शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

जैवविविधता समित्या केवळ कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 23:36 IST

रत्नागिरी : जैवविविधतेचे संवर्धन, जोपासना आणि पोषण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच ...

रत्नागिरी : जैवविविधतेचे संवर्धन, जोपासना आणि पोषण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच जैवविविधता नोंदवह्याही तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, या समित्यांचे कामच सुरू झालेले नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून देण्यात आली आहे.या समित्यांना ३० डिसेंबरपर्यंत नोंदवह्यांचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. मात्र, स्थानिक पातळीवर त्याचे संवर्धन, जोपासना आणि पोषण होत नाही. ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षतेमुळे जैवविविधतेचा मोठा भाग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राज्य शासनाने जैवविविधता टिकविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ही समिती स्थापन करण्याबाबत सन २०१५मध्ये आदेश दिले होते. या आदेशानुसार जैवविविधतेबाबत जनजागृती करण्यासाठी आणि या समित्या स्थापन करण्यास मदतीसाठी शासनाने जिल्ह्यासाठी चार संस्थांची निवड केली होती. समित्या स्थापनेनंतर ३३ प्रकारच्या अर्जांमध्ये त्या-त्या ग्रामपचांयतींच्या हद्दीतील माहिती भरवून घेण्यात आली होती. मात्र, या समित्या केवळ कागदावरच राहिल्या असून, गेली चार वर्षे समित्या अकार्यरत राहिल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे समित्यांना मुदत दिली आहे. या नोंदवह्या मुदतीत पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.समित्यांची कामेजैवविविधता जोपासणे, टिकविणे, त्याचे पोषण करणे तसेच जैवविविधतेच्या पारंपरिक आणि आधुनिक माहितीचे संकलन करून त्याचा उपयोग समाजासाठी करून देणे गरजेचे आहे. परिसरातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांना जैवविविधतेचा वारसा स्थान म्हणून जाहीर करून त्यांचे संरक्षण व विकास करणे, धोक्यात आलेल्या प्रजातींचे संरक्षण आणि पुनर्वसन करणे अशी कामे या समित्या करणार आहेत. जिल्ह्यातील वनऔषधी, वन्यप्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक, पाळीव प्राणी, दुर्मीळ वन्यजीव आणि वनस्पतींचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.