शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांची उपलब्धता, दरातील चढ-उतार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गावठी फळभाज्याही विक्रीसाठी येऊ लागल्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गावठी फळभाज्याही विक्रीसाठी येऊ लागल्या असून श्रावणामुळे भाज्यांना वाढती मागणी आहे. मात्र, दरात चढ-उतार कायम असून ग्राहकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

श्रावणामुळे बहुतांश लोक शाकाहार अवलंब असल्याने भाज्यांना वाढती मागणी आहे. पालेभाज्यांसह दुधी, दोडके, पडवळ, भोपळा आदी फळभाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. फळांमध्ये सध्या सीताफळ मोठ्या प्रमाणात येत आहेत. उपवासामुळे फळांना वाढती मागणी आहे.

भेंडी, कारली, घेवडा, फरसबी, सिमला मिरची, कोबी, फ्लाॅवर, मटार बाजारात विक्रीसाठी येत असून बहुतांश भाज्या १५ ते २० रुपये पाव किलो दराने विकण्यात येत आहेत. अळूची पाने, याशिवाय रानभाज्यांची उपलब्धता होत आहे. अळूच्या पानासह हळदीच्या पानाचीही मागणी होत आहे. मेथी, माठ, मुळा, पालक, शेपू या पालेभाज्यांची जुडी १० ते १५ रुपये दराने विकण्यात येत आहे. याशिवाय काकडी, चिबूडही बाजारात विक्रीसाठी येऊ लागले आहेत.

कांदे, बटाटे दर स्थिर

श्रावणात बहुतांश लोक कांदा वर्ज्य करतात. कांद्याची मागणी काहीअंशी घटली असली तरी बटाट्याला मात्र वाढती मागणी आहे. कांदा २५ ते ३०, तर बटाटा २० ते २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. कांदा-बटाट्याचे दर मात्र सध्या तरी स्थिर आहेत. श्रावणानंतर दरामध्ये पुन्हा फरक पडण्याची शक्यता आहे.

सीताफळांचा हंगाम सुरू असून बाजारात सीताफळे मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ८० ते १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. शिवाय ओला खजूर, पपई, नासपती, अंजीर, केळी, पेरू, मोसंबी, संत्री उपलब्ध असून मागणीही वाढती आहे.

उपवासामुळे ओल्या भुईमुगाच्या शेंगा, मक्याची कणसे, रताळी यांना वाढती मागणी आहे. शेंगा ७० ते ८० रुपये किलो तर रताळी ४० ते ५० रुपये किलो तर मका दहा रुपयांना एक नग दराने विक्री सुरू आहे.

वास्तविक बारमाही भाज्यांना वाढती मागणी आहे. जिल्ह्यात बहुतांश भाजीपाला विक्रीसाठी अन्य जिल्ह्यातून येत असला तरी दरावर मात्र निर्बंध नसल्यामुळे सर्वसामान्यांची फरपट होत आहे. भाजीपाला असो वा डाळी, कडधान्य सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. एकाच शहरात भिन्न दर आकारण्यात येत असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

- अस्मिता पागधे, गृहिणी

परजिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लिलाव झालेनंतरच विक्रीसाठी शहरात व आसपासच्या गावात वितरित होते. प्रत्यक्ष लिलावाचे दर व विक्रीच्या दरात कमालीची तफावत आढळत असून दरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेने तरी याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून ग्राहकांची फरपट थांबेल.

- मंजिरी सांगले, गृहिणी