शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बंदी उठूनही मासेमारी गाळात

By admin | Updated: August 6, 2015 23:42 IST

मच्छीमार संकटात : गाळाच्या समस्येसह वातावरणातील बदलांचा फटका

रत्नागिरी : किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने मच्छिमारांना सावधानतेचा इशारा मत्स्य विभागाकडून दिला होता. हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे मासेमारी नौका किनारी नांगरावर आहेत. आधीच गाळाच्या समस्येमुळे हैराण झालेल्या मच्छीमारांना आता वातावरणातील बदलाने आणखीनच संकटात टाकले आहे.खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदी उठून पाच दिवस उलटले आहेत. अजूनही समुद्र शांत झालेला नाही. सोसाट्याच्या वाऱ्यासह समुद्रामध्ये उंच लाटा उडत असल्याने मच्छिमारांना समुद्रात जाणे अजूनही धोकादायकच आहे. तरीही काही मच्छिमार जीव मुठीत धरुन खोल समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. जीव धोक्यात घालून मासेमारी करीत असले तरी मिळणाऱ्या कोळंबीला आवश्यक तो दर मिळत नसल्याचे मच्छिमारांमध्ये नाराजीचा सूर उमठत आहे. गेले काही दिवस शांत असलेल्या पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यात पावसाच्या सरींवर सरी कोसळत असून सोसाट्याचा वाराही वाहत आहे. तसेच लाटा उसळत आहेत. समुद्र किनारी भागांमध्ये कोकणात जोरदार वारे व पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सावधानतेचा इशाराही दिला होता. या इशाऱ्यानंतर गेले दोन दिवस वातावरणामध्ये सतत बदल सुरु होते. त्यामुळे मच्छिमारही चिंतेते होते. या इशाऱ्यानंतर नौका दोन दिवस नांगरावर आहेत. (शहर वार्ताहर)६ आॅगस्ट २०१५ रोजी रात्रौ ११.३० वाजेपर्यंत मालवण ते वसई किनारपट्टी दरम्यान २.५ ते २.९ मिटर उंचीच्या लाटा उठण्याची शक्यता आहे. पाण्याचा प्रवाह ६२ ते ६९ सें.मी. प्रती सेकंड राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय आणि रिलायन्स फाऊंडेशनने मच्छिमारांना देण्यात आला होता. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १८००-४१९-८८०० संपर्क साधण्याचे आवाहन मच्छिमारांना करण्यात आले आहे. मात्र, गुरुवारी सतत बदलत्या वातावरणामुळे मच्छिमार धोका पत्करण्यास तयार नाहीत.