शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

शेतकऱ्यांसाठी ‘बुरे दिन’

By admin | Updated: June 17, 2015 00:40 IST

संजय कदम : जिल्हा परिषद भेटीप्रसंगी पत्रकारांशी संवाद

रत्नागिरी : आघाडी शासनाच्या काळात शेतकऱ्यांना भातबियाण्यासाठी ७५ टक्के सबसिडी देण्यात येत होती. मात्र, आताच्या शिवसेना-भाजप युती शासनाकडून भातबियाण्यांसाठी शेतकऱ्यांना दमडीही दिली जात नसल्याने शेतकऱ्यांसाठी बुरे दिन सुरू झाले असल्याचे दापोली - मंडणगड - खेड विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय कदम यांनी सांगितले. आमदार कदम यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी युती शासनाबद्दल नाराजी व्यक्त केली. युती शासनाच्या कालावधीत जनतेची गळचेपी होत असून, महागाईचा आगडोंब उडाला आहे. तसेच शेतकरीही देशोधडीला लागरे, असा आरोप करुन ते पुढे म्हणाले, पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर स्वत:चे जुने बियाणे करुन शेती करण्याची वेळ आली आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी शासनाने शेतकऱ्यांना भात बियाण्यासाठी एक रुपयाही सबसिडी दिलेला नाही. पूर्वीचे शासन शेतकऱ्यांना खरीप हंगामात ७५ टक्के अनुदानावर भात बियाणं देत होते. मात्र, यंदा शासनाने शेतकऱ्यांची निराशा केली असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात आंबा महोत्सवावर खर्च करण्यापेक्षा ते पैसे भात बियाण्यावर खर्च करुन शेतकऱ्यांना दिले असते तर गरीब शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. मात्र, नटनट्या नाचवून जनतेला काय फायदा झाला, असा प्रश्नही आमदार कदम यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषद किंवा जिल्हा नियोजन मंडळातून नियोजन करुन भातबियाण्यासाठी तरतूद करुन ते देणे आवश्यक होते, मात्र, तेही केलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, आयटीआयमधील मागासवर्गीयांसाठी असणारे १८० रुपये शुल्क रद्द करुन ते २८०० रुपयांपेक्षा जास्त केले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक फीचा भुर्दंड भरावा लागत आहे. हे शासन नक्की कोणासाठी आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करुन कोकणातील बागायतदारांसाठी आंबा नुकसान भरपाई ६० कोटी देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याचा आरोपही कदम यांनी केली. (शहर वार्ताहर)सरकारच्या धोरणांचा निषेध शासनाच्या विरूध्द आमदार संजय कदम यांनी तोफ डागली. विविध प्रश्नांवर सरकार अपयशी ठरत असल्याची टीका करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर कोकणातील शेतकऱ्यांना सरकार न्याय देऊ शकले नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. आघाडी सरकारने बियाण्यासाठी शेतकऱ्यांना ७५ टक्के सबसिडी दिली. आताच्या सरकारने दमडीही दिली नाही. या सरकारकडून कोणती अपेक्षा करायची, असा संतप्त सवाल त्यांनी केला.