शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाईटपणा आला तरी बेहत्तर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST

७३व्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतींना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य भारतीय राज्य घटनेच्या लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये निवडणुकीद्वारे निवडून ...

७३व्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतींना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य भारतीय राज्य घटनेच्या लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये निवडणुकीद्वारे निवडून आलेले असतात. ग्रामपंचायत देशातील लोकशाहीचा मूळ पाया आहे. तसेच ग्रामपंचायतीला विकासाचा कणा मानले जाते. आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर कठपुतळी बाहुलीसारखे आपण कुणाच्या तरी दोराला बांधले नसल्याचे स्मरण व्हावे. आपली सावली आपणच निर्माण करायला हवी. निसर्गाच्या नियमानुसार मोठ्या वृक्षाच्या खाली लहान झाडे कधीच मोठी होत नाहीत. समाजात आपल्या ज्ञानानुसार किंमत ठरविली जाते. शासकीय कामकाजात प्रशासकीय अधिकारी समोरच्या व्यक्तीच्या ज्ञानाच्या औकातीप्रमाणे सहकार्य करण्यास तत्परता दाखवितात. पक्ष, पार्टी, नेता म्हणून नव्हे. कदाचित दाखवत असतील तर तो क्षणिक फार्स समजावा. कोणतेही सार्वजनिक अथवा वैयक्तिक काम करून घेण्यासाठी कोणत्याही नेत्याच्या अथवा पुढाऱ्याची आवश्यकता नसते. प्रशासनाला कायद्यानुसार काम करणे अनिवार्य असतं. कोरोनाच्या परिस्थितीत प्रशासन आपली जबाबदारी चोख बजावत आहे. आता केवळ प्रत्येकाने प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे. मग अशा कामासाठी समाजात किंवा गावात वाईटपणा आला तरी चालेल. पण गप्प बसून राहिलो, तर त्याचे परिणाम सहन करावे लागतील. प्रत्येकानेच याचे भान ठेवून पुढाकार घेण्याची गरज आहे. ग्राम कृती दलाच्या साथीने सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीसपाटील, ग्रामसेवक, ग्राम कमिटी, देवस्थान व अन्य संस्थांनी जबाबदारी स्वीकारण्याची हीच खरी वेळ आहे. केवळ कोरोनाला हरवण्यासाठी नव्हे, तर गावातून हद्दपार करण्यासाठी एक पाऊल प्रत्येकाने टाकण्याची गरज आहे. त्यासाठी गावातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले, तर त्याच्या घरातील सदस्यांची वेळीच कोरोना चाचणी करून घ्यावी. दशक्रिया व उत्तरकार्य विधी गाव व समाज जमवून न करता घरगुती पध्दतीने पूर्ण करावेत. तसेच या विधीसाठी गावागावातून येणाऱ्यांना आता थांबवायला हवे. तरच गावागावातून होणारा प्रादुर्भाव नियंत्रणात येऊ शकतो. चिपळुणात नुकत्याच झालेल्या एका आढावा बैठकीत पहिल्या लॉकडाऊनमध्ये ग्रामस्थांचे जसे सहकार्य मिळाले, तसे आता मिळत नाही. गावात कोणी वाईटपणा घेण्यास तयार नाही, असे सांगितले गेले. यावर आमदार भास्कर जाधव यांनी जिथे जिथे वाईटपणा आडवा येत आहे, तिथे मला सांगा, वाईटपणा आला तरी बेहत्तर अशी भूमिका स्पष्ट केली. याच पद्धतीने प्रत्येकाने पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.

- संदीप बांद्रे