शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
4
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
5
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
6
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
7
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
8
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
9
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
10
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
11
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
12
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
13
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
14
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
15
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
16
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
17
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
18
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
19
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
20
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?

भातगाव ग्रामस्थांची तहसीलदार कार्यालयावर धडक

By admin | Updated: March 17, 2015 00:10 IST

पाणी अडवल्याची तक्रार : सामोपचाराने तोडगा काढण्याचा ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

गुहागर : भातगाव धक्का येथे पुरुषोत्तम गणेश करमरकर यांनी आपल्या मालकीच्या जागेतून जाणाऱ्या नैसर्गिक झऱ्याचे पाणी अडवल्याप्रकरणी येथील महिला व ग्रामस्थांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडे धाव घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. २० मार्चला याबाबत एकत्र चर्चा करुन सामोपचाराने तोडगा काढला जाणार आहे.भातगाव धक्का येथे ६५ घरांची वस्ती आहे. पिण्याचे पाण्याची टंचाई असल्याने वाडी बाहेरुन जंगलभागातून नैसर्गिक स्रोताचे पाण्यावर अवलंबून राहवे लागते. हे पाणी पुरुषोत्तम गणेश करमरकर नामक ग्रामस्थांच्या मालकीच्या जागेतून येत असल्याने करमरकर यांचेकडून या डोहामध्ये बांधकाम करुन पाणी अडवले होते. याबाबत प्रथम तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर हे बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. यावेळी तलाठी व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत डोहामध्ये पाईप टाकून जनावरांसाठी पिण्याचे पाण्याची सोय करण्यात आली होती, काही दिवसांनी हे पाईप उडवून टाकल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असून, या प्रकारांविरूध्द आता ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. करमरकर व ग्रामस्थांमध्ये हा वाद वाढण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.याबाबत तहसीलदार वैशाली पाटभल, पोलीस निरीक्षक विनित चौघरी, सभापती राजेश बेंडल, पंचायत समिती कक्ष अधिकारी दत्ताराम आंबी, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे जी. व्ही. गायकवाड आदींच्या उपस्थितीत चर्चा झाल्यानंतर २० मार्चला एकत्रित चर्चा करुन तोडगा काढण्याचे ठरले. दरम्यान हा विषय आता गावपातळीवर गाजण्याची शक्यता निर्माण झाले आहे.यावेळी महिला वंदना पाष्टे, इंदिरा मोरे, सुरेखा मोरे, वैशाली सोलकर, उज्वला डिंगणकर, रोहिणी गाडेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)