शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

तौक्ते वादळातील आपदग्रस्तांची झोळी अद्यापही रिकामीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:24 IST

राजापूर : गत महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामध्ये मोठ्या प्रमाणात पडझड आणि नुकसान झाले आहे. वादळानंतर झालेल्या नुकसानातून आपदग्रस्त सावरून ...

राजापूर : गत महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामध्ये मोठ्या प्रमाणात पडझड आणि नुकसान झाले आहे. वादळानंतर झालेल्या नुकसानातून आपदग्रस्त सावरून नव्या जोमाने पावसाळ्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, वादळानंतर १५ दिवसांचा कालावधी उलटला तरी आपदग्रस्तांची झोळी शासकीय मदतीअभावी रितीच राहिली आहे.

तौक्ते वादळाचा तालुक्याला विशेषतः पश्चिम भागाला जोरदार तडाखा बसला. त्यामध्ये तालुक्याचे एक कोटी ४७ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली. १५ दिवसांपूर्वी कोकणामध्ये ताैक्ते वादळ धडकले होते. या वादळाचा जोरदार तडाखा सागरी किनारपट्टीवरील गावांना बसला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नसली तरी विजेच्या तारा तुटून, वीजखांब पडून अनेक दिवस अनेक गावांना काळोखामध्ये राहावे लागले होते. वादळामध्ये झालेल्या पडझडीची शासनाच्या प्रतिनिधींसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पाहणी केली. आपदग्रस्तांशी संवाद साधून शासकीय मदत मिळवून देण्याबद्दल आश्वासितही केले. मात्र, १५ दिवसांनंतरही आपदग्रस्तांना शासकीय मदत मिळालेली नाही.