शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादनात पिछाडीच

By admin | Updated: September 5, 2014 23:30 IST

रत्नागिरी जिल्हा : उत्सव काळात हजारो लीटर दूर परजिल्ह्यातूनच

खाडीपट्टा : गणेशोत्सव काळात दुधाला वाढीव मागणी असते. ती पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात पुरेसे दुग्धोत्पादन होत नसल्याने जिल्ह्याबाहेरुन दुधाची आवक होत आहे. गणेशोत्सवात सुमारे ५० हजार लीटर दूध जिल्ह्याबाहेरुन आणले जात होते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दुग्धोत्पादनाचे प्रमाण फारच कमी असल्याचे पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आले आहे. जिल्ह्यात शेतकरी कुटुंबात गुरेढोरे पाळली जातात. गायी, म्हशी पाळणाऱ्या शेतकऱ्यांकडून कुटुंबाची गरज भागवली जाते. पण, जनावरांच्या तुलनेत दुग्धोत्पादनही खूप कमी होत आहे. त्यामुळे दुग्धोत्पादनाला जिल्ह्यात ऊर्जितावस्था आलेली नाही. जिल्ह्यात दुधाची गरज भागवण्यासाठी परजिल्ह्यातून दूध मागवावे लागते. चाऱ्याची टंचाई, व्यापारी तत्त्वावर दूध उत्पादन करण्याची मानसिकता नसते. दूध संकलनाच्या साखळीखालील त्रुटी आदी कारणांमुळे जिल्ह्याबाहेरील दुधावर जिल्हावासीयांना अवलंबून राहावे लागते. जिल्ह्यात घरगुती दूध उत्पादन सुमारे २० हजार लीटरच्या घरात आहे. मात्र, जिल्ह्याची गरज भागविण्यासाठी याव्यतिरिक्त जिल्ह्याबाहेरुन रोज ३५ ते ४० हजार लीटर दूध येते. गणेशोत्सवात मुंबई, पुणे तसेच अन्य भागातून हजारो चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. यामुळे गणेशोत्सवात अतिरिक्त दुधाची मागणी लक्षात घेता या अतिरिक्त सुमारे ५० हजार लीटर दूध मागवले जाते. शासकी दूध विक्री बंद झाल्याने ग्राहकांना हा फटका बसत आहे. आरे दूध विक्री सुरु ठेवण्यासाठी शासनाकडूनही प्रयत्न झालेले नाहीत. गोकुळ दूध संघ ही जिल्ह्यातील दूध एकत्रित करुन कोल्हापूर येथे पॅकिंगसाठी घेऊन जातो. यापूर्वी जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ स्थापन करुन वारणा ब्रँडने दूध विक्रीचा प्रयत्न झाला. त्यानंतर तीन वर्षे चालल्यानंतर तोट्यात गेल्याने हा प्रकल्पही बंद करण्यात आला. जिल्ह्यात असे प्रकल्प नसल्याने दूध पॅकिंग करुन जिल्ह्यात आणून विकले जाते. (वार्ताहर)सर्वसाधारणपणे पावसाळी हंगामात ओला चारा उपलब्ध होत असल्याने या काळात दुग्धोत्पादन वाढते. मात्र, अलिकडच्या काळात त्याकडे व्यावसायिक पद्धतीने लक्ष दिले जात नसल्याने पावसाळ्यातही उत्पादन घटले आहे. ही बाब गंभीर असून, संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.