शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
3
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
4
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
5
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
6
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
7
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
8
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
9
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
10
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
11
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
12
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
13
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
14
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
15
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
16
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
17
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
18
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
19
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
20
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

शेतकऱ्यांसाठी ‘बुरे दिन’

By admin | Updated: June 17, 2015 00:40 IST

संजय कदम : जिल्हा परिषद भेटीप्रसंगी पत्रकारांशी संवाद

रत्नागिरी : आघाडी शासनाच्या काळात शेतकऱ्यांना भातबियाण्यासाठी ७५ टक्के सबसिडी देण्यात येत होती. मात्र, आताच्या शिवसेना-भाजप युती शासनाकडून भातबियाण्यांसाठी शेतकऱ्यांना दमडीही दिली जात नसल्याने शेतकऱ्यांसाठी बुरे दिन सुरू झाले असल्याचे दापोली - मंडणगड - खेड विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय कदम यांनी सांगितले. आमदार कदम यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी युती शासनाबद्दल नाराजी व्यक्त केली. युती शासनाच्या कालावधीत जनतेची गळचेपी होत असून, महागाईचा आगडोंब उडाला आहे. तसेच शेतकरीही देशोधडीला लागरे, असा आरोप करुन ते पुढे म्हणाले, पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर स्वत:चे जुने बियाणे करुन शेती करण्याची वेळ आली आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी शासनाने शेतकऱ्यांना भात बियाण्यासाठी एक रुपयाही सबसिडी दिलेला नाही. पूर्वीचे शासन शेतकऱ्यांना खरीप हंगामात ७५ टक्के अनुदानावर भात बियाणं देत होते. मात्र, यंदा शासनाने शेतकऱ्यांची निराशा केली असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात आंबा महोत्सवावर खर्च करण्यापेक्षा ते पैसे भात बियाण्यावर खर्च करुन शेतकऱ्यांना दिले असते तर गरीब शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. मात्र, नटनट्या नाचवून जनतेला काय फायदा झाला, असा प्रश्नही आमदार कदम यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषद किंवा जिल्हा नियोजन मंडळातून नियोजन करुन भातबियाण्यासाठी तरतूद करुन ते देणे आवश्यक होते, मात्र, तेही केलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, आयटीआयमधील मागासवर्गीयांसाठी असणारे १८० रुपये शुल्क रद्द करुन ते २८०० रुपयांपेक्षा जास्त केले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक फीचा भुर्दंड भरावा लागत आहे. हे शासन नक्की कोणासाठी आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करुन कोकणातील बागायतदारांसाठी आंबा नुकसान भरपाई ६० कोटी देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याचा आरोपही कदम यांनी केली. (शहर वार्ताहर)सरकारच्या धोरणांचा निषेध शासनाच्या विरूध्द आमदार संजय कदम यांनी तोफ डागली. विविध प्रश्नांवर सरकार अपयशी ठरत असल्याची टीका करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर कोकणातील शेतकऱ्यांना सरकार न्याय देऊ शकले नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. आघाडी सरकारने बियाण्यासाठी शेतकऱ्यांना ७५ टक्के सबसिडी दिली. आताच्या सरकारने दमडीही दिली नाही. या सरकारकडून कोणती अपेक्षा करायची, असा संतप्त सवाल त्यांनी केला.