शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

दूध उत्पादनात पिछाडीच

By admin | Updated: September 5, 2014 23:30 IST

रत्नागिरी जिल्हा : उत्सव काळात हजारो लीटर दूर परजिल्ह्यातूनच

खाडीपट्टा : गणेशोत्सव काळात दुधाला वाढीव मागणी असते. ती पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात पुरेसे दुग्धोत्पादन होत नसल्याने जिल्ह्याबाहेरुन दुधाची आवक होत आहे. गणेशोत्सवात सुमारे ५० हजार लीटर दूध जिल्ह्याबाहेरुन आणले जात होते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दुग्धोत्पादनाचे प्रमाण फारच कमी असल्याचे पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आले आहे. जिल्ह्यात शेतकरी कुटुंबात गुरेढोरे पाळली जातात. गायी, म्हशी पाळणाऱ्या शेतकऱ्यांकडून कुटुंबाची गरज भागवली जाते. पण, जनावरांच्या तुलनेत दुग्धोत्पादनही खूप कमी होत आहे. त्यामुळे दुग्धोत्पादनाला जिल्ह्यात ऊर्जितावस्था आलेली नाही. जिल्ह्यात दुधाची गरज भागवण्यासाठी परजिल्ह्यातून दूध मागवावे लागते. चाऱ्याची टंचाई, व्यापारी तत्त्वावर दूध उत्पादन करण्याची मानसिकता नसते. दूध संकलनाच्या साखळीखालील त्रुटी आदी कारणांमुळे जिल्ह्याबाहेरील दुधावर जिल्हावासीयांना अवलंबून राहावे लागते. जिल्ह्यात घरगुती दूध उत्पादन सुमारे २० हजार लीटरच्या घरात आहे. मात्र, जिल्ह्याची गरज भागविण्यासाठी याव्यतिरिक्त जिल्ह्याबाहेरुन रोज ३५ ते ४० हजार लीटर दूध येते. गणेशोत्सवात मुंबई, पुणे तसेच अन्य भागातून हजारो चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. यामुळे गणेशोत्सवात अतिरिक्त दुधाची मागणी लक्षात घेता या अतिरिक्त सुमारे ५० हजार लीटर दूध मागवले जाते. शासकी दूध विक्री बंद झाल्याने ग्राहकांना हा फटका बसत आहे. आरे दूध विक्री सुरु ठेवण्यासाठी शासनाकडूनही प्रयत्न झालेले नाहीत. गोकुळ दूध संघ ही जिल्ह्यातील दूध एकत्रित करुन कोल्हापूर येथे पॅकिंगसाठी घेऊन जातो. यापूर्वी जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ स्थापन करुन वारणा ब्रँडने दूध विक्रीचा प्रयत्न झाला. त्यानंतर तीन वर्षे चालल्यानंतर तोट्यात गेल्याने हा प्रकल्पही बंद करण्यात आला. जिल्ह्यात असे प्रकल्प नसल्याने दूध पॅकिंग करुन जिल्ह्यात आणून विकले जाते. (वार्ताहर)सर्वसाधारणपणे पावसाळी हंगामात ओला चारा उपलब्ध होत असल्याने या काळात दुग्धोत्पादन वाढते. मात्र, अलिकडच्या काळात त्याकडे व्यावसायिक पद्धतीने लक्ष दिले जात नसल्याने पावसाळ्यातही उत्पादन घटले आहे. ही बाब गंभीर असून, संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.