शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

‘बायोगॅस’चे यंदा १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण

By admin | Updated: May 1, 2016 00:14 IST

पी. एन. देशमुख : जिल्ह््यात २७० प्रकल्पांची उभारणी

रत्नागिरी : राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेंतर्गत मागील आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बायोगॅसचे शंभर टक्के काम पूर्ण झाले असून, जिल्ह्यात २७० बायोगॅस उभारण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी दिली. चुलीला पर्याय म्हणून ग्रामीण भागात बायोगॅस उभारण्यात जिल्हा परिषद कृषी विभागाला काही प्रमाणात का होईना यश आले आहे. चुलींमुळे जंगलांचा ऱ्हास होतो. तसेच कंपन्यांकडून मिळणारा गॅस खरेदी करण्यासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे बायोगॅस हा परवडणारा व प्रदूषणमुक्त असल्याने तो फायद्याचा ठरत आहे. त्यासाठी शासनाकडून बायोगॅस प्रकल्प उभारण्यास आर्थिक सहाय्यही करण्यात येते. राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला बायोगॅस प्रकल्प देण्यात येतो़ बायोगॅसच्या एक घन फुटासाठी ५ हजार रुपये तर २ ते ५ घनफुटासाठी ९ हजार रुपये देण्यात येतात़ त्याला जर शौचालय जोडायचे असल्यास आणखी १२०० रुपये अधिक देण्यात येतात. त्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे जनावर असणे आवश्यक आहे़ जिल्ह्यासाठी २७० बायोगॅस प्रकल्पांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी आत्तापर्यंत बायोगॅसच्या मागणीप्रमाणे कामे करण्यात आली असून, २७० बायोगॅस प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. शासनाने दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात आली होती. मागेल त्याला बायोगॅस अशी योजना राबविण्यात आली होती. मात्र, या योजनेबाबत ग्रामीण भागातील जनतेमध्ये उदासिनता दिसून येत होती. अखेर जिल्हा परिषद कृषी विभागाच्या प्रयत्नाला यश येऊन बायोगॅसचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)कृषी विभाग : दुरुस्तीसाठी मदत मिळत नसल्याची खंत२०१४-१५ या आर्थिक वर्षांमध्ये जिल्ह्याला २५० बायोगॅस आणि २०१५-१६ मध्ये २७० बायोगॅस प्रकल्पांचे उद्दिष्ट जिल्हा परिषद कृषी विभागाला देण्यात आले होते. हे उद्दिष्ट दोन्ही वर्षी पूर्ण करण्यात आले. मात्र, एखाद्या वेळी बायोगॅसच्या दुरुस्तीचे काम निघाल्यास त्यासाठी लागणारा खर्च लाभार्थ्यानेच करावयाचा असतो. दुरुस्तीसाठी शासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे बायोगॅसबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. मात्र तरीही यंदा कृषी विभागाने आपले उद्दीष्ट पूर्ण केले आहे.बायोगॅस वापर वाढलाचुलीला पर्याय म्हणून ग्रामीण भागात बायोगॅसचा प्रसार सुरु आहे. ग्रामीण भागात साऱ्यांनाच सिलिंडरचा पर्याय परवडत नाही. त्यांच्यासाठी बायोगॅस हा पर्याय आहे. त्यामुळे बायोगॅसचा वापर वाढू लागला आहे.