शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

भातगाव ग्रामस्थांची तहसीलदार कार्यालयावर धडक

By admin | Updated: March 17, 2015 00:10 IST

पाणी अडवल्याची तक्रार : सामोपचाराने तोडगा काढण्याचा ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

गुहागर : भातगाव धक्का येथे पुरुषोत्तम गणेश करमरकर यांनी आपल्या मालकीच्या जागेतून जाणाऱ्या नैसर्गिक झऱ्याचे पाणी अडवल्याप्रकरणी येथील महिला व ग्रामस्थांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडे धाव घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. २० मार्चला याबाबत एकत्र चर्चा करुन सामोपचाराने तोडगा काढला जाणार आहे.भातगाव धक्का येथे ६५ घरांची वस्ती आहे. पिण्याचे पाण्याची टंचाई असल्याने वाडी बाहेरुन जंगलभागातून नैसर्गिक स्रोताचे पाण्यावर अवलंबून राहवे लागते. हे पाणी पुरुषोत्तम गणेश करमरकर नामक ग्रामस्थांच्या मालकीच्या जागेतून येत असल्याने करमरकर यांचेकडून या डोहामध्ये बांधकाम करुन पाणी अडवले होते. याबाबत प्रथम तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर हे बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. यावेळी तलाठी व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत डोहामध्ये पाईप टाकून जनावरांसाठी पिण्याचे पाण्याची सोय करण्यात आली होती, काही दिवसांनी हे पाईप उडवून टाकल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असून, या प्रकारांविरूध्द आता ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. करमरकर व ग्रामस्थांमध्ये हा वाद वाढण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.याबाबत तहसीलदार वैशाली पाटभल, पोलीस निरीक्षक विनित चौघरी, सभापती राजेश बेंडल, पंचायत समिती कक्ष अधिकारी दत्ताराम आंबी, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे जी. व्ही. गायकवाड आदींच्या उपस्थितीत चर्चा झाल्यानंतर २० मार्चला एकत्रित चर्चा करुन तोडगा काढण्याचे ठरले. दरम्यान हा विषय आता गावपातळीवर गाजण्याची शक्यता निर्माण झाले आहे.यावेळी महिला वंदना पाष्टे, इंदिरा मोरे, सुरेखा मोरे, वैशाली सोलकर, उज्वला डिंगणकर, रोहिणी गाडेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)