शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
4
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
5
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
7
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
8
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
9
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
10
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
11
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
12
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
13
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
14
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
15
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
16
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
17
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
18
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
19
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
20
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...

पालिकेचा घनकचरा प्रकल्प अडचणींच्या फेऱ्यात -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2015 22:50 IST

-शहर विकासाचे स्वप्न भाग-३

रत्नागिरी : रत्नागिरी शहर हे जिल्ह्याची राजधानी असून, राजधानीसारख्या सुविधा या शहरात असाव्यात, ही सर्वांचीच अपेक्षा आहे. मात्र, त्यासाठी सहकार्याची जी भावना हवी, त्याचा अभाव दिसून येत आहे. त्यातूनच गेल्या पंधरा वर्षांपासून शहरातील दररोज जमा होणाऱ्या २२ टन कचऱ्याचे करायचे काय, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रखडला आहे. त्यामुळे शहराच्या जवळच घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा मोठा प्रकल्प उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. या घनकचरा प्रकल्पाला मुहूर्त कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.रत्नागिरी पालिकेने घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम २०००ची अंमलबजावणी करण्यासाठी दांडेआडोम येथील पालिकेच्या मालकीच्या जागेपर्यंत जाण्यासाठी आवश्यक रस्त्याच्या जागेचा प्रश्न अलिकडेच सोडविला. संपादन करून ही जागा जिल्हा प्रशासनाने पालिकेच्या ताब्यात दिली. त्यानंतर दांडेआडोम घनकचरा प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला, असे चित्र होते. मात्र, स्थानिकांच्या विरोधामुळे हा विषय न्यायालयात गेला. सध्या साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारातील मोठ्या जागेत कचऱ्याचे संकलन केले जात आहे. दांडेआडोम प्रकल्पाला स्थानिकांनी केलेल्या विरोधामुळे व केलेल्या युक्तिवादामुळे जिल्हा न्यायालयात या प्रकल्पाला मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाला पालिकेने उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. त्याबाबतचा निर्णय यावयाचा आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेत रत्नागिरी नगरपरिषदेचे ८२ शहरांच्या यादीत नाव समाविष्ट आहे. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या कालबध्द कार्यक्रमानुसार रत्नागिरी नगरपरिषदेची कार्यवाही सुुरू आहे. मात्र, दांडेआडोमचा प्रकल्प न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. घनकचरा प्रकल्प उभारणीबाबत सर्वच बाजूंनी कोंडी झाल्यानंतर ही कोंडी फोडण्यासाठी अनेक पर्याय सुचविले गेले. प्रत्येक प्रभागात छोट्या स्वरूपातील घनकचरा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी दोन प्रभागात जागांची पाहणीही करण्यात आली. पुढे काहीच झाले नाही. (प्रतिनिधी)स्मार्ट रत्नागिरीपुढे कचऱ्याची समस्यारत्नागिरी शहरात दरदिवशी संकलित होणारा २२ टन कचरा साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारात गेल्या काही वर्षांपासून डंप केला जात आहे. तेथे सध्या कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. नगरपरिषदेला शासनाने याआधीच कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, नगरपरिषदेला गेल्या पंधरा वर्षांच्या काळात घनकचरा प्रकल्प उभारणीसाठी शहराच्या जवळ आवश्यक जागा मिळाली नाही. स्मार्ट शहरासाठी प्रयत्न करणाऱ्या रत्नागिरी शहरासाठी ही बाब चांगली नाही. पालिकेत कारभार पाहणाऱ्यांचे हे अपयश असल्याची टीकाही आता होऊ लागली आहे. गंजलेली जलवाहिनी बदलावीशहरातील कचऱ्याचे ढीग आणि जलशुध्दिकरण प्रकल्प साळवी स्टॉप येथे एकाच ठिकाणी आहेत. या जलशुध्दिकरण प्रकल्पापासून शीळ धरणापर्यंत गेलेली जलवाहिनी ही पूर्णत: गंजली असून, जागोजागी फुटली आहे. त्यातून दररोज पाण्याची मोठी गळती सुरू आहे. या गळतीमुळे येणाऱ्या पाण्याचा जोर कमी होतोच व पाणीही वाया जात आहे. त्याचाही विचार करून नवीन जलवाहिनी लवकरात लवकर होणे शहरवासीयांसाठी महत्त्वाचे आहे.