शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहनांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST

रत्नागिरी : गणेशोत्सव काळात पाच दिवस अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी ...

रत्नागिरी : गणेशोत्सव काळात पाच दिवस अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. दि. ८ ते १० सप्टेंबर आणि १४ ते १९ सप्टेंबर या कालावधीत महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

कचऱ्याचे ढीग

राजापूर : शहरात दररोज कचरा नेण्यासाठी घरोघरी घंटागाडी जाते. तरीही शहरातील अनेक रस्त्यांवर कचऱ्याचे ढीगच ढीग उभे राहिलेले दिसतात. या कचऱ्याच्या ढिगामुळे रस्त्यावर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नवजीवन हायस्कूल, कोंढेतड विसर्जन घाट येथे कचऱ्याच्या पिशव्या टाकल्या जात असल्याने श्वानांकडून हा कचरा इतस्त: पसरला जात आहे.

एस. टी. बस सुरु

सावर्डे : राज्य परिवहन महामंडळ सातारा विभागाच्या पाटण आगारातर्फे कोकणातील गणेशभक्तांसाठी २५ ऑगस्टपासून बससेवा सुरु करण्यात आली आहे. स्वारगेट, कोथरुड, वारजे, पाटण ते चिपळूण कासे अशी ही बससेवा सुरु झाली आहे. या गाडीचे आगाऊ आरक्षण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

गरजू कुटुंबांना मदत

चिपळूण : २२ जुलै रोजी झालेली अतिवृष्टी व महापुराचा फटका चिपळूण शहर व परिसरातील गावांना बसला आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गावातील ५० पूरबाधित व्यक्तींना धामणवणे ग्रामपंचायतीच्यावतीने गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यासाठी सरपंच सुनील सावंत यांनी पुढाकार घेतला.

वित्तीय साक्षरता केंद्र

रत्नागिरी : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक साक्षरता प्रकल्पांतर्गत रत्नागिरी येथे मनी वाईज साक्षरता केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. जिल्ह्याची लीड बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून क्रिसील फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हा आर्थिक साक्षरता उपक्रम तालुक्यात राबवला जात आहे.