शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गांधींमुळेच बहुजन मागासलेले

By admin | Updated: November 21, 2015 00:19 IST

वामन मेश्राम : भारत मुक्ती मोर्चाचे रत्नागिरीत जिल्हा अधिवेशन

रत्नागिरी : बहुजन समाज आज मागासलेला आहे आणि याला जबाबदार महात्मा गांधी आहेत, असा आरोप भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. भारत मुक्ती मोर्चा रत्नागिरी जिल्हा अधिवेशनप्रसंगी मराठा मंदिर सभागृहात ते बोलत होते.यावेळी त्यांच्यासमवेत रत्नागिरी जिल्ह्यातील इतिहास संशोधक श्रीकांत शेट्ये, रत्नागिरी जिल्हा कोकण बँक उपाध्यक्ष बशीर मुर्तुझा उपस्थित होते. मेश्राम म्हणाले की, भारतामध्ये इंग्रज स्वातंत्र्याच्या १५० वर्षे आधी आले होते. पण त्यापूर्वी हजारो वर्षे ब्राह्मणांनी बहुजन समाजाला आपले गुलाम केले होते व नंतर इंग्रजांनी ब्राह्मणांना गुलाम केले. परिणामी बहुजन समाज गुलामांचा गुलाम बनला. स्वातंत्र्यानंतर ब्राह्मण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण बहुजन समाज आजही ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला नाही म्हणून तो आजही मागासलेला आहे, असे ते म्हणाले.मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस सरकारने नेहमीच जाती - पातीचे राजकारण केले. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी मराठा, मुस्लिम, लिंगायत व धनगर अशा आरक्षणाच्या घोषणा निवडणुकीपूर्वी केल्या व निवडणुकीनंतर हीच आरक्षणे न्यायालयामध्ये ठेवली असा आरोपही त्यांनी केला. देशात सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण सुरु करण्याचा मुद्दाही त्यांनी यावेळी छेडला. ओबीसी जातीनिहाय मोजणी झाली तर ओबीसी संख्या किती आहे हे जनतेला माहिती होईल व सत्ता हाती ठेवण्यासाठी अडचण निर्माण होईल, असेही ते यावेळी म्हणाले. (वार्ताहर)भारत मुक्ती मोर्चातर्फे रत्नागिरीत आयोजित केलेल्या जिल्हा अधिवेशनाला जिल्हाभरातून बांधव उपस्थित होते. त्यामुळे या अधिवेशनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. अधिवेशनामध्ये बहुजन समाजासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मतांसाठी बहुजन समाजाचा वापर करणाऱ्या राज्यकर्त्यांवर जोरदार टीका केली.