शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

पालिकेचा घनकचरा प्रकल्प अडचणींच्या फेऱ्यात -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2015 22:50 IST

-शहर विकासाचे स्वप्न भाग-३

रत्नागिरी : रत्नागिरी शहर हे जिल्ह्याची राजधानी असून, राजधानीसारख्या सुविधा या शहरात असाव्यात, ही सर्वांचीच अपेक्षा आहे. मात्र, त्यासाठी सहकार्याची जी भावना हवी, त्याचा अभाव दिसून येत आहे. त्यातूनच गेल्या पंधरा वर्षांपासून शहरातील दररोज जमा होणाऱ्या २२ टन कचऱ्याचे करायचे काय, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रखडला आहे. त्यामुळे शहराच्या जवळच घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा मोठा प्रकल्प उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. या घनकचरा प्रकल्पाला मुहूर्त कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.रत्नागिरी पालिकेने घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम २०००ची अंमलबजावणी करण्यासाठी दांडेआडोम येथील पालिकेच्या मालकीच्या जागेपर्यंत जाण्यासाठी आवश्यक रस्त्याच्या जागेचा प्रश्न अलिकडेच सोडविला. संपादन करून ही जागा जिल्हा प्रशासनाने पालिकेच्या ताब्यात दिली. त्यानंतर दांडेआडोम घनकचरा प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला, असे चित्र होते. मात्र, स्थानिकांच्या विरोधामुळे हा विषय न्यायालयात गेला. सध्या साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारातील मोठ्या जागेत कचऱ्याचे संकलन केले जात आहे. दांडेआडोम प्रकल्पाला स्थानिकांनी केलेल्या विरोधामुळे व केलेल्या युक्तिवादामुळे जिल्हा न्यायालयात या प्रकल्पाला मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाला पालिकेने उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. त्याबाबतचा निर्णय यावयाचा आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेत रत्नागिरी नगरपरिषदेचे ८२ शहरांच्या यादीत नाव समाविष्ट आहे. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या कालबध्द कार्यक्रमानुसार रत्नागिरी नगरपरिषदेची कार्यवाही सुुरू आहे. मात्र, दांडेआडोमचा प्रकल्प न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. घनकचरा प्रकल्प उभारणीबाबत सर्वच बाजूंनी कोंडी झाल्यानंतर ही कोंडी फोडण्यासाठी अनेक पर्याय सुचविले गेले. प्रत्येक प्रभागात छोट्या स्वरूपातील घनकचरा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी दोन प्रभागात जागांची पाहणीही करण्यात आली. पुढे काहीच झाले नाही. (प्रतिनिधी)स्मार्ट रत्नागिरीपुढे कचऱ्याची समस्यारत्नागिरी शहरात दरदिवशी संकलित होणारा २२ टन कचरा साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारात गेल्या काही वर्षांपासून डंप केला जात आहे. तेथे सध्या कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. नगरपरिषदेला शासनाने याआधीच कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, नगरपरिषदेला गेल्या पंधरा वर्षांच्या काळात घनकचरा प्रकल्प उभारणीसाठी शहराच्या जवळ आवश्यक जागा मिळाली नाही. स्मार्ट शहरासाठी प्रयत्न करणाऱ्या रत्नागिरी शहरासाठी ही बाब चांगली नाही. पालिकेत कारभार पाहणाऱ्यांचे हे अपयश असल्याची टीकाही आता होऊ लागली आहे. गंजलेली जलवाहिनी बदलावीशहरातील कचऱ्याचे ढीग आणि जलशुध्दिकरण प्रकल्प साळवी स्टॉप येथे एकाच ठिकाणी आहेत. या जलशुध्दिकरण प्रकल्पापासून शीळ धरणापर्यंत गेलेली जलवाहिनी ही पूर्णत: गंजली असून, जागोजागी फुटली आहे. त्यातून दररोज पाण्याची मोठी गळती सुरू आहे. या गळतीमुळे येणाऱ्या पाण्याचा जोर कमी होतोच व पाणीही वाया जात आहे. त्याचाही विचार करून नवीन जलवाहिनी लवकरात लवकर होणे शहरवासीयांसाठी महत्त्वाचे आहे.