शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

दूध उत्पादनात पिछाडीच

By admin | Updated: September 5, 2014 23:30 IST

रत्नागिरी जिल्हा : उत्सव काळात हजारो लीटर दूर परजिल्ह्यातूनच

खाडीपट्टा : गणेशोत्सव काळात दुधाला वाढीव मागणी असते. ती पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात पुरेसे दुग्धोत्पादन होत नसल्याने जिल्ह्याबाहेरुन दुधाची आवक होत आहे. गणेशोत्सवात सुमारे ५० हजार लीटर दूध जिल्ह्याबाहेरुन आणले जात होते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दुग्धोत्पादनाचे प्रमाण फारच कमी असल्याचे पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आले आहे. जिल्ह्यात शेतकरी कुटुंबात गुरेढोरे पाळली जातात. गायी, म्हशी पाळणाऱ्या शेतकऱ्यांकडून कुटुंबाची गरज भागवली जाते. पण, जनावरांच्या तुलनेत दुग्धोत्पादनही खूप कमी होत आहे. त्यामुळे दुग्धोत्पादनाला जिल्ह्यात ऊर्जितावस्था आलेली नाही. जिल्ह्यात दुधाची गरज भागवण्यासाठी परजिल्ह्यातून दूध मागवावे लागते. चाऱ्याची टंचाई, व्यापारी तत्त्वावर दूध उत्पादन करण्याची मानसिकता नसते. दूध संकलनाच्या साखळीखालील त्रुटी आदी कारणांमुळे जिल्ह्याबाहेरील दुधावर जिल्हावासीयांना अवलंबून राहावे लागते. जिल्ह्यात घरगुती दूध उत्पादन सुमारे २० हजार लीटरच्या घरात आहे. मात्र, जिल्ह्याची गरज भागविण्यासाठी याव्यतिरिक्त जिल्ह्याबाहेरुन रोज ३५ ते ४० हजार लीटर दूध येते. गणेशोत्सवात मुंबई, पुणे तसेच अन्य भागातून हजारो चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. यामुळे गणेशोत्सवात अतिरिक्त दुधाची मागणी लक्षात घेता या अतिरिक्त सुमारे ५० हजार लीटर दूध मागवले जाते. शासकी दूध विक्री बंद झाल्याने ग्राहकांना हा फटका बसत आहे. आरे दूध विक्री सुरु ठेवण्यासाठी शासनाकडूनही प्रयत्न झालेले नाहीत. गोकुळ दूध संघ ही जिल्ह्यातील दूध एकत्रित करुन कोल्हापूर येथे पॅकिंगसाठी घेऊन जातो. यापूर्वी जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ स्थापन करुन वारणा ब्रँडने दूध विक्रीचा प्रयत्न झाला. त्यानंतर तीन वर्षे चालल्यानंतर तोट्यात गेल्याने हा प्रकल्पही बंद करण्यात आला. जिल्ह्यात असे प्रकल्प नसल्याने दूध पॅकिंग करुन जिल्ह्यात आणून विकले जाते. (वार्ताहर)सर्वसाधारणपणे पावसाळी हंगामात ओला चारा उपलब्ध होत असल्याने या काळात दुग्धोत्पादन वाढते. मात्र, अलिकडच्या काळात त्याकडे व्यावसायिक पद्धतीने लक्ष दिले जात नसल्याने पावसाळ्यातही उत्पादन घटले आहे. ही बाब गंभीर असून, संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.