शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वाईटपणा आला तरी बेहत्तर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST

७३व्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतींना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य भारतीय राज्य घटनेच्या लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये निवडणुकीद्वारे निवडून ...

७३व्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतींना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य भारतीय राज्य घटनेच्या लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये निवडणुकीद्वारे निवडून आलेले असतात. ग्रामपंचायत देशातील लोकशाहीचा मूळ पाया आहे. तसेच ग्रामपंचायतीला विकासाचा कणा मानले जाते. आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर कठपुतळी बाहुलीसारखे आपण कुणाच्या तरी दोराला बांधले नसल्याचे स्मरण व्हावे. आपली सावली आपणच निर्माण करायला हवी. निसर्गाच्या नियमानुसार मोठ्या वृक्षाच्या खाली लहान झाडे कधीच मोठी होत नाहीत. समाजात आपल्या ज्ञानानुसार किंमत ठरविली जाते. शासकीय कामकाजात प्रशासकीय अधिकारी समोरच्या व्यक्तीच्या ज्ञानाच्या औकातीप्रमाणे सहकार्य करण्यास तत्परता दाखवितात. पक्ष, पार्टी, नेता म्हणून नव्हे. कदाचित दाखवत असतील तर तो क्षणिक फार्स समजावा. कोणतेही सार्वजनिक अथवा वैयक्तिक काम करून घेण्यासाठी कोणत्याही नेत्याच्या अथवा पुढाऱ्याची आवश्यकता नसते. प्रशासनाला कायद्यानुसार काम करणे अनिवार्य असतं. कोरोनाच्या परिस्थितीत प्रशासन आपली जबाबदारी चोख बजावत आहे. आता केवळ प्रत्येकाने प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे. मग अशा कामासाठी समाजात किंवा गावात वाईटपणा आला तरी चालेल. पण गप्प बसून राहिलो, तर त्याचे परिणाम सहन करावे लागतील. प्रत्येकानेच याचे भान ठेवून पुढाकार घेण्याची गरज आहे. ग्राम कृती दलाच्या साथीने सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीसपाटील, ग्रामसेवक, ग्राम कमिटी, देवस्थान व अन्य संस्थांनी जबाबदारी स्वीकारण्याची हीच खरी वेळ आहे. केवळ कोरोनाला हरवण्यासाठी नव्हे, तर गावातून हद्दपार करण्यासाठी एक पाऊल प्रत्येकाने टाकण्याची गरज आहे. त्यासाठी गावातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले, तर त्याच्या घरातील सदस्यांची वेळीच कोरोना चाचणी करून घ्यावी. दशक्रिया व उत्तरकार्य विधी गाव व समाज जमवून न करता घरगुती पध्दतीने पूर्ण करावेत. तसेच या विधीसाठी गावागावातून येणाऱ्यांना आता थांबवायला हवे. तरच गावागावातून होणारा प्रादुर्भाव नियंत्रणात येऊ शकतो. चिपळुणात नुकत्याच झालेल्या एका आढावा बैठकीत पहिल्या लॉकडाऊनमध्ये ग्रामस्थांचे जसे सहकार्य मिळाले, तसे आता मिळत नाही. गावात कोणी वाईटपणा घेण्यास तयार नाही, असे सांगितले गेले. यावर आमदार भास्कर जाधव यांनी जिथे जिथे वाईटपणा आडवा येत आहे, तिथे मला सांगा, वाईटपणा आला तरी बेहत्तर अशी भूमिका स्पष्ट केली. याच पद्धतीने प्रत्येकाने पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.

- संदीप बांद्रे