शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

भाजप करणार नुकसानीचा जनता पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:31 IST

रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांसमोर मांडले गेलेले नुकसानीचे आकडे चुकीचे आहेत. समोर दिसत असलेले नुकसान भरपूर असताना हे आकडे इतके कमी ...

रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांसमोर मांडले गेलेले नुकसानीचे आकडे चुकीचे आहेत. समोर दिसत असलेले नुकसान भरपूर असताना हे आकडे इतके कमी कसे? इतके कमी नुकसान दाखवले गेले तर केंद्राकडून भरपाई मिळणार कशी, असे प्रश्न भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. कोकणातील पाचही जिल्ह्यांत भाजपकडून जनता पंचनामा अशी समांतर यंत्रणा राबवली जाणार असल्याचेही त्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर त्यांनी कडाडून टीका केली. त्याचवेळी त्यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावरही टीका केली. मुख्यमंत्र्यांसमोर नुकसानाचे जे आकडे मांडले गेले, ते पूर्णपणे चुकीचे आहेत. नुकसान अधिक झालेले असतानाही आकडे कमी दाखवले गेले आहेत. एकीकडे ११०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असे या अहवालात नमूद आहे आणि ३४०० पंचनामे झाल्याचे सांगितले जात आहे. घरांबाबतही तीच स्थिती आहे. हे आकडे आले कोठून, असा प्रश्न त्यांनी केला. सरकार आणि जनतेची यातून फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला, तेव्हा ५००० घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली होती, पण मुख्यमंत्र्यांसमोर हाच आकडा कमी सांगितला गेला आहे. जर नुकसान कमी दाखवले गेले तर केंद्राकडून अधिक भरपाईची मागणी कशी करणार, असा प्रश्न त्यांनी केला.

पंचनामा झाल्यानंतर भरपाईचा निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, पण पंचनामे होणार कधी आणि भरपाई देणार कधी हा प्रश्नच आहे. त्यावर भाजपने पर्याय सुचवला होता. ड्रोन कॅमेराच्या साहाय्याने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यास नुकसानाचा प्राथमिक अंदाज येऊ शकतो, असे सुचवण्यात आले होते. मात्र, भाजपची सूचना म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता यावर पर्याय म्हणून भाजपकडून जनता पंचनामा अभियान राबवले जाणार आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा लोकांनी आपल्या नुकसानाचा व्हिडिओ तयार करून पाठवावा. त्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम सुरू आहे. एक-दोन दिवसांत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. हे सर्व सरकारसमोर ठेवण्यात येईल, असे ते म्हणाले.

.........................

भास्कररावांचे ऐकतात का?

केवळ मोडलेल्याच नाही तर पिळवटलेल्या झाडांनाही नुकसानभरपाई मिळावी, असा मुद्दा आमदार भास्कर जाधव यांनी मांडला आहे. त्यांचा मुद्दा रास्तच आहे, पण या सरकारमध्ये भास्कररावांचे ऐकले जाते का? जर ऐकले जात असेल तर ती माझे मुद्देही त्यांच्याकडे नेतो, असा टोला माधव भंडारी यांनी मांडला.

...................

निदान पालकमंत्री दिसले

मुख्यमंत्री आले म्हणून रत्नागिरीकरांना त्यांचे पालकमंत्री अनिल परब हे दिसले तरी. नाही तर ते रत्नागिरीत कधी दिसतच नाहीत, असा चिमटाही त्यांनी काढला.