शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

उपचाराच्या ठिकाणीच मिळेल रक्त

By admin | Updated: June 19, 2014 01:21 IST

२४७ रुग्णांना गेल्या साडेपाच महिन्यात पुरवठा

रत्नागिरी : राज्यात ‘ब्लड आॅन कॉल’ अर्थात ‘जीवन अमृत सेवा’ योजना ७ जानेवारी २०१४ पासून लागू करण्यात आली असून रत्नागिरीतून १०४ या टोल फ्री नंबरवरून संपर्क साधलेल्या २४७ रुग्णांना गेल्या साडेपाच महिन्यात ते उपचार घेत असलेल्या ठिकाणी रक्त पिशव्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालय रक्त संक्रमण अधिकारी व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पराग पाथरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. अपघात झाला की रक्ताची नितांत गरज भासते, एवढंच नव्हे तर ते रक्त मिळवायचे असेल तर संबंधित रक्तपुरवठादार संस्था किंवा दात्याचा दूरध्वनी क्रमांक शोधण्यापासून तयारी सुरू होते. पण आता त्याची गरज नाही. रक्तपुरवठादार संस्था किंवा दात्यांचे दहा आकडी नंबर लक्षात ठेवण्यापेक्षा केवळ तीन अंक लक्षात ठेवा आणि रक्त मिळवा. गरज आहे ती फक्त एका कॉलची! कॉल करा, रक्त तुमच्या शरिरात सळसळण्यासाठी पुढ्यात उभं असेल. सळसळत पुढ्यात उभं राहणारं रक्त पाहून आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. कारण शासनाने १०४ हा टोल फ्री नंबर यासाठी कार्यान्वित केला आहे. रुग्णांना रक्ताची आवश्यकता असताना अनेकदा रक्त आणण्यात बराच वेळ जात होता. अनेकदा रक्त बाहेरच्या जिल्ह्यातूनही आणावे लागत होते. जीवन अमृत सेवा ही योजना प्रथम सिंधुदुर्ग व पुणे येथे प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली. त्याचा प्रतिसाद पाहून नंतर ७ जानेवारी २०१४ पासून संपूर्ण राज्यात ही योजना कार्यान्वित झाली आहे. रत्नागिरीत जिल्हा रुग्णालयात रक्त विघटन केंद्र सुरू झाले असून जानेवारीपासून १०४ टोल फ्री नंबरवर रक्ताची मागणी करणारे अनेक फोन घणघणत आहेत. यासाठीचे समन्वय साधणारे १०४ हेल्थ अ‍ॅडवाइज कॉल सेंटर पुण्यात असून तेथे राज्यभरातून रक्त मागणीचे फोन गेल्यानंतर काही मिनिटात त्याचा संदेश नजिकच्या रक्तविघटन केंद्राला दिला जातो. त्यानंतर तासाभरात विविध चाचण्या करून रक्त रुग्ण असलेल्या ठिकाणी पोहोच करण्यात आले आहे. रत्नागिरीत रक्त विघटन केंद्रातून अशा रक्ताचा पुरवठा करण्याचे काम झाडगाव, रत्नागिरीतील आधार सेवा ट्रस्टला देण्यात आले आहे. या संस्थेच्या प्रतिनिधीने दुचाकीसह जिल्हा रुग्णालयात थांबायचे, अशी व्यवस्था आहे. रक्त मागणीचे दिवसातून ६ ते ७ कॉल असतात. पुण्यावरून कॉल दिला गेल्यानंतर संस्थेचा हा प्रतिनिधी तत्काळ त्या रुग्णालयात वा रुग्ण असलेल्या पत्त्यावर पोहोचतो. तेथे रुग्णाच्या रक्ताचा नमुना व रक्तमागणी अर्ज घेऊन रक्त विघटन केंद्रात येतो. या केंद्रात रक्ताचा गट तपासून नंतर क्रॉस मॅचिंग केले जाते. त्या रक्तगटामध्ये दुसरा उपगट आहे काय याची पडताळणी होते. या प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रक्त पोहोचविणाऱ्या प्रतिनिधीकडे ‘कोल्ड बॉक्स’ मधून रक्त पिशवी व त्याबाबतचा अहवाल दिला जातो व त्याच्याकडून संबंधित रुग्णापर्यंत हे रक्त तत्काळ पोहोचविले जाते. जानेवारीपासून १७ जूनपर्यंत प्लेटलेट, लाल रक्तपेशी, प्लाझमा याच्या २४७ पिशव्या रुग्णांना पोहोच करण्यात आल्या. याबाबत अद्यापही जिल्ह्यात म्हणावी तशी लोकजागृती झालेली नाही. त्यामुळे अजूनही रुग्णांना याबाबत माहिती नाही. मात्र याचा उपयोग रक्ताअभावी मृत्यूशी दोन हात करणाऱ्या लोकांना होउ शकतो, तडफडणाऱ्या जीवांना याचा लाभ होऊ शकतो. एवढेच नव्हे तर ज्यांना रक्तपुरवठा तातडीने गरजेचा आहे, त्या जगण्याची प्रबळ इच्ठाशक्ती असलेल्या लोकांनाही जगण्याची उमेद मिळू शकते.(प्रतिनिधी)