शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

अक्षरातून व्यक्तिमत्त्व समजते!

By admin | Updated: January 17, 2015 00:11 IST

अच्युत पालव : डीबीजे महाविद्यालयात मांडले विचार

अडरे : ‘अक्षर’ हे माणसाच्या शरीरातील अवयवासारखे असते. अक्षरामुळे माणसाचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव समजतो. आपण अक्षरावर जीव लावत नाही, तोपर्यंत अक्षर वळणदार, उठावदार दिसणार नाही. जेव्हा रेषेतील अंतर कळतं, तेव्हा माणसातील अंतर कळतं, असं मत सुलेखनकार अच्युत पालव यांनी व्यक्त केलं. नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक चेअरमन रावसाहेब खातू व्याख्यानमालेत ‘ऐसी अक्षरे’ या विषयावर डीबीजे महाविद्यालयाच्या प्रांगणात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा विद्याताई घाणेकर होत्या. संस्थेचे विद्यमान चेअरमन सुचय रेडीज, व्हाईस चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. श्याम जोशी, श्रीराम रेडीज, अविनाश जोशी, सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम दलवाई, महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य पी. बी. कांबळे, प्रा. विनायक होमकळस, प्रा. सुहास बारटक्के उपस्थित होते. यावेळी पालव म्हणाले की, संस्थेच्या जडणघडणीत रावसाहेबांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या योगदानामुळे महाविद्यालयाने ४९ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांनी माणसे जोडण्याचे काम केले. त्याप्रमाणे आपणसुद्धा माणसे जोडण्याचे काम केले पाहिजे. अक्षराचे विज्ञान समजून घेतले पाहिजे. कलेकडे बघत असताना कला म्हणून बघा, छंद म्हणून नको. कलेला धर्म, जात नसते, असे विचार त्यांनी मांडले. प्रा. स्नेहल कुलकर्णी यांनी मान्यवरांचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विनायक बांद्रे यांनी केले. संस्थेचे सेक्रेटरी माधव चितळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)