शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

वाईटपणा आला तरी बेहत्तर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST

७३व्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतींना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य भारतीय राज्य घटनेच्या लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये निवडणुकीद्वारे निवडून ...

७३व्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतींना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य भारतीय राज्य घटनेच्या लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये निवडणुकीद्वारे निवडून आलेले असतात. ग्रामपंचायत देशातील लोकशाहीचा मूळ पाया आहे. तसेच ग्रामपंचायतीला विकासाचा कणा मानले जाते. आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर कठपुतळी बाहुलीसारखे आपण कुणाच्या तरी दोराला बांधले नसल्याचे स्मरण व्हावे. आपली सावली आपणच निर्माण करायला हवी. निसर्गाच्या नियमानुसार मोठ्या वृक्षाच्या खाली लहान झाडे कधीच मोठी होत नाहीत. समाजात आपल्या ज्ञानानुसार किंमत ठरविली जाते. शासकीय कामकाजात प्रशासकीय अधिकारी समोरच्या व्यक्तीच्या ज्ञानाच्या औकातीप्रमाणे सहकार्य करण्यास तत्परता दाखवितात. पक्ष, पार्टी, नेता म्हणून नव्हे. कदाचित दाखवत असतील तर तो क्षणिक फार्स समजावा. कोणतेही सार्वजनिक अथवा वैयक्तिक काम करून घेण्यासाठी कोणत्याही नेत्याच्या अथवा पुढाऱ्याची आवश्यकता नसते. प्रशासनाला कायद्यानुसार काम करणे अनिवार्य असतं. कोरोनाच्या परिस्थितीत प्रशासन आपली जबाबदारी चोख बजावत आहे. आता केवळ प्रत्येकाने प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे. मग अशा कामासाठी समाजात किंवा गावात वाईटपणा आला तरी चालेल. पण गप्प बसून राहिलो, तर त्याचे परिणाम सहन करावे लागतील. प्रत्येकानेच याचे भान ठेवून पुढाकार घेण्याची गरज आहे. ग्राम कृती दलाच्या साथीने सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीसपाटील, ग्रामसेवक, ग्राम कमिटी, देवस्थान व अन्य संस्थांनी जबाबदारी स्वीकारण्याची हीच खरी वेळ आहे. केवळ कोरोनाला हरवण्यासाठी नव्हे, तर गावातून हद्दपार करण्यासाठी एक पाऊल प्रत्येकाने टाकण्याची गरज आहे. त्यासाठी गावातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले, तर त्याच्या घरातील सदस्यांची वेळीच कोरोना चाचणी करून घ्यावी. दशक्रिया व उत्तरकार्य विधी गाव व समाज जमवून न करता घरगुती पध्दतीने पूर्ण करावेत. तसेच या विधीसाठी गावागावातून येणाऱ्यांना आता थांबवायला हवे. तरच गावागावातून होणारा प्रादुर्भाव नियंत्रणात येऊ शकतो. चिपळुणात नुकत्याच झालेल्या एका आढावा बैठकीत पहिल्या लॉकडाऊनमध्ये ग्रामस्थांचे जसे सहकार्य मिळाले, तसे आता मिळत नाही. गावात कोणी वाईटपणा घेण्यास तयार नाही, असे सांगितले गेले. यावर आमदार भास्कर जाधव यांनी जिथे जिथे वाईटपणा आडवा येत आहे, तिथे मला सांगा, वाईटपणा आला तरी बेहत्तर अशी भूमिका स्पष्ट केली. याच पद्धतीने प्रत्येकाने पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.

- संदीप बांद्रे