शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सुशिक्षितांपेक्षा अडाणी बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:29 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ ही प्रशासनाने विशेष मोहीम नुकतीच पूर्ण केली आहे. या मोहिमेदरम्यान सुशिक्षित लोकांपेक्षा ...

रत्नागिरी : जिल्ह्यात ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ ही प्रशासनाने विशेष मोहीम नुकतीच पूर्ण केली आहे. या मोहिमेदरम्यान सुशिक्षित लोकांपेक्षा अशिक्षित लोकच कोरोनाबाबत खबरदारी घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामीण भागातील लोकांनी कोरोनाला रोखण्यात यश मिळविले आहे. मात्र शहरी भागातील लोकांकडून बेफिकिरी दाखविली जात आहे.

अनुदानाअभावी वेतन ठप्प

रत्नागिरी : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत काम करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे वेतन अद्याप मिळालेले नाही. कोरोना काळात या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचे वेतनच दिले गेले नसल्याने आर्थिक समस्या उभ्या राहिल्या आहेत.

यंत्रणा वेठीला

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळाने झोडपून काढले. यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आता कोकणातील अनेक भागात सत्ताधारी पक्षाचे तसेच विरोधी पक्षातील नेतेमंडळी मोठ्या प्रमाणावर दौऱ्यावर येत आहेत. यामुळे सध्या कोरोना तसेच आपत्तीच्या नियोजनाच्या धावपळीत असलेल्या यंत्रणांवरच अधिक ताण येत आहे.

आरोग्य विभागाचे आवाहन

चिपळूण : दुसऱ्या लाटेतील कोरोनाचे स्वरूप बदलले आहे. कोरोनाचे संक्रमण हवेत होण्याचा धोका आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे. कोरोनापासून सुरक्षितता मिळविण्यासाठी नागरिकांनी दुहेरी मास्क वापरावा, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन कसोशीने करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.