शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधता समित्या केवळ कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 23:36 IST

रत्नागिरी : जैवविविधतेचे संवर्धन, जोपासना आणि पोषण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच ...

रत्नागिरी : जैवविविधतेचे संवर्धन, जोपासना आणि पोषण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच जैवविविधता नोंदवह्याही तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, या समित्यांचे कामच सुरू झालेले नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून देण्यात आली आहे.या समित्यांना ३० डिसेंबरपर्यंत नोंदवह्यांचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. मात्र, स्थानिक पातळीवर त्याचे संवर्धन, जोपासना आणि पोषण होत नाही. ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षतेमुळे जैवविविधतेचा मोठा भाग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राज्य शासनाने जैवविविधता टिकविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ही समिती स्थापन करण्याबाबत सन २०१५मध्ये आदेश दिले होते. या आदेशानुसार जैवविविधतेबाबत जनजागृती करण्यासाठी आणि या समित्या स्थापन करण्यास मदतीसाठी शासनाने जिल्ह्यासाठी चार संस्थांची निवड केली होती. समित्या स्थापनेनंतर ३३ प्रकारच्या अर्जांमध्ये त्या-त्या ग्रामपचांयतींच्या हद्दीतील माहिती भरवून घेण्यात आली होती. मात्र, या समित्या केवळ कागदावरच राहिल्या असून, गेली चार वर्षे समित्या अकार्यरत राहिल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे समित्यांना मुदत दिली आहे. या नोंदवह्या मुदतीत पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.समित्यांची कामेजैवविविधता जोपासणे, टिकविणे, त्याचे पोषण करणे तसेच जैवविविधतेच्या पारंपरिक आणि आधुनिक माहितीचे संकलन करून त्याचा उपयोग समाजासाठी करून देणे गरजेचे आहे. परिसरातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांना जैवविविधतेचा वारसा स्थान म्हणून जाहीर करून त्यांचे संरक्षण व विकास करणे, धोक्यात आलेल्या प्रजातींचे संरक्षण आणि पुनर्वसन करणे अशी कामे या समित्या करणार आहेत. जिल्ह्यातील वनऔषधी, वन्यप्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक, पाळीव प्राणी, दुर्मीळ वन्यजीव आणि वनस्पतींचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.