शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
2
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
3
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; महिलांनी केला छांगुर गँगचा पर्दाफाश
4
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
5
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
6
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
7
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
8
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देश..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती?
10
लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला!
11
'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...
12
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
13
मार्क झुकरबर्गविरोधात खटला सुरू; ८ अब्ज डॉलर्सचं आहे प्रकरण, काय आहे कारण?
14
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
15
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
16
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
17
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
18
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
19
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
20
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'

शेतकऱ्यांसाठी ‘बुरे दिन’

By admin | Updated: June 17, 2015 00:40 IST

संजय कदम : जिल्हा परिषद भेटीप्रसंगी पत्रकारांशी संवाद

रत्नागिरी : आघाडी शासनाच्या काळात शेतकऱ्यांना भातबियाण्यासाठी ७५ टक्के सबसिडी देण्यात येत होती. मात्र, आताच्या शिवसेना-भाजप युती शासनाकडून भातबियाण्यांसाठी शेतकऱ्यांना दमडीही दिली जात नसल्याने शेतकऱ्यांसाठी बुरे दिन सुरू झाले असल्याचे दापोली - मंडणगड - खेड विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय कदम यांनी सांगितले. आमदार कदम यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी युती शासनाबद्दल नाराजी व्यक्त केली. युती शासनाच्या कालावधीत जनतेची गळचेपी होत असून, महागाईचा आगडोंब उडाला आहे. तसेच शेतकरीही देशोधडीला लागरे, असा आरोप करुन ते पुढे म्हणाले, पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर स्वत:चे जुने बियाणे करुन शेती करण्याची वेळ आली आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी शासनाने शेतकऱ्यांना भात बियाण्यासाठी एक रुपयाही सबसिडी दिलेला नाही. पूर्वीचे शासन शेतकऱ्यांना खरीप हंगामात ७५ टक्के अनुदानावर भात बियाणं देत होते. मात्र, यंदा शासनाने शेतकऱ्यांची निराशा केली असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात आंबा महोत्सवावर खर्च करण्यापेक्षा ते पैसे भात बियाण्यावर खर्च करुन शेतकऱ्यांना दिले असते तर गरीब शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. मात्र, नटनट्या नाचवून जनतेला काय फायदा झाला, असा प्रश्नही आमदार कदम यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषद किंवा जिल्हा नियोजन मंडळातून नियोजन करुन भातबियाण्यासाठी तरतूद करुन ते देणे आवश्यक होते, मात्र, तेही केलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, आयटीआयमधील मागासवर्गीयांसाठी असणारे १८० रुपये शुल्क रद्द करुन ते २८०० रुपयांपेक्षा जास्त केले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक फीचा भुर्दंड भरावा लागत आहे. हे शासन नक्की कोणासाठी आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करुन कोकणातील बागायतदारांसाठी आंबा नुकसान भरपाई ६० कोटी देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याचा आरोपही कदम यांनी केली. (शहर वार्ताहर)सरकारच्या धोरणांचा निषेध शासनाच्या विरूध्द आमदार संजय कदम यांनी तोफ डागली. विविध प्रश्नांवर सरकार अपयशी ठरत असल्याची टीका करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर कोकणातील शेतकऱ्यांना सरकार न्याय देऊ शकले नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. आघाडी सरकारने बियाण्यासाठी शेतकऱ्यांना ७५ टक्के सबसिडी दिली. आताच्या सरकारने दमडीही दिली नाही. या सरकारकडून कोणती अपेक्षा करायची, असा संतप्त सवाल त्यांनी केला.