शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

तौक्ते वादळातील आपदग्रस्तांची झोळी अद्यापही रिकामीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:24 IST

राजापूर : गत महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामध्ये मोठ्या प्रमाणात पडझड आणि नुकसान झाले आहे. वादळानंतर झालेल्या नुकसानातून आपदग्रस्त सावरून ...

राजापूर : गत महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामध्ये मोठ्या प्रमाणात पडझड आणि नुकसान झाले आहे. वादळानंतर झालेल्या नुकसानातून आपदग्रस्त सावरून नव्या जोमाने पावसाळ्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, वादळानंतर १५ दिवसांचा कालावधी उलटला तरी आपदग्रस्तांची झोळी शासकीय मदतीअभावी रितीच राहिली आहे.

तौक्ते वादळाचा तालुक्याला विशेषतः पश्चिम भागाला जोरदार तडाखा बसला. त्यामध्ये तालुक्याचे एक कोटी ४७ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली. १५ दिवसांपूर्वी कोकणामध्ये ताैक्ते वादळ धडकले होते. या वादळाचा जोरदार तडाखा सागरी किनारपट्टीवरील गावांना बसला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नसली तरी विजेच्या तारा तुटून, वीजखांब पडून अनेक दिवस अनेक गावांना काळोखामध्ये राहावे लागले होते. वादळामध्ये झालेल्या पडझडीची शासनाच्या प्रतिनिधींसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पाहणी केली. आपदग्रस्तांशी संवाद साधून शासकीय मदत मिळवून देण्याबद्दल आश्वासितही केले. मात्र, १५ दिवसांनंतरही आपदग्रस्तांना शासकीय मदत मिळालेली नाही.