शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

भाजप, काँग्रेससह राष्ट्रवादी एकत्र ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:46 IST

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार असून, त्यासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. तालुक्यातील शिवसेनेचे प्राबल्य मोडून काढण्यासाठी

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : सेनेला शह देण्याचे डावपेचतालुक्यातील जनता सेनेबरोबर आहे,संघटनात्मक बांधणीत त्यांचे चांगलेच वजन

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार असून, त्यासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. तालुक्यातील शिवसेनेचे प्राबल्य मोडून काढण्यासाठी या गडावर स्वारी करण्याचे डावपेच विरोधकांनी आखले आहेत. त्यासाठी सेनेविरोधात भाजप, राष्टÑवादी कॉँग्रेस व कॉँगे्रस एकत्र येणार असल्याची चर्चा जोरात आहे. तशा हालचालीही सुरू झाल्याने शिवसेनेनेही आपला गड शाबूत राखण्यासाठी कंबर कसल्याचे राजकीय चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सेना आपला गड राखणार की, विरोधकांच्या डावपेचात सेनेच्या गडाची तटबंदी कोसळणार याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी तालुक्यात शिवसेना भक्कम आहे. संघटनात्मक पातळीवर सेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांचे हे यश मानले जाते. त्यांनी गावागावात शिवसेनेची चांगली बांधणी व्हावी, यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. त्यामुळे तालुक्यात संघटनात्मक बांधणीत त्यांचे चांगलेच वजन आहे. जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण निवडणूक तसेच याआधी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही सेनेने सर्वाधिक यश मिळवले आहे.

२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या १४ आॅक्टोबरला होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मात्र, आता तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांना सेनेतच अनेक स्पर्धक निर्माण झाले आहेत. त्यांच्याकडे असलेल्या तालुकाप्रमुखपदावर काहीजणांचा डोळा आहे. यावेळच्या निवडणुकीत विरोधकांशी हातमिळवणी करून साळवी यांना नामोहरम करण्याचे राजकारणही संघटनेत खेळले जात असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे या २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची लढाई जिंकणे हे बंड्या साळवी यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.बंड्या साळवी : शिवसेनेचेच वर्चस्वरत्नागिरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या आॅक्टोबर महिन्यात.शिवसेनेचे प्राबल्य मोडून काढण्यासाठी या गडावर स्वारी करण्याचे डावपेच.शिवसेनेनेही आपला गड शाबूत राखण्यासाठी कंबर कसली.साळवींच्या तालुकाप्रमुखपदावर काहीजणांचा डोळा?विरोधकांनी २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सेनेविरोधात कितीही ताकद उभी केली तरी या सर्व ग्रामपंचायतींवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास सेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी प्रसारमाध्यमांंकडे व्यक्त केला. शिवसेनेचे तालुक्यावरील वर्चस्व कमी करण्यासाठी विरोधक डावपेच आखत आहेत. मात्र, त्यात त्यांना यश येणार नाही. तालुक्यातील जनता सेनेबरोबर आहे, असेही साळवी म्हणाले.