शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयासह घराबाहेर पाेलीस बंदाेबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

चिपळूण : विधानसभा तालिकाध्यक्ष म्हणून आमदार भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करताच त्यांच्यावर विराेधी पक्षाकडून टीका केली ...

चिपळूण : विधानसभा तालिकाध्यक्ष म्हणून आमदार भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करताच त्यांच्यावर विराेधी पक्षाकडून टीका केली जात आहे. अनेकांनी त्यांच्याबाबत राग व्यक्त केला आहे. राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था जाहीर केल्यानंतर त्यांच्या चिपळूण येथील कार्यालयाबाहेर आणि निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

पावसाळी अधिवेशनाचे दोन्ही दिवस आमदार जाधव यांनीच गाजवले. विधानसभेचे तालिकाध्यक्ष म्हणून पहिल्याच दिवशी संधी मिळताच त्यांनी विरोधी पक्षाला थेट अंगावर घेतले. आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाणारे जाधव यांनी विधानसभेतही आपली आक्रमकता दाखवून दिली. भाजपबरोबर पहिल्याच दिवशी झालेल्या वादात त्यांनी थेट भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केले. त्यामुळे भाजप सदस्य अधिक आक्रमक झाले.

दुसऱ्या दिवशीही आमदार जाधव यांनी नियमांवर बोट ठेवत भाजप सदस्यांना खडेबोल सुनावले. तसेच त्यांना नियमांची आठवणही करून दिली. तसेच विधानभवनाबाहेर प्रति विधानसभा भरवणाऱ्या भाजप सदस्यांसमोरील माइक काढून घेण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. तसेच विधानसभेतही तडाखेबंद भाषण करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यामुळे जाधव भाजपच्या रडारवर आले, तर शिवसेना आणि महाविकास आघाडीत त्यांना प्रचंड महत्त्व प्राप्त झाले.

दरम्यान, आपल्याला धमक्या येत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनीही विधानसभेत त्याचा पुनरुच्चार केला होता. याची दखल घेत राज्य गृह विभागाने आमदार जाधव यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची घोषणा करून वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान केली. मुंबई येथे मंगळवारी रात्रीच त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली, तर चिपळूण येथील त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर तसेच त्यांच्या सुवर्ण भास्कर या निवासस्थानीही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ स्वतः लक्ष ठेवून आहेत.