शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
6
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
7
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
8
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
9
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
10
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
11
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
12
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
13
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
14
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
15
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
16
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
17
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
18
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
19
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
20
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 

प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर भोई समाजाचे उपोषण

By admin | Updated: December 12, 2015 00:13 IST

लोटे औद्योगिक वसाहत : दाभोळ खाडीत रासायनिक पाण्यामुळे मासे मरण्याच्या घटनांमध्ये वाढ; उपोषणात महिलांचा सहभाग

चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे दाभोळ खाडीत मासे मरण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. खाडीतील प्रदूषणाविरोधात शुक्रवारी दाभोळखाडी परिसर संघर्ष समितीतर्फे चिपळूण येथील प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाबाहेर उपोषण करण्यात आले. यावेळी दाभोळ खाडी परिसर संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष पडवळ, सल्लागार विठ्ठल भालेकर, आर. आर. जाधव, शांताराम जाधव, विनायक निवाते, महाराष्ट्र प्रदेश भोई समाजसेवा संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष रामदास पडवळ, संतोष पडवळ, प्रकाश पारधी, उदय जुवळे, कृष्णा पडवळ, दिलीप दिवेकर, केशव सैतवडेकर आदींसह महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दाभोळ खाडीमध्ये लोटे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मरण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे दाभोळ खाडीतील मच्छिमार भोई समाजाचा पारंपरिक मासेमारी व्यवसाय पूर्णत: बंद झाला आहे. या खाडीतील माशांवर उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छिमारांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. गेली १७ वर्ष संघर्ष समितीतर्फे विविध आंदोलने करुन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, अद्यापही या खाडीतील प्रदूषणावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. लोटे येथील सामुदायिक जलशुध्दीकरण प्रकल्पाचे नूतनीकरण व विस्तारीकरणाचे काम तातडीने सुरु करावे. रासायनिक सांडपाणी दाभोळ खाडीत न सोडता रिसायकलिंग करुन परिसरातील झाडांसाठी वापरण्यात यावे. तसेच चिपळूण, खेड, दापोली, गुहागर या तालुक्यातील मच्छिमारांच्या गेल्या ५ वर्षातील मच्छि उत्पादनाचे सर्वेक्षण करुन बाधित कुटुंबांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. मच्छिमार भोई समाजातील कुशल व अकुशल मुलांना लोटे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्यावे. दाभोळ खाडीपट्टयातील गावांना प्रकल्पग्रस्त संबोधून सीएसआरखाली मच्छिमारांचे पुनर्वसन करण्यात यावे. या मागण्यांचा गांभिर्याने विचार व्हावा, अशी मागणी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे. दि. १४ डिसेंबर रोजी चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात प्रदूषणासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले असून, दाभोळ खाडी प्रदूषणमुक्त होण्यासाठी हा लढा सुरुच राहिल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. (वार्ताहर) २६ कोटी मंजूरलोटे औद्योगिक वसाहतीच्या दूषित पाणी शुध्दीकरणासाठी राज्य व केंद्र सरकारने २६ कोटी रुपये मंजूर केले असून, जलशुध्दीकरण केंद्राचे काम सुरु करण्याचे आश्वासन देऊनही हे काम वर्ष झाले तरी सुरु करण्यात आले नाही. विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी शासनाने वेळ न दिल्यास जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलन सुरु करण्यात येईल, असा इशाराही विठ्ठल भालेकर यांनी दिला आहे.