शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

भीमस्तंभ उभारला, वस्तीचे काय?

By admin | Updated: December 17, 2014 23:02 IST

झोपडपट्टीतील महिलांचा सवाल : आरपीआयकडे मांडले गाऱ्हाणे

चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका परिसरात असणारा जयभीम स्तंभ तोडल्याने आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या. नगर परिषद प्रशासनाच्या आदेशानुसार हा स्तंभ पुन्हा उभा राहिला. मात्र, ४० वर्षांहून अधिक काळ असणाऱ्या आमच्या झोपड्यांचे काय, असा सवाल येथील महिलांनी उपस्थित केला आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (कांबळे) गटाचे नेते प्रभाकर जाधव, चिपळूण शाखेचे सरचिटणीस सुभाष सावंत, रिपब्लिकन पक्षाचे चिपळूण अध्यक्ष माधव पवार, सरचिटणीस सुभाष सावंत, सुरेश कदम आदींसह अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्तंभाची माहिती घेतली व वस्तुस्थितीची पाहणी केली. या भागात राहणाऱ्या रहिवाशांजवळ या शिष्टमंडळाने चर्चा केली. गेली अनेक वर्षे आम्ही येथे राहतो. मतदानकार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड आमच्याकडे आहे. मात्र, पिण्यास पाणी नाही, लाईट नाही, शौचालयाची व्यवस्था नाही. मतदानामध्ये आम्ही सहभाग घेतो, असे येथील महिला जयमाला चव्हाण, रेणुका मिसाळ, निर्मला नलावडे, जानकी पवार, सखू राठोड, दुर्गा चलवादे, देवकी चलवादे, लक्ष्मी पोळ तसेच सुरेश माळी, राजेश नलावडे, बबलू पोळ, लालू राठोड यांनी सांगितले. माणूस म्हणून आम्ही जगत असताना आम्हाला मूलभूत सुविधा नाहीत. नगर प्रशासनाने कारवाई करुन स्तंभ तोडल्यानंतर बाबासाहेबांच्या नावाचा स्तंभ बांधून दिला. परंतु, आमच्या मूलभूत गरजांचे काय? हगणदारी मुक्त योजना आली, स्वच्छ भारत अभियान सुरु झाले, डेंग्यु मुक्तीचे अभियान चालू आहे, तरी येथील माणसे मानवताहीन जीवन जगत आहेत. अधिकारी लक्ष देतील काय? असा सवालही यानिमित्ताने केला जात आहे. गेली अनेक वर्षे आम्ही या झोपडपट्टीत राहात असून, आम्हाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.(वार्ताहर)