शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

बहुजनांचा एल्गार

By admin | Updated: January 17, 2017 00:07 IST

हजारोंचा सहभाग : रत्नागिरीत बहुजन क्रांती मोर्चा

रत्नागिरी : ‘एकच पर्व, बहुजन सर्व’ अशी गर्जना करीत विविध मागण्यांसाठी सोमवारी बहुजनांचा विराट मोर्चा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हजारोंच्या संख्येने बहुजन यामध्ये सामील झाले होते. यावेळी आपल्या प्रलंबित ४१ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना या शिष्टमंडळाने सादर केले.देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण होत आली, तरीही अजून बहुजन समाज आपल्या मूलभूत हक्क आणि अधिकारांपासून वंचित आहे. अद्याप ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाची जातनिहाय गणना झालेली नाही. नॉनक्रिमिलेअरची अट जाचक असल्याने बहुजन समाजाच्या मुलांना उच्च शिक्षण घेणे अवघड झाले आहे. याचबरोबर इतरही अनेक समस्यांना बहुजन समाजाला सामोरे जावे लागत होते. याबाबत न्याय मिळावा, तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा, यासाठी बहुजन समाज क्रांती मोर्चाचे आयोजन केले होते. सोमवारी येथील चंपक मैदानापासून हजारो बहुजनांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. या मोर्चात अठरा पगड जातींमधील बांधवांचा समावेश होता. संविधानाची १०० टक्के अंमलबजावणी करून आमचे न्याय्य हक्क आम्हाला द्या, ही या मोर्चाची प्रमुख मागणी होती. या मोर्चाला सुमारे प्रमुख ४० समाज संघटनांनी पाठिंबा दिला आहे.हा मोर्चा मारुतीमंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज, बापूजी साळुंखे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन तडक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्याठिकाणी प्रवेशद्वारावर हा मोर्चा धडकला. त्यानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना विविध ४० मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी बहुजन मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशदादा पाटील, शब्बीर अन्सारी, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व भंडारी समाजनेते कुमार शेट्ये, खारवी समाजाचे सुधीर वासावे, कटबू समाजाचे बी. टी. मोरे, कुणबी समाजाचे तानाजी कुळ्ये, सुरेश भायजे, चर्मकार समाजाच्या गीता राठोड, तेली समाजातर्फे दीपक राऊत, ककैया समाजाचे आप्पासाहेब सोनावणे, बौद्ध समाजाचे संजय कदम, बी. के. पालकर, सुतार समाजाचे चंद्रकांत पांचाळ आणि वडार समाजाचे नागेश पाथरट, आदी विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. (वार्ताहर)पोलिसांचा फौजफाटाआपल्या न्याय हक्कांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने पोलिस दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण शहराला पोलिस चौक्यांचे स्वरूप आले होते.‘ते’ पाटलांचे वारसदार...अस्पृश्य महिलेवर अत्याचार केले म्हणून शिवाजी महाराजांनी गुन्हेगारांचे हात छाटले. त्यावेळी त्यांनी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ चोख बजावली; परंतु जे अ‍ॅट्रॉसिटी रद्द करण्याचा प्रयत्न करीत आहेत ते शिवरायाचे नव्हे, तर राजांच्या पाटलांचे वारसदार असल्याची टीका पल्लवी राठोड या तरुणीने केली.