शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

पावस बसस्थानकात काळोखाचे साम्राज्य

By admin | Updated: July 22, 2014 22:15 IST

प्रवाशांना आरक्षण करणे अशक्य

पावस : पंचक्रोशीचा महत्त्वाचा दुवा अशी ओळख असणाऱ्या पावस येथील बसस्थानकातील विद्युत प्रवाह वारंवार खंडित होत असल्याने येथे गेल्या चार दिवसांपासून काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. येथील संगणकीय आरक्षण केंद्रही बंद असल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना आरक्षण करणे अशक्य होत आहे.रत्नागिरीकडे येणाऱ्या सर्व बसेस पावसला थांबतात. राज्यातील विविध क्षेत्रातून येणाऱ्या पर्यटकांसाठी पावस हे पर्यटनस्थळ व तिर्थक्षेत्र म्हणऊन पसंतीस उतरलेले आहे. मात्र या ठिकाणी असणाऱ्या एसटीस्थानकात वीज गेल्याने हे स्थानक अंधारात राहिल्याने प्रवासी, पर्यटक यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटन केंद्र म्हणून नावारुपास येत असलेलं पावस गाव पंचक्रोशीचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जाते. एस. टी.च्या या परिसरातील वाहतुकीचे नियंत्रण याच ठिकाणाहून होत असते. पावस बसस्थानकामध्ये असलेल्या नियंत्रण कक्षातून आंबोळगड, देवाचेगोठणे, आडिवरे, वेल्ये, हर्चे आदी गावातून मुंबई - परळ - बोरिवलीकडे जाणाऱ्या गाड्यांचे संगणकीय आरक्षण दिले जाते. मात्र, गेले चार दिवस स्थानकातील वीजपुरवठा खंडित असल्यामुळे ही सेवा ठप्प झाली आहे. पावसमधील महाविद्यालय दोन सत्रात चालविले जात असल्याने ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी विशेषत: युवती संध्याकाळी या स्थानकामध्ये येतात. चांदोर, नाखरे, डोर्ले - हर्चे, गणेशगुळे आदी गावात जाणाऱ्या संध्याकाळच्या फेऱ्या ७ नंतर या स्थानकात येत असतात. गेले चार दिवस वीज नसल्याने संध्याकाळी ६.३० नंतर स्थानकात काळोखाचे साम्राज्य पसरते. याचा फायदा रोडरोमिओ घेत असतात. नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता वाहतूक नियंत्रक गोगटे यांनी महावितरणकडे तक्रार करुन चार दिवस झाले तरी त्यांनी दखल घेतली नसल्याचे सांगितले. रात्रीच्या वेळी स्थानकात काळोखाचे साम्राज्य असल्याने अशा रोमिओपासून सुटका करुन घेण्यासाठी महाविद्यालयीन युवती आणि महिलांना शेजारच्या दुकानांचा आसरा घ्यावा लागत आहे. (वार्ताहर)