शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

निवळी - जयगड रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील निवळी ते जयगड रस्त्याची पूर्णतः दैना उडाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता अशी अवस्था ...

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील निवळी ते जयगड रस्त्याची पूर्णतः दैना उडाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली आहे. या रस्त्यावरून नियमित ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचे यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या रस्त्याची येत्या ८ दिवसांत दुरुस्ती करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून खड्डे भरावे लागतील, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी दिला आहे.

गेले अनेक महिने या मुख्य रस्त्यावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवजड वाहतुकीमुळेच या रस्त्याची अशी दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती तत्काळ व्हावी, अशी वाहनचालकांसह ग्रामस्थांनी आग्रही मागणी केली आहे. या मुख्य रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते व ठेकेदार दुर्लक्ष का करत आहे? असा प्रश्न विचारला जात आहे. निवळी ते जयगड या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ मोठी आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था भयावह झाली आहे. रस्त्यात पडलेल्या खड्डयांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे रात्रीच्यावेळी मोठा अपघात होऊ शकतो, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. संबंधित खात्याच्या दुर्लक्षामुळे नाराजी व्यक्त हाेत आहे.

-----------------------------------------

रत्नागिरी तालुक्यातील निवळी ते जयगड रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून चालणेही मुश्किल झाले आहे.