शहरं
Join us  
Trending Stories
1
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
4
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
5
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
6
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
7
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
8
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
9
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
10
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
11
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
12
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
13
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
14
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
15
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
16
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
17
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
18
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
19
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
20
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

भाजप करणार नुकसानीचा जनता पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:31 IST

रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांसमोर मांडले गेलेले नुकसानीचे आकडे चुकीचे आहेत. समोर दिसत असलेले नुकसान भरपूर असताना हे आकडे इतके कमी ...

रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांसमोर मांडले गेलेले नुकसानीचे आकडे चुकीचे आहेत. समोर दिसत असलेले नुकसान भरपूर असताना हे आकडे इतके कमी कसे? इतके कमी नुकसान दाखवले गेले तर केंद्राकडून भरपाई मिळणार कशी, असे प्रश्न भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. कोकणातील पाचही जिल्ह्यांत भाजपकडून जनता पंचनामा अशी समांतर यंत्रणा राबवली जाणार असल्याचेही त्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर त्यांनी कडाडून टीका केली. त्याचवेळी त्यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावरही टीका केली. मुख्यमंत्र्यांसमोर नुकसानाचे जे आकडे मांडले गेले, ते पूर्णपणे चुकीचे आहेत. नुकसान अधिक झालेले असतानाही आकडे कमी दाखवले गेले आहेत. एकीकडे ११०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असे या अहवालात नमूद आहे आणि ३४०० पंचनामे झाल्याचे सांगितले जात आहे. घरांबाबतही तीच स्थिती आहे. हे आकडे आले कोठून, असा प्रश्न त्यांनी केला. सरकार आणि जनतेची यातून फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला, तेव्हा ५००० घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली होती, पण मुख्यमंत्र्यांसमोर हाच आकडा कमी सांगितला गेला आहे. जर नुकसान कमी दाखवले गेले तर केंद्राकडून अधिक भरपाईची मागणी कशी करणार, असा प्रश्न त्यांनी केला.

पंचनामा झाल्यानंतर भरपाईचा निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, पण पंचनामे होणार कधी आणि भरपाई देणार कधी हा प्रश्नच आहे. त्यावर भाजपने पर्याय सुचवला होता. ड्रोन कॅमेराच्या साहाय्याने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यास नुकसानाचा प्राथमिक अंदाज येऊ शकतो, असे सुचवण्यात आले होते. मात्र, भाजपची सूचना म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता यावर पर्याय म्हणून भाजपकडून जनता पंचनामा अभियान राबवले जाणार आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा लोकांनी आपल्या नुकसानाचा व्हिडिओ तयार करून पाठवावा. त्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम सुरू आहे. एक-दोन दिवसांत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. हे सर्व सरकारसमोर ठेवण्यात येईल, असे ते म्हणाले.

.........................

भास्कररावांचे ऐकतात का?

केवळ मोडलेल्याच नाही तर पिळवटलेल्या झाडांनाही नुकसानभरपाई मिळावी, असा मुद्दा आमदार भास्कर जाधव यांनी मांडला आहे. त्यांचा मुद्दा रास्तच आहे, पण या सरकारमध्ये भास्कररावांचे ऐकले जाते का? जर ऐकले जात असेल तर ती माझे मुद्देही त्यांच्याकडे नेतो, असा टोला माधव भंडारी यांनी मांडला.

...................

निदान पालकमंत्री दिसले

मुख्यमंत्री आले म्हणून रत्नागिरीकरांना त्यांचे पालकमंत्री अनिल परब हे दिसले तरी. नाही तर ते रत्नागिरीत कधी दिसतच नाहीत, असा चिमटाही त्यांनी काढला.