शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

वहाळ आरोग्य केंद्र सलाईनवर

By admin | Updated: August 29, 2016 23:19 IST

तीन तालुक्यांसाठी सोयीस्कर : पाच उपकेंद्रांना स्वमालकीची जागा नाही

सावर्डे : चिपळूण, संगमेश्वर आणि गुहागर या तीन तालुक्यातील जनतेला सोयीस्कर असलेल्या दुर्गम भागातील वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती पाहता ते सलाईनवर चालत आहे, अशी स्थिती आहे. २५ हजार लोकसंख्या आणि १९ गावांच्या कार्यक्षेत्रातील ८पैकी ५ उपकेंद्रांना स्वमालकीच्या इमारती नाहीत. यामुळे येथील आरोग्य सुविधा ना घर का ना घाट का अशी विदायक स्थिती होऊन बसली आहे.येथील सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार दिवसेंदिवस राम भरोसे चालला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. १९ गावांतील ८ उपकेंद्रात कार्यरत असणाऱ्या आरोग्यसेविका, आरोग्यसेवकांनी कार्यक्षेत्रातील गावात राहाणे बंधनकारक असतानाही सर्व कर्मचारी शहरात राहात असल्याने रात्री-अपरात्री प्राथमिक उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना अन्य खासगी दवाखान्याकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे आरोग्य खात्याने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या आरोग्य केंद्राचा उद्देश सफल होताना दिसत नाही.शासनाच्या विविध योजना, विनामूल्य व माफक दरात असताना कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे प्राथमिक दर्जाच्या व प्रसुतीसारख्या सुविधांचा व योजनांचा लाभ योग्य वेळेत या यंत्रणेकडून मिळत नसल्याने ग्रामस्थांना उपचारासाठी खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागतो.या केंद्रांतर्गत असलेली कळंबट व निवळी ही उपकेंद्र स्वमालकीच्या इमारतीत आहेत. परंतु आबिटगाव, नायशी, वीर, पिलवली, मुर्तवडे ही पाच उपकेंद्र संबंधित गावामध्ये भाडेतत्त्वावर कार्यरत आहेत. या केंद्रामध्ये दररोज १००हून अधिक बाह्य रुग्ण उपचारासाठी येत असतात. या केंद्रामध्ये २ वैद्यकीय अधिकारी, २ आरोग्य सहाय्यक (पुरुष), एक आरोग्य सहाय्यक महिला, १ आरोग्यसेवक, १ कनिष्ठ सहाय्यक वाहनचालक, ३ परिचर, १ महिला परिचर, सफाई कामगार असे १४ कर्मचारी कार्यरत आहेत. निवास व्यवस्था पुरेशी नसल्याने येथील १४पैकी ९ कर्मचाऱ्यांनी खासगी निवासस्थानाचा आश्रय घेतला. शवविच्छेदन करताना कटरची नेमणूक नाही. प्रयोगशाळा, साधन सामुग्री व तंत्रज्ञ यांचा अभाव आहे. येथील शवविच्छेदन खोलीला गळती लागली असून, परिसरात गवताचे आच्छादन वाढले आहे. पुरेशी लाईट व्यवस्था नाही. गवत, झाडेझुडपांनी या केंद्राचा काही भाग वेढलेला आहे. या केंद्रांतर्गत आजपर्यंत ५०हून अधिक प्रसुती झाल्या आहेत. अतिशय दुर्गम भागात असलेले हे आरोग्य केंद्र सामान्य जनतेसाठी वरदान ठरले असले तरी येथे असणाऱ्या रुग्णसुविधांच्या अभावामुळे हे केंद्र सातत्यपूर्ण चर्चेत येत आहे. (वार्ताहर)