शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

‘बायोगॅस’चे यंदा १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण

By admin | Updated: May 1, 2016 00:14 IST

पी. एन. देशमुख : जिल्ह््यात २७० प्रकल्पांची उभारणी

रत्नागिरी : राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेंतर्गत मागील आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बायोगॅसचे शंभर टक्के काम पूर्ण झाले असून, जिल्ह्यात २७० बायोगॅस उभारण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी दिली. चुलीला पर्याय म्हणून ग्रामीण भागात बायोगॅस उभारण्यात जिल्हा परिषद कृषी विभागाला काही प्रमाणात का होईना यश आले आहे. चुलींमुळे जंगलांचा ऱ्हास होतो. तसेच कंपन्यांकडून मिळणारा गॅस खरेदी करण्यासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे बायोगॅस हा परवडणारा व प्रदूषणमुक्त असल्याने तो फायद्याचा ठरत आहे. त्यासाठी शासनाकडून बायोगॅस प्रकल्प उभारण्यास आर्थिक सहाय्यही करण्यात येते. राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला बायोगॅस प्रकल्प देण्यात येतो़ बायोगॅसच्या एक घन फुटासाठी ५ हजार रुपये तर २ ते ५ घनफुटासाठी ९ हजार रुपये देण्यात येतात़ त्याला जर शौचालय जोडायचे असल्यास आणखी १२०० रुपये अधिक देण्यात येतात. त्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे जनावर असणे आवश्यक आहे़ जिल्ह्यासाठी २७० बायोगॅस प्रकल्पांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी आत्तापर्यंत बायोगॅसच्या मागणीप्रमाणे कामे करण्यात आली असून, २७० बायोगॅस प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. शासनाने दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात आली होती. मागेल त्याला बायोगॅस अशी योजना राबविण्यात आली होती. मात्र, या योजनेबाबत ग्रामीण भागातील जनतेमध्ये उदासिनता दिसून येत होती. अखेर जिल्हा परिषद कृषी विभागाच्या प्रयत्नाला यश येऊन बायोगॅसचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)कृषी विभाग : दुरुस्तीसाठी मदत मिळत नसल्याची खंत२०१४-१५ या आर्थिक वर्षांमध्ये जिल्ह्याला २५० बायोगॅस आणि २०१५-१६ मध्ये २७० बायोगॅस प्रकल्पांचे उद्दिष्ट जिल्हा परिषद कृषी विभागाला देण्यात आले होते. हे उद्दिष्ट दोन्ही वर्षी पूर्ण करण्यात आले. मात्र, एखाद्या वेळी बायोगॅसच्या दुरुस्तीचे काम निघाल्यास त्यासाठी लागणारा खर्च लाभार्थ्यानेच करावयाचा असतो. दुरुस्तीसाठी शासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे बायोगॅसबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. मात्र तरीही यंदा कृषी विभागाने आपले उद्दीष्ट पूर्ण केले आहे.बायोगॅस वापर वाढलाचुलीला पर्याय म्हणून ग्रामीण भागात बायोगॅसचा प्रसार सुरु आहे. ग्रामीण भागात साऱ्यांनाच सिलिंडरचा पर्याय परवडत नाही. त्यांच्यासाठी बायोगॅस हा पर्याय आहे. त्यामुळे बायोगॅसचा वापर वाढू लागला आहे.