शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

भाजप, काँग्रेससह राष्ट्रवादी एकत्र ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:46 IST

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार असून, त्यासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. तालुक्यातील शिवसेनेचे प्राबल्य मोडून काढण्यासाठी

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : सेनेला शह देण्याचे डावपेचतालुक्यातील जनता सेनेबरोबर आहे,संघटनात्मक बांधणीत त्यांचे चांगलेच वजन

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार असून, त्यासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. तालुक्यातील शिवसेनेचे प्राबल्य मोडून काढण्यासाठी या गडावर स्वारी करण्याचे डावपेच विरोधकांनी आखले आहेत. त्यासाठी सेनेविरोधात भाजप, राष्टÑवादी कॉँग्रेस व कॉँगे्रस एकत्र येणार असल्याची चर्चा जोरात आहे. तशा हालचालीही सुरू झाल्याने शिवसेनेनेही आपला गड शाबूत राखण्यासाठी कंबर कसल्याचे राजकीय चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सेना आपला गड राखणार की, विरोधकांच्या डावपेचात सेनेच्या गडाची तटबंदी कोसळणार याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी तालुक्यात शिवसेना भक्कम आहे. संघटनात्मक पातळीवर सेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांचे हे यश मानले जाते. त्यांनी गावागावात शिवसेनेची चांगली बांधणी व्हावी, यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. त्यामुळे तालुक्यात संघटनात्मक बांधणीत त्यांचे चांगलेच वजन आहे. जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण निवडणूक तसेच याआधी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही सेनेने सर्वाधिक यश मिळवले आहे.

२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या १४ आॅक्टोबरला होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मात्र, आता तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांना सेनेतच अनेक स्पर्धक निर्माण झाले आहेत. त्यांच्याकडे असलेल्या तालुकाप्रमुखपदावर काहीजणांचा डोळा आहे. यावेळच्या निवडणुकीत विरोधकांशी हातमिळवणी करून साळवी यांना नामोहरम करण्याचे राजकारणही संघटनेत खेळले जात असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे या २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची लढाई जिंकणे हे बंड्या साळवी यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.बंड्या साळवी : शिवसेनेचेच वर्चस्वरत्नागिरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या आॅक्टोबर महिन्यात.शिवसेनेचे प्राबल्य मोडून काढण्यासाठी या गडावर स्वारी करण्याचे डावपेच.शिवसेनेनेही आपला गड शाबूत राखण्यासाठी कंबर कसली.साळवींच्या तालुकाप्रमुखपदावर काहीजणांचा डोळा?विरोधकांनी २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सेनेविरोधात कितीही ताकद उभी केली तरी या सर्व ग्रामपंचायतींवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास सेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी प्रसारमाध्यमांंकडे व्यक्त केला. शिवसेनेचे तालुक्यावरील वर्चस्व कमी करण्यासाठी विरोधक डावपेच आखत आहेत. मात्र, त्यात त्यांना यश येणार नाही. तालुक्यातील जनता सेनेबरोबर आहे, असेही साळवी म्हणाले.