शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

गांधींमुळेच बहुजन मागासलेले

By admin | Updated: November 21, 2015 00:19 IST

वामन मेश्राम : भारत मुक्ती मोर्चाचे रत्नागिरीत जिल्हा अधिवेशन

रत्नागिरी : बहुजन समाज आज मागासलेला आहे आणि याला जबाबदार महात्मा गांधी आहेत, असा आरोप भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. भारत मुक्ती मोर्चा रत्नागिरी जिल्हा अधिवेशनप्रसंगी मराठा मंदिर सभागृहात ते बोलत होते.यावेळी त्यांच्यासमवेत रत्नागिरी जिल्ह्यातील इतिहास संशोधक श्रीकांत शेट्ये, रत्नागिरी जिल्हा कोकण बँक उपाध्यक्ष बशीर मुर्तुझा उपस्थित होते. मेश्राम म्हणाले की, भारतामध्ये इंग्रज स्वातंत्र्याच्या १५० वर्षे आधी आले होते. पण त्यापूर्वी हजारो वर्षे ब्राह्मणांनी बहुजन समाजाला आपले गुलाम केले होते व नंतर इंग्रजांनी ब्राह्मणांना गुलाम केले. परिणामी बहुजन समाज गुलामांचा गुलाम बनला. स्वातंत्र्यानंतर ब्राह्मण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण बहुजन समाज आजही ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला नाही म्हणून तो आजही मागासलेला आहे, असे ते म्हणाले.मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस सरकारने नेहमीच जाती - पातीचे राजकारण केले. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी मराठा, मुस्लिम, लिंगायत व धनगर अशा आरक्षणाच्या घोषणा निवडणुकीपूर्वी केल्या व निवडणुकीनंतर हीच आरक्षणे न्यायालयामध्ये ठेवली असा आरोपही त्यांनी केला. देशात सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण सुरु करण्याचा मुद्दाही त्यांनी यावेळी छेडला. ओबीसी जातीनिहाय मोजणी झाली तर ओबीसी संख्या किती आहे हे जनतेला माहिती होईल व सत्ता हाती ठेवण्यासाठी अडचण निर्माण होईल, असेही ते यावेळी म्हणाले. (वार्ताहर)भारत मुक्ती मोर्चातर्फे रत्नागिरीत आयोजित केलेल्या जिल्हा अधिवेशनाला जिल्हाभरातून बांधव उपस्थित होते. त्यामुळे या अधिवेशनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. अधिवेशनामध्ये बहुजन समाजासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मतांसाठी बहुजन समाजाचा वापर करणाऱ्या राज्यकर्त्यांवर जोरदार टीका केली.