नागिरीतील मिरकरवाडा ही महत्त्वाची बंदरे आहेत. मासेमारी व्यवसायातून बंदरांवर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊन परकीय चलन मिळते. मात्र, ही बंदरे असंख्य सोयीसुविधांपासून वंचित आहेत. हर्णै आणि साखरीनाटे बंदरावर गेल्या कित्येक वर्षांपासून जेटीची मागणी करण्यात आली आहे. तर मिरकरवाडा बंदराचा दुसरा टप्पाही रखडला आहे. आजच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये मच्छिमारांच्या सोयीसुविधांसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीही अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांच्या तरतूदी करण्यात आल्या होत्या. मात्र, जिल्ह्यातील मच्छिमारी बंदरावरील सोयीसुविधा पूर्ण झालेल्या नाहीत. तरतूदीतून यंदा तरी हर्णै, साखरीनाटे या बंदरांतील जेटीचा प्रश्न सुटेल का, तसेच मच्छिमारांच्या सोयीसुविधा देण्यात येतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यात बंदरांमध्ये दैन्यावस्था आहे. अशा ठिकाणी सुविधा निर्माण झाल्यास त्यातून उलाढाल वाढेल व मच्छिमार बांधवांना त्यातून सहाय्य मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)तिन्ही बंदरातील जेटींचा प्रश्न कायम रत्नागिरी जिल्ह्यातील बंदरांवर अनेकवेळा विविध प्रकारे निधीची घोषणा केली जाते. प्रत्यक्षात दर अर्थसंकल्पात तरतूद होते. हर्णै, नाटे या बंदरातील जेटीचा प्रश्न प्रलंबित असल्याने तेथे मासे उतरण्यासाठीही पेच निर्माण होतो. मात्र, त्याबाबत अनेकवेळा प्रयत्न करूनही विकासाच्या बाबतीत अनुशेष राहतो. वर्षानुवर्षांची ही बंदरांची रडकथा थांबणार कधी, असा प्रश्न परिसरातील मच्छिमार बांधव विचारत आहेत.