शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

भाजपने स्वबळाचा नारा देऊन शिवसेनेला फटकारले

By admin | Updated: June 28, 2016 00:38 IST

नेत्यांपेक्षा कार्यकर्ते महत्त्वाचे : आगामी निवडणुकीसाठी रणनीती स्पष्ट

सुभाष कदम --चिपळूण --भाजपने दोन दिवसांच्या चिपळूण येथील कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत स्वबळाचा नारा देऊन युतीतील आपला सहकारी पक्ष शिवसेनेला फटकारले असून, आगामी निवडणुकीसाठीची आपली रणनीती स्पष्ट केली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी याबाबत कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याची सूचना केली आहे. येथे काही नाही म्हणून हात चोळीत न बसता सामान्य कार्यकर्त्याला जवळ करा, नेत्यांपेक्षा आपल्याला कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत, असे सांगून पक्षवाढीचा इरादा स्पष्ट केला.भाजपची चिपळूण तालुक्यातील ताकद मर्यादित आहे. येथे भाजपचा एकही निवडून आलेला नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार नाही. चिपळूण विधानसभा मतदारसंघात तर साधा ग्रामपंचायत सदस्यही नाही. असे असताना जिल्हाध्यक्ष माने यांनी रामदास राणे यांना तालुकाध्यक्ष, संकेत अवेरे युवा मोर्चा अध्यक्ष, तर वैशाली निमकर यांनी शहर अध्यक्ष करुन नवी समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. प्रदेश चिटणीस डॉ. नातू व नीलम गोंधळी यांच्यासह चिपळूण शहरातील भाजप नेत्यांची त्यांना समर्थ साथ आहे. विधानसभेत पराभूत झालेले माधव गवळी हेही दिमतीला आहेत. शहरासह ग्रामीण भागात भाजप वाढीसाठीच येथे कार्यकारिणी घेऊन ‘एकला चलो रे’चा नारा त्यांनी दिला. चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षात गटबाजी नको म्हणून इच्छुकांना वाटाण्याच्या अक्षता लावून त्यांनी महिला शहर अध्यक्षा म्हणून प्रभावी काम करणाऱ्या वैशाली निमकर यांना शहर अध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. नगरपरिषद निवडणुकीत कस दाखवा आणि पदे मिळवा, हा अघोषित इशाराही माने यांनी दिला आहे. जनतेसाठी आपण आहोत. आपली जनतेशी बांधिलकी आहे, याची जाणीव ठेवून येथील सत्ताधाऱ्यांना आपली गरज असेल, तर विचारा, आपण विकासासाठी त्यांना संपूर्ण सहकार्य करून जनतेला दिलासा देऊया. केंद्रात व राज्यात आपली सत्ता आहे, येथे आपला नगराध्यक्ष होईल, पण, त्यासाठी आपणही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे. त्याला शासनाच्या योजनांचा लाभ दिला पाहिजे. सरकार करीत असलेल्या कामांची माहिती दिली पाहिजे. एकूणच मोदी पर्वाचा आढावा त्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर मांडला. नाव न घेता त्यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली व आसूडही ओढले. सहमतीच्या राजकारणाचा पक्षाला कसा फटका बसला, ते सांगून आता आपण स्वतंत्र लढून पक्ष वाढवायचा आहे, याचे गमक सांगितले. अगदी ग्रामसभेत हजर राहण्यापासून २ कोटी वृक्ष लागवडीत सहभाग नोंदवून आपले अस्तित्व दाखवणे, हेही आपले काम असल्याचे माने यांनी सांगितले.आमदार प्रवीण दरेकर, जिल्हा प्रभारी व प्रदेश चिटणीस राजन तेली, प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांनीही आक्रमक विचार मांडून भाजपही आता मुळमुळीत धोरण सोडून आक्रमकपणे जनतेच्या विकासासाठी उतरल्याची जाणीव करुन दिली. कार्यकर्त्यांना बळ देतानाच विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, हे स्पष्ट केले. सर्वच स्तरावर सत्ता स्थापन करून गेली ६० वर्षे रखडलेल्या विकासाला गती देण्याचे काम हे सरकार करणार असल्याचेही या कार्यकारिणीच्या सभेत दिसले. आतापर्यंत भटाब्राह्मणांचा असलेला हा पक्ष आता सर्वसामान्यासाठी काम करीत आहे. बहुजनांच्या न्याय्य हक्कांसाठी कात टाकत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. सत्ता हवी असेल तर सोवळे राहून चालणार नाही. राजकारणाची बदलती स्थित्यंत्तरे ओळखून काम करायला हवे, याची खऱ्या अर्थाने जाणीव पक्षाला झाली असून, त्याप्रमाणे आता पावले पडत आहेत. एक नवा विचार, नवा संकल्प व नवी दृष्टी, नवे व्हिजन घेवून भाजपाची वाटचाल आता सुरु झाली आहे. याचे परिणाम आज नाही तर येत्या काही वर्षात निश्चित जाणवतील, याची चुणूक या सभेत दिसली. एक समर्थ पर्याय म्हणून भाजप निश्चितच उभारी घेत आहे.