शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दीड दिवसांतच बीडीएस प्रणाली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने मार्चअखेरीस बंद केलेली बीडीएस प्रणाली एका दिवसापुरतीच सुरू झाली होती. गुरुवारी सुरू झालेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शासनाने मार्चअखेरीस बंद केलेली बीडीएस प्रणाली एका दिवसापुरतीच सुरू झाली होती. गुरुवारी सुरू झालेली बीडीएस प्रणाली दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी बंद पडली. त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे.

राज्य शासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून दरमहा १० टक्के रक्कम प्रोव्हिडंट फंडात जमा होते. त्या रकमेवर शासन दरवर्षी व्याजही देते. राज्य शासकीय कर्मचारी अथवा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आपल्या कौटुंबिक अडचणी सोडविण्यासाठी वापरत असतात. लग्नसमारंभ, वैद्यकीय उपचार, मुलांचे शिक्षण, घरबांधणी, तसेच अचानक आलेल्या अडीअडचणींसाठी या प्रोव्हिडंट फंडात जमा असणारी रक्कम काढली जाते.

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत शिक्षकांना फंडातील रक्कम मंजुरीसाठी सर्व प्रस्ताव तालुका स्तरावरून जिल्हा परिषदेला मान्यतेसाठी पाठवण्यात येतात. शिक्षण विभाग, अर्थविभाग, कोषागार विभागाची मान्यता मिळण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी जातो. ही प्रक्रिया खूपच वेळखाऊ आहे. मार्च, २०२१ पासून बीडीएस प्रणाली बंद असल्याने कर्मचारी, शिक्षक यांना आर्थिक समस्यांना सामोरे जाव लागत आहे. काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, तर काही मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना आपल्या हक्काची रक्कम मिळणे कठीण होऊन बसले आहे. त्यासाठी अनेकदा जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. मात्र, बीडीएस प्रणाली बंद असल्याचे एकच उत्तर त्यांना ऐकावयास मिळते. ही अडचण लक्षाण घेऊन बीडीएस प्रणाली तातडीने खुली करण्याची मागणी सर्वच शिक्षक संघटनांकडून वारंवार करण्यात येत आहे.

दरम्यान, शासनाने ही प्रणाली गुरुवारी सुरू केली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेकडून सुमारे ४५ प्रकरणे मार्गी लागली आहेत. मात्र, दुसऱ्याच दिवशी ही प्रणाली बंद करण्यात आली की बंद पडली हे सांगता येत नाही. मात्र, ही प्रणाली केवळ एकच दिवस सुरू होती. त्यामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.