शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

गाेळप येथील स्थलांतरित कुटुंबांकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:32 IST

पावस : रत्नागिरी तालुक्यातील गोळप - मानेवाडी येथे सतत पडणाऱ्या पावसामुळे जमीन खचून दाेन घरांना धोका निर्माण झाला हाेता. ...

पावस : रत्नागिरी तालुक्यातील गोळप - मानेवाडी येथे सतत पडणाऱ्या पावसामुळे जमीन खचून दाेन घरांना धोका निर्माण झाला हाेता. त्यामुळे या कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले. मात्र, गेल्या बारा दिवसांत या कुटुंबीयांकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या परिसरात १६ जुलै रोजी मोहिते यांच्या घराजवळची जमीन खचण्यास सुरुवात झाली. या परिसरात दहा ते पंधरा फूट उंचीचा भाग खचला होता. त्यानंतर घराचा अर्धा भाग जमीनदोस्त झाला. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या भागाची पाहणी करण्यात आली. मात्र, त्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही. लोकप्रतिनिधींचा नियोजित दौरा रद्द झाल्याने त्यानंतर त्यांनी या भागाकडे लक्ष दिलेले नाही. या कुटुंबीयांचा लोकप्रतिनिधींच्या आश्वासनावर विश्वास असल्याने ते अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, याठिकाणी अद्याप लोकप्रतिनिधी आलेले नाहीत. गोळप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या कुटुंबीयांना धान्याचे वाटप करण्यात आले. या परिसरासाठी कोणत्या उपाययोजना निश्चितपणे केल्या जाणार आहेत, याबाबत ग्रामपंचायतीकडून काहीही सांगितले जात नसल्याने हे कुटुंबीय नाराज आहेत.

----------------------------------------

यासंदर्भात ग्रामपंचायतीची कोणतीही उपाययोजना करण्याची मानसिकता दिसत नाही. ग्रामपंचायत आम्हाला धान्य देऊन आमची चेष्टा करत आहे. पावसाळ्यानंतर या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर आत्ताच ताेडगा काढण्याची गरज आहे.

- सागर मोहिते, ग्रामस्थ