शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पावस बसस्थानकात काळोखाचे साम्राज्य

By admin | Updated: July 22, 2014 22:15 IST

प्रवाशांना आरक्षण करणे अशक्य

पावस : पंचक्रोशीचा महत्त्वाचा दुवा अशी ओळख असणाऱ्या पावस येथील बसस्थानकातील विद्युत प्रवाह वारंवार खंडित होत असल्याने येथे गेल्या चार दिवसांपासून काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. येथील संगणकीय आरक्षण केंद्रही बंद असल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना आरक्षण करणे अशक्य होत आहे.रत्नागिरीकडे येणाऱ्या सर्व बसेस पावसला थांबतात. राज्यातील विविध क्षेत्रातून येणाऱ्या पर्यटकांसाठी पावस हे पर्यटनस्थळ व तिर्थक्षेत्र म्हणऊन पसंतीस उतरलेले आहे. मात्र या ठिकाणी असणाऱ्या एसटीस्थानकात वीज गेल्याने हे स्थानक अंधारात राहिल्याने प्रवासी, पर्यटक यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटन केंद्र म्हणून नावारुपास येत असलेलं पावस गाव पंचक्रोशीचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जाते. एस. टी.च्या या परिसरातील वाहतुकीचे नियंत्रण याच ठिकाणाहून होत असते. पावस बसस्थानकामध्ये असलेल्या नियंत्रण कक्षातून आंबोळगड, देवाचेगोठणे, आडिवरे, वेल्ये, हर्चे आदी गावातून मुंबई - परळ - बोरिवलीकडे जाणाऱ्या गाड्यांचे संगणकीय आरक्षण दिले जाते. मात्र, गेले चार दिवस स्थानकातील वीजपुरवठा खंडित असल्यामुळे ही सेवा ठप्प झाली आहे. पावसमधील महाविद्यालय दोन सत्रात चालविले जात असल्याने ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी विशेषत: युवती संध्याकाळी या स्थानकामध्ये येतात. चांदोर, नाखरे, डोर्ले - हर्चे, गणेशगुळे आदी गावात जाणाऱ्या संध्याकाळच्या फेऱ्या ७ नंतर या स्थानकात येत असतात. गेले चार दिवस वीज नसल्याने संध्याकाळी ६.३० नंतर स्थानकात काळोखाचे साम्राज्य पसरते. याचा फायदा रोडरोमिओ घेत असतात. नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता वाहतूक नियंत्रक गोगटे यांनी महावितरणकडे तक्रार करुन चार दिवस झाले तरी त्यांनी दखल घेतली नसल्याचे सांगितले. रात्रीच्या वेळी स्थानकात काळोखाचे साम्राज्य असल्याने अशा रोमिओपासून सुटका करुन घेण्यासाठी महाविद्यालयीन युवती आणि महिलांना शेजारच्या दुकानांचा आसरा घ्यावा लागत आहे. (वार्ताहर)