शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बावनदी पुलाला काठ्यांचा आधार

By admin | Updated: October 6, 2015 00:17 IST

संगमेश्वर तालुका : अपघात घडल्यास मोठ्या दुर्घटनेची दाट शक्यता

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील देवरुख - साखरपा मार्गावरील बावनदी पुलाच्या तुटलेल्या कठड्याला काठ्यांचा आधार देण्यात आला आहे. या ठिकाणी अपघात झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमस्वरुपी कठडा बांधावा, अशी मागणी वाहन चालकांमधून करण्यात आली आहे.देवरुख - साखरपा मार्गावरुन नेहमी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हा मार्ग पश्चिम महाराष्ट्राकडे जाण्यासाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे वाहनचालक याच मार्गाला पसंती देतात. तसेच पश्चिम महाराष्ट्रातून संगमेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याच्या गाड्या येत असतात. त्याचबरोबर साखरपा परिसरातील नागरिकही कामानिमित्ताने याच मार्गाने देवरुखात येत असतात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते.परंतु, काही महिन्यांपूर्वी बावनदी पुलाचा कठडा तोडून एक ट्रक थेट नदीपात्रात कोसळला होता. सुदैवाने या अपघातातून ट्रकचालक बचावला होता. मात्र, ट्रकचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. यानंतर पुलाच्या तुटलेल्या कठड्याला सार्वजनिक बांधकाम विभागाने काठ्यांचा आधार दिला होता. अद्यापही या पुलाला हा काठ्यांचा आधार कायम आहे.या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असल्यामुळे या पुलावर दुर्दैवाने अपघात घडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. ही दुर्घटना रोखायची असेल तर पुलाच्या कठड्याला असलेल्या काठ्यांच्या आधाराऐवजी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमस्वरुपी कठडा बांधणे अत्यंत गरजेचे बनले आहे. सद्यस्थितीला पुलाच्या कठड्याला देण्यात आलेला काठ्यांचा आधार कमकुवत ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणी तत्काळ सिमेंटचा कठडा बाधंणे आवश्यक बनले आहे. यावर संबंधीत खात्याने लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. (वार्ताहर)