शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयासह घराबाहेर पाेलीस बंदाेबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

चिपळूण : विधानसभा तालिकाध्यक्ष म्हणून आमदार भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करताच त्यांच्यावर विराेधी पक्षाकडून टीका केली ...

चिपळूण : विधानसभा तालिकाध्यक्ष म्हणून आमदार भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करताच त्यांच्यावर विराेधी पक्षाकडून टीका केली जात आहे. अनेकांनी त्यांच्याबाबत राग व्यक्त केला आहे. राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था जाहीर केल्यानंतर त्यांच्या चिपळूण येथील कार्यालयाबाहेर आणि निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

पावसाळी अधिवेशनाचे दोन्ही दिवस आमदार जाधव यांनीच गाजवले. विधानसभेचे तालिकाध्यक्ष म्हणून पहिल्याच दिवशी संधी मिळताच त्यांनी विरोधी पक्षाला थेट अंगावर घेतले. आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाणारे जाधव यांनी विधानसभेतही आपली आक्रमकता दाखवून दिली. भाजपबरोबर पहिल्याच दिवशी झालेल्या वादात त्यांनी थेट भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केले. त्यामुळे भाजप सदस्य अधिक आक्रमक झाले.

दुसऱ्या दिवशीही आमदार जाधव यांनी नियमांवर बोट ठेवत भाजप सदस्यांना खडेबोल सुनावले. तसेच त्यांना नियमांची आठवणही करून दिली. तसेच विधानभवनाबाहेर प्रति विधानसभा भरवणाऱ्या भाजप सदस्यांसमोरील माइक काढून घेण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. तसेच विधानसभेतही तडाखेबंद भाषण करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यामुळे जाधव भाजपच्या रडारवर आले, तर शिवसेना आणि महाविकास आघाडीत त्यांना प्रचंड महत्त्व प्राप्त झाले.

दरम्यान, आपल्याला धमक्या येत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनीही विधानसभेत त्याचा पुनरुच्चार केला होता. याची दखल घेत राज्य गृह विभागाने आमदार जाधव यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची घोषणा करून वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान केली. मुंबई येथे मंगळवारी रात्रीच त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली, तर चिपळूण येथील त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर तसेच त्यांच्या सुवर्ण भास्कर या निवासस्थानीही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ स्वतः लक्ष ठेवून आहेत.