शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

हुलकावणी देणाऱ्या यशाने जिद्दीपुढे झुकवली मान

By admin | Updated: May 20, 2016 22:47 IST

जिद्दीला चिकाटीची जोड : जितेंद्र सैतवडेकरच्या मत्स्य पदार्थांची आॅस्ट्रेलियापर्यंत भरारी

संकेत गोयथळे--गुहागर --कुठलाही व्यवसाय यशस्वीपणे चालवायचा म्हणजे व्यवसायातील आवडीबरोबरच त्याला जिद्द, चिकाटी व मेहनतीची जोड द्यावी लागते. कोकणी माणूस अनेकवेळा यामध्ये खडा उतरत नाही. मात्र, याला बगल देत अंजनवेल येथील जितेंद्र सीताराम सैतवडेकर या २८ वर्षीय तरुणाने दोनवेळा व्यवसायात मोठे नुकसान पत्करल्यानंतरही खचून न जाता शुभ्रा फुडस्द्वारे मच्छीच्या विविध रुचकर पदार्थ विक्रीचा व्यवसाय काही महिन्यातच यशस्वी करुन तरुणांसमोर एक आदर्श ठेवला आहे. जितेंद्रने १२ वी पर्यंतचे शिक्षण गुहागर येथे पूर्ण केले. त्यावेळी त्याच्या वडिलांना बोटीवर खलाशी म्हणून फक्त १८०० रुपये पगार होता. सामायिक घरात एक लहानशी खोली व दोन भाऊ, दोन बहिणी व आई - वडील असे सहाजणांचे कुटुंब दाटीवाटीने रहात होते. वडिलांचा पगार कमी असल्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्याने कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली. नाकरी करत असतानाच सिएफएल बल्ब बनविण्याचे कामही सुरु केले. यामध्ये संबंधितांनी दीड लाखाला फसविले. पुढे कंपनीमधूनही ‘ब्रेक’ मिळाला. हाताला काही काम नाही म्हणून टाळकेश्वर मच्छीमार संस्थेच्या माध्यमातून कर्ज काढून बिगरयांत्रिकी डिपको (नौका) तीन वर्षे चालविली. यामध्ये मनुष्यबळाचा प्रश्न भेडसावू लागल्याने हा व्यवसायही त्याने बंद केला. या दरम्यान त्याचे लग्न झाले. वाढत्या संसाराचा खर्च भागवायचा कसा, हा मोठा पश्न त्याच्यापुढे होता.यावेळी अंजनवेल येथे नव्याने सुरु झालेल्या बँक आॅफ इंडिया शाखेच्या व्यवस्थापकांशी त्याने संपर्क साधला. कर्ज प्रकरण करुन ‘युज अ‍ॅण्ड थ्रो’ पेन बनविण्याचा व्यवसाय सुरु केला. यामध्येही त्याला ५० हजारांचे नुकसान सोसावे लागले व हा व्यवसायही बंद करण्याची वेळ आली. अशावेळी काय करायचे हे सूचत नव्हते. तरीही त्याने जिद्द सोडली नाही. अंजनवेल येथील एका बचत गटामार्फत मच्छीपासून पॅकेटबंद टिकाऊ पदार्थ बनविले जातात. याला चांगली मागणीही होती. मात्र, काही कारणास्तव या बचत गटाला व्यवसाय बंद करावा लागणार होता. मात्र, जितेंद्र याने याच व्यवसायावर आपण लक्ष केंद्रीत केले तर नक्की यश येईल असा सकारात्मक विचार करत पुन्हा बँक आॅफ इंडियाकडून एक लाखाचे कर्ज घेतले. यावेळी बँक व्यवस्थापकांनी मार्केटींगमध्ये उतरण्याचा सल्ला दिला. अनुभव नव्हता पण जिद्द व मेहनत करण्याची तयारी होती. इंटरनेटवरुन माहिती घेतली असता, मच्छीपासून पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण रत्नागिरी येथील आगरनरळ मच्छीमार सोसायटीमार्फत दिले जाते. हे प्रशिक्षण मकरंद व श्रीकांत शालंदर यांनी त्याला दिले.त्यानंतर त्याने शुभ्रा फुडस्ची सुरुवात करत प्रक्रिया करुन कोळंबी, शिंपले, कालवी लोणचं तसेच जवळा व बोेंबील चटणी बनविण्यास सुरु केली. काही महिन्यातच मोठ्या प्रमाणात आॅर्डर मिळू लागल्या. गोपाळगडावर येणारा पर्यटक तसेच धोपावे फेरीबोटीमध्ये स्टॉल लावून पर्यटकांना हे पदार्थ विक्री केले जातात. गुहागर शहर तसेच चौपाटीवरही शुभ्रा फुडस्चे पदार्थ उपलब्ध करुन त्याने व्यवसाय वाढवला. भविष्यात माशांपासून पापड बनविण्याचा त्याचा प्रयत्न असून, यासाठी तीन लाखापर्यंत गुंतवणूक खर्च अपेक्षित असल्याचे जितेंद्र सांगतो. या कामात जितेंद्रचे सर्व कुटुंबिय मदत करतात. तसेच यामुळे गावातील महिलांनाही त्याने रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. बाजारपेठेसह आॅस्ट्रेलियालाही तो निर्यात करत असून, भविष्यात हा व्यवसाय मोठा करण्याचे स्वप्न असल्याचे जितेंद्र सांगतो.