शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचा घनकचरा प्रकल्प अडचणींच्या फेऱ्यात -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2015 22:50 IST

-शहर विकासाचे स्वप्न भाग-३

रत्नागिरी : रत्नागिरी शहर हे जिल्ह्याची राजधानी असून, राजधानीसारख्या सुविधा या शहरात असाव्यात, ही सर्वांचीच अपेक्षा आहे. मात्र, त्यासाठी सहकार्याची जी भावना हवी, त्याचा अभाव दिसून येत आहे. त्यातूनच गेल्या पंधरा वर्षांपासून शहरातील दररोज जमा होणाऱ्या २२ टन कचऱ्याचे करायचे काय, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रखडला आहे. त्यामुळे शहराच्या जवळच घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा मोठा प्रकल्प उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. या घनकचरा प्रकल्पाला मुहूर्त कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.रत्नागिरी पालिकेने घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम २०००ची अंमलबजावणी करण्यासाठी दांडेआडोम येथील पालिकेच्या मालकीच्या जागेपर्यंत जाण्यासाठी आवश्यक रस्त्याच्या जागेचा प्रश्न अलिकडेच सोडविला. संपादन करून ही जागा जिल्हा प्रशासनाने पालिकेच्या ताब्यात दिली. त्यानंतर दांडेआडोम घनकचरा प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला, असे चित्र होते. मात्र, स्थानिकांच्या विरोधामुळे हा विषय न्यायालयात गेला. सध्या साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारातील मोठ्या जागेत कचऱ्याचे संकलन केले जात आहे. दांडेआडोम प्रकल्पाला स्थानिकांनी केलेल्या विरोधामुळे व केलेल्या युक्तिवादामुळे जिल्हा न्यायालयात या प्रकल्पाला मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाला पालिकेने उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. त्याबाबतचा निर्णय यावयाचा आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेत रत्नागिरी नगरपरिषदेचे ८२ शहरांच्या यादीत नाव समाविष्ट आहे. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या कालबध्द कार्यक्रमानुसार रत्नागिरी नगरपरिषदेची कार्यवाही सुुरू आहे. मात्र, दांडेआडोमचा प्रकल्प न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. घनकचरा प्रकल्प उभारणीबाबत सर्वच बाजूंनी कोंडी झाल्यानंतर ही कोंडी फोडण्यासाठी अनेक पर्याय सुचविले गेले. प्रत्येक प्रभागात छोट्या स्वरूपातील घनकचरा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी दोन प्रभागात जागांची पाहणीही करण्यात आली. पुढे काहीच झाले नाही. (प्रतिनिधी)स्मार्ट रत्नागिरीपुढे कचऱ्याची समस्यारत्नागिरी शहरात दरदिवशी संकलित होणारा २२ टन कचरा साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारात गेल्या काही वर्षांपासून डंप केला जात आहे. तेथे सध्या कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. नगरपरिषदेला शासनाने याआधीच कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, नगरपरिषदेला गेल्या पंधरा वर्षांच्या काळात घनकचरा प्रकल्प उभारणीसाठी शहराच्या जवळ आवश्यक जागा मिळाली नाही. स्मार्ट शहरासाठी प्रयत्न करणाऱ्या रत्नागिरी शहरासाठी ही बाब चांगली नाही. पालिकेत कारभार पाहणाऱ्यांचे हे अपयश असल्याची टीकाही आता होऊ लागली आहे. गंजलेली जलवाहिनी बदलावीशहरातील कचऱ्याचे ढीग आणि जलशुध्दिकरण प्रकल्प साळवी स्टॉप येथे एकाच ठिकाणी आहेत. या जलशुध्दिकरण प्रकल्पापासून शीळ धरणापर्यंत गेलेली जलवाहिनी ही पूर्णत: गंजली असून, जागोजागी फुटली आहे. त्यातून दररोज पाण्याची मोठी गळती सुरू आहे. या गळतीमुळे येणाऱ्या पाण्याचा जोर कमी होतोच व पाणीही वाया जात आहे. त्याचाही विचार करून नवीन जलवाहिनी लवकरात लवकर होणे शहरवासीयांसाठी महत्त्वाचे आहे.