शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

बहुजनांचा एल्गार

By admin | Updated: January 17, 2017 00:07 IST

हजारोंचा सहभाग : रत्नागिरीत बहुजन क्रांती मोर्चा

रत्नागिरी : ‘एकच पर्व, बहुजन सर्व’ अशी गर्जना करीत विविध मागण्यांसाठी सोमवारी बहुजनांचा विराट मोर्चा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हजारोंच्या संख्येने बहुजन यामध्ये सामील झाले होते. यावेळी आपल्या प्रलंबित ४१ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना या शिष्टमंडळाने सादर केले.देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण होत आली, तरीही अजून बहुजन समाज आपल्या मूलभूत हक्क आणि अधिकारांपासून वंचित आहे. अद्याप ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाची जातनिहाय गणना झालेली नाही. नॉनक्रिमिलेअरची अट जाचक असल्याने बहुजन समाजाच्या मुलांना उच्च शिक्षण घेणे अवघड झाले आहे. याचबरोबर इतरही अनेक समस्यांना बहुजन समाजाला सामोरे जावे लागत होते. याबाबत न्याय मिळावा, तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा, यासाठी बहुजन समाज क्रांती मोर्चाचे आयोजन केले होते. सोमवारी येथील चंपक मैदानापासून हजारो बहुजनांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. या मोर्चात अठरा पगड जातींमधील बांधवांचा समावेश होता. संविधानाची १०० टक्के अंमलबजावणी करून आमचे न्याय्य हक्क आम्हाला द्या, ही या मोर्चाची प्रमुख मागणी होती. या मोर्चाला सुमारे प्रमुख ४० समाज संघटनांनी पाठिंबा दिला आहे.हा मोर्चा मारुतीमंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज, बापूजी साळुंखे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन तडक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्याठिकाणी प्रवेशद्वारावर हा मोर्चा धडकला. त्यानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना विविध ४० मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी बहुजन मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशदादा पाटील, शब्बीर अन्सारी, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व भंडारी समाजनेते कुमार शेट्ये, खारवी समाजाचे सुधीर वासावे, कटबू समाजाचे बी. टी. मोरे, कुणबी समाजाचे तानाजी कुळ्ये, सुरेश भायजे, चर्मकार समाजाच्या गीता राठोड, तेली समाजातर्फे दीपक राऊत, ककैया समाजाचे आप्पासाहेब सोनावणे, बौद्ध समाजाचे संजय कदम, बी. के. पालकर, सुतार समाजाचे चंद्रकांत पांचाळ आणि वडार समाजाचे नागेश पाथरट, आदी विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. (वार्ताहर)पोलिसांचा फौजफाटाआपल्या न्याय हक्कांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने पोलिस दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण शहराला पोलिस चौक्यांचे स्वरूप आले होते.‘ते’ पाटलांचे वारसदार...अस्पृश्य महिलेवर अत्याचार केले म्हणून शिवाजी महाराजांनी गुन्हेगारांचे हात छाटले. त्यावेळी त्यांनी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ चोख बजावली; परंतु जे अ‍ॅट्रॉसिटी रद्द करण्याचा प्रयत्न करीत आहेत ते शिवरायाचे नव्हे, तर राजांच्या पाटलांचे वारसदार असल्याची टीका पल्लवी राठोड या तरुणीने केली.