शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भाजप करणार नुकसानीचा जनता पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:31 IST

रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांसमोर मांडले गेलेले नुकसानीचे आकडे चुकीचे आहेत. समोर दिसत असलेले नुकसान भरपूर असताना हे आकडे इतके कमी ...

रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांसमोर मांडले गेलेले नुकसानीचे आकडे चुकीचे आहेत. समोर दिसत असलेले नुकसान भरपूर असताना हे आकडे इतके कमी कसे? इतके कमी नुकसान दाखवले गेले तर केंद्राकडून भरपाई मिळणार कशी, असे प्रश्न भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. कोकणातील पाचही जिल्ह्यांत भाजपकडून जनता पंचनामा अशी समांतर यंत्रणा राबवली जाणार असल्याचेही त्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर त्यांनी कडाडून टीका केली. त्याचवेळी त्यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावरही टीका केली. मुख्यमंत्र्यांसमोर नुकसानाचे जे आकडे मांडले गेले, ते पूर्णपणे चुकीचे आहेत. नुकसान अधिक झालेले असतानाही आकडे कमी दाखवले गेले आहेत. एकीकडे ११०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असे या अहवालात नमूद आहे आणि ३४०० पंचनामे झाल्याचे सांगितले जात आहे. घरांबाबतही तीच स्थिती आहे. हे आकडे आले कोठून, असा प्रश्न त्यांनी केला. सरकार आणि जनतेची यातून फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला, तेव्हा ५००० घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली होती, पण मुख्यमंत्र्यांसमोर हाच आकडा कमी सांगितला गेला आहे. जर नुकसान कमी दाखवले गेले तर केंद्राकडून अधिक भरपाईची मागणी कशी करणार, असा प्रश्न त्यांनी केला.

पंचनामा झाल्यानंतर भरपाईचा निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, पण पंचनामे होणार कधी आणि भरपाई देणार कधी हा प्रश्नच आहे. त्यावर भाजपने पर्याय सुचवला होता. ड्रोन कॅमेराच्या साहाय्याने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यास नुकसानाचा प्राथमिक अंदाज येऊ शकतो, असे सुचवण्यात आले होते. मात्र, भाजपची सूचना म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता यावर पर्याय म्हणून भाजपकडून जनता पंचनामा अभियान राबवले जाणार आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा लोकांनी आपल्या नुकसानाचा व्हिडिओ तयार करून पाठवावा. त्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम सुरू आहे. एक-दोन दिवसांत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. हे सर्व सरकारसमोर ठेवण्यात येईल, असे ते म्हणाले.

.........................

भास्कररावांचे ऐकतात का?

केवळ मोडलेल्याच नाही तर पिळवटलेल्या झाडांनाही नुकसानभरपाई मिळावी, असा मुद्दा आमदार भास्कर जाधव यांनी मांडला आहे. त्यांचा मुद्दा रास्तच आहे, पण या सरकारमध्ये भास्कररावांचे ऐकले जाते का? जर ऐकले जात असेल तर ती माझे मुद्देही त्यांच्याकडे नेतो, असा टोला माधव भंडारी यांनी मांडला.

...................

निदान पालकमंत्री दिसले

मुख्यमंत्री आले म्हणून रत्नागिरीकरांना त्यांचे पालकमंत्री अनिल परब हे दिसले तरी. नाही तर ते रत्नागिरीत कधी दिसतच नाहीत, असा चिमटाही त्यांनी काढला.