शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

उपचाराच्या ठिकाणीच मिळेल रक्त

By admin | Updated: June 19, 2014 01:21 IST

२४७ रुग्णांना गेल्या साडेपाच महिन्यात पुरवठा

रत्नागिरी : राज्यात ‘ब्लड आॅन कॉल’ अर्थात ‘जीवन अमृत सेवा’ योजना ७ जानेवारी २०१४ पासून लागू करण्यात आली असून रत्नागिरीतून १०४ या टोल फ्री नंबरवरून संपर्क साधलेल्या २४७ रुग्णांना गेल्या साडेपाच महिन्यात ते उपचार घेत असलेल्या ठिकाणी रक्त पिशव्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालय रक्त संक्रमण अधिकारी व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पराग पाथरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. अपघात झाला की रक्ताची नितांत गरज भासते, एवढंच नव्हे तर ते रक्त मिळवायचे असेल तर संबंधित रक्तपुरवठादार संस्था किंवा दात्याचा दूरध्वनी क्रमांक शोधण्यापासून तयारी सुरू होते. पण आता त्याची गरज नाही. रक्तपुरवठादार संस्था किंवा दात्यांचे दहा आकडी नंबर लक्षात ठेवण्यापेक्षा केवळ तीन अंक लक्षात ठेवा आणि रक्त मिळवा. गरज आहे ती फक्त एका कॉलची! कॉल करा, रक्त तुमच्या शरिरात सळसळण्यासाठी पुढ्यात उभं असेल. सळसळत पुढ्यात उभं राहणारं रक्त पाहून आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. कारण शासनाने १०४ हा टोल फ्री नंबर यासाठी कार्यान्वित केला आहे. रुग्णांना रक्ताची आवश्यकता असताना अनेकदा रक्त आणण्यात बराच वेळ जात होता. अनेकदा रक्त बाहेरच्या जिल्ह्यातूनही आणावे लागत होते. जीवन अमृत सेवा ही योजना प्रथम सिंधुदुर्ग व पुणे येथे प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली. त्याचा प्रतिसाद पाहून नंतर ७ जानेवारी २०१४ पासून संपूर्ण राज्यात ही योजना कार्यान्वित झाली आहे. रत्नागिरीत जिल्हा रुग्णालयात रक्त विघटन केंद्र सुरू झाले असून जानेवारीपासून १०४ टोल फ्री नंबरवर रक्ताची मागणी करणारे अनेक फोन घणघणत आहेत. यासाठीचे समन्वय साधणारे १०४ हेल्थ अ‍ॅडवाइज कॉल सेंटर पुण्यात असून तेथे राज्यभरातून रक्त मागणीचे फोन गेल्यानंतर काही मिनिटात त्याचा संदेश नजिकच्या रक्तविघटन केंद्राला दिला जातो. त्यानंतर तासाभरात विविध चाचण्या करून रक्त रुग्ण असलेल्या ठिकाणी पोहोच करण्यात आले आहे. रत्नागिरीत रक्त विघटन केंद्रातून अशा रक्ताचा पुरवठा करण्याचे काम झाडगाव, रत्नागिरीतील आधार सेवा ट्रस्टला देण्यात आले आहे. या संस्थेच्या प्रतिनिधीने दुचाकीसह जिल्हा रुग्णालयात थांबायचे, अशी व्यवस्था आहे. रक्त मागणीचे दिवसातून ६ ते ७ कॉल असतात. पुण्यावरून कॉल दिला गेल्यानंतर संस्थेचा हा प्रतिनिधी तत्काळ त्या रुग्णालयात वा रुग्ण असलेल्या पत्त्यावर पोहोचतो. तेथे रुग्णाच्या रक्ताचा नमुना व रक्तमागणी अर्ज घेऊन रक्त विघटन केंद्रात येतो. या केंद्रात रक्ताचा गट तपासून नंतर क्रॉस मॅचिंग केले जाते. त्या रक्तगटामध्ये दुसरा उपगट आहे काय याची पडताळणी होते. या प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रक्त पोहोचविणाऱ्या प्रतिनिधीकडे ‘कोल्ड बॉक्स’ मधून रक्त पिशवी व त्याबाबतचा अहवाल दिला जातो व त्याच्याकडून संबंधित रुग्णापर्यंत हे रक्त तत्काळ पोहोचविले जाते. जानेवारीपासून १७ जूनपर्यंत प्लेटलेट, लाल रक्तपेशी, प्लाझमा याच्या २४७ पिशव्या रुग्णांना पोहोच करण्यात आल्या. याबाबत अद्यापही जिल्ह्यात म्हणावी तशी लोकजागृती झालेली नाही. त्यामुळे अजूनही रुग्णांना याबाबत माहिती नाही. मात्र याचा उपयोग रक्ताअभावी मृत्यूशी दोन हात करणाऱ्या लोकांना होउ शकतो, तडफडणाऱ्या जीवांना याचा लाभ होऊ शकतो. एवढेच नव्हे तर ज्यांना रक्तपुरवठा तातडीने गरजेचा आहे, त्या जगण्याची प्रबळ इच्ठाशक्ती असलेल्या लोकांनाही जगण्याची उमेद मिळू शकते.(प्रतिनिधी)