शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

जैवविविधता समित्या केवळ कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 23:36 IST

रत्नागिरी : जैवविविधतेचे संवर्धन, जोपासना आणि पोषण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच ...

रत्नागिरी : जैवविविधतेचे संवर्धन, जोपासना आणि पोषण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच जैवविविधता नोंदवह्याही तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, या समित्यांचे कामच सुरू झालेले नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून देण्यात आली आहे.या समित्यांना ३० डिसेंबरपर्यंत नोंदवह्यांचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. मात्र, स्थानिक पातळीवर त्याचे संवर्धन, जोपासना आणि पोषण होत नाही. ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षतेमुळे जैवविविधतेचा मोठा भाग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राज्य शासनाने जैवविविधता टिकविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ही समिती स्थापन करण्याबाबत सन २०१५मध्ये आदेश दिले होते. या आदेशानुसार जैवविविधतेबाबत जनजागृती करण्यासाठी आणि या समित्या स्थापन करण्यास मदतीसाठी शासनाने जिल्ह्यासाठी चार संस्थांची निवड केली होती. समित्या स्थापनेनंतर ३३ प्रकारच्या अर्जांमध्ये त्या-त्या ग्रामपचांयतींच्या हद्दीतील माहिती भरवून घेण्यात आली होती. मात्र, या समित्या केवळ कागदावरच राहिल्या असून, गेली चार वर्षे समित्या अकार्यरत राहिल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे समित्यांना मुदत दिली आहे. या नोंदवह्या मुदतीत पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.समित्यांची कामेजैवविविधता जोपासणे, टिकविणे, त्याचे पोषण करणे तसेच जैवविविधतेच्या पारंपरिक आणि आधुनिक माहितीचे संकलन करून त्याचा उपयोग समाजासाठी करून देणे गरजेचे आहे. परिसरातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांना जैवविविधतेचा वारसा स्थान म्हणून जाहीर करून त्यांचे संरक्षण व विकास करणे, धोक्यात आलेल्या प्रजातींचे संरक्षण आणि पुनर्वसन करणे अशी कामे या समित्या करणार आहेत. जिल्ह्यातील वनऔषधी, वन्यप्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक, पाळीव प्राणी, दुर्मीळ वन्यजीव आणि वनस्पतींचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.