शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

बहुजनांचा एल्गार

By admin | Updated: January 17, 2017 00:07 IST

हजारोंचा सहभाग : रत्नागिरीत बहुजन क्रांती मोर्चा

रत्नागिरी : ‘एकच पर्व, बहुजन सर्व’ अशी गर्जना करीत विविध मागण्यांसाठी सोमवारी बहुजनांचा विराट मोर्चा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हजारोंच्या संख्येने बहुजन यामध्ये सामील झाले होते. यावेळी आपल्या प्रलंबित ४१ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना या शिष्टमंडळाने सादर केले.देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण होत आली, तरीही अजून बहुजन समाज आपल्या मूलभूत हक्क आणि अधिकारांपासून वंचित आहे. अद्याप ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाची जातनिहाय गणना झालेली नाही. नॉनक्रिमिलेअरची अट जाचक असल्याने बहुजन समाजाच्या मुलांना उच्च शिक्षण घेणे अवघड झाले आहे. याचबरोबर इतरही अनेक समस्यांना बहुजन समाजाला सामोरे जावे लागत होते. याबाबत न्याय मिळावा, तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा, यासाठी बहुजन समाज क्रांती मोर्चाचे आयोजन केले होते. सोमवारी येथील चंपक मैदानापासून हजारो बहुजनांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. या मोर्चात अठरा पगड जातींमधील बांधवांचा समावेश होता. संविधानाची १०० टक्के अंमलबजावणी करून आमचे न्याय्य हक्क आम्हाला द्या, ही या मोर्चाची प्रमुख मागणी होती. या मोर्चाला सुमारे प्रमुख ४० समाज संघटनांनी पाठिंबा दिला आहे.हा मोर्चा मारुतीमंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज, बापूजी साळुंखे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन तडक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्याठिकाणी प्रवेशद्वारावर हा मोर्चा धडकला. त्यानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना विविध ४० मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी बहुजन मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशदादा पाटील, शब्बीर अन्सारी, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व भंडारी समाजनेते कुमार शेट्ये, खारवी समाजाचे सुधीर वासावे, कटबू समाजाचे बी. टी. मोरे, कुणबी समाजाचे तानाजी कुळ्ये, सुरेश भायजे, चर्मकार समाजाच्या गीता राठोड, तेली समाजातर्फे दीपक राऊत, ककैया समाजाचे आप्पासाहेब सोनावणे, बौद्ध समाजाचे संजय कदम, बी. के. पालकर, सुतार समाजाचे चंद्रकांत पांचाळ आणि वडार समाजाचे नागेश पाथरट, आदी विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. (वार्ताहर)पोलिसांचा फौजफाटाआपल्या न्याय हक्कांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने पोलिस दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण शहराला पोलिस चौक्यांचे स्वरूप आले होते.‘ते’ पाटलांचे वारसदार...अस्पृश्य महिलेवर अत्याचार केले म्हणून शिवाजी महाराजांनी गुन्हेगारांचे हात छाटले. त्यावेळी त्यांनी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ चोख बजावली; परंतु जे अ‍ॅट्रॉसिटी रद्द करण्याचा प्रयत्न करीत आहेत ते शिवरायाचे नव्हे, तर राजांच्या पाटलांचे वारसदार असल्याची टीका पल्लवी राठोड या तरुणीने केली.