शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

किनाऱ्यावर महाकाय लाटांचे थैमान

By admin | Updated: July 6, 2016 00:37 IST

बंधारा लाटांनी गिळंकृत केल्याने समुद्राचे पाणी गावामध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी त्याची ही समस्या कायम होती.

रत्नागिरी : पावसाची जोड व नैऋत्य दिशेने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे दर्या चांगलाच उधाणलेला होता. वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सुमारे १२ ते १३ फूट उंचीच्या महाकाय लाटा समुद्रकिनारी धडकल्या. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या रहिवांशामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.गेले आठ दिवस समुद्रकिनारी पावसाने थैमान घातले होेते. त्यात नैऋत्य दिशेने ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याची जोड समुद्राच्या उधाणाला मिळाली होती. अजस्त्र लाटा किनाऱ्यावर धडकत असल्याने किनारी राहणाऱ्या रहिवांशामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.मंगळवारी या महिन्यातील सर्वांत मोठी भरती होती. त्यामुळे त्याला नैऋत्य दिशेने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्याची साथ लाभल्याने दर्या अधिकच उधाणलेला होता. त्यामुळे अजस्त्र लाटांचा मारा मांडवी जेटीवर होत होता. त्याचबरोबर खडपेवठार, घुडेवठार, चवंडेवठार, राजीवडा या ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांवरून पाणी येत होते. अनेक ठिकाणी पाणी भरल्याचे दिसून आले. मिऱ्यावासीयांची धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची समस्या दरवर्षीची डोकेदुखी ठरली आहे. पंधरामाड ते भाटीमिऱ्या परिसरातील ५०० मीटरचा बंधारा लाटांनी गिळंकृत केल्याने समुद्राचे पाणी गावामध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी त्याची ही समस्या कायम होती. त्यामुळे मिऱ्यावासीयांची दरवर्षीची ही समस्या संपता सपेना, अशी अवस्था झाली आहे. (वार्ताहर)