शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

किनाऱ्यावर महाकाय लाटांचे थैमान

By admin | Updated: July 6, 2016 00:37 IST

बंधारा लाटांनी गिळंकृत केल्याने समुद्राचे पाणी गावामध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी त्याची ही समस्या कायम होती.

रत्नागिरी : पावसाची जोड व नैऋत्य दिशेने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे दर्या चांगलाच उधाणलेला होता. वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सुमारे १२ ते १३ फूट उंचीच्या महाकाय लाटा समुद्रकिनारी धडकल्या. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या रहिवांशामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.गेले आठ दिवस समुद्रकिनारी पावसाने थैमान घातले होेते. त्यात नैऋत्य दिशेने ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याची जोड समुद्राच्या उधाणाला मिळाली होती. अजस्त्र लाटा किनाऱ्यावर धडकत असल्याने किनारी राहणाऱ्या रहिवांशामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.मंगळवारी या महिन्यातील सर्वांत मोठी भरती होती. त्यामुळे त्याला नैऋत्य दिशेने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्याची साथ लाभल्याने दर्या अधिकच उधाणलेला होता. त्यामुळे अजस्त्र लाटांचा मारा मांडवी जेटीवर होत होता. त्याचबरोबर खडपेवठार, घुडेवठार, चवंडेवठार, राजीवडा या ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांवरून पाणी येत होते. अनेक ठिकाणी पाणी भरल्याचे दिसून आले. मिऱ्यावासीयांची धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची समस्या दरवर्षीची डोकेदुखी ठरली आहे. पंधरामाड ते भाटीमिऱ्या परिसरातील ५०० मीटरचा बंधारा लाटांनी गिळंकृत केल्याने समुद्राचे पाणी गावामध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी त्याची ही समस्या कायम होती. त्यामुळे मिऱ्यावासीयांची दरवर्षीची ही समस्या संपता सपेना, अशी अवस्था झाली आहे. (वार्ताहर)