शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

कोकण ‘ब्युटी’चे निर्मात्यांना आकर्षण

By admin | Updated: March 28, 2015 00:08 IST

अरूण नलावडे : नाट्य परिषद रत्नागिरी शाखेला भेट

रत्नागिरी : कोकणात ‘ब्युटी’ दडलेली आहे, तिचे आकर्षण बाहेरच्या सिनेनिर्मात्यांना वाटू लागले आहे. येथील चित्रिकरणाचा ओघ वाढला आहे. त्यामुळे यात स्थानिकांना प्राधान्य मिळावे, यासाठी येथील अखिल भारतीय नाट्य परिषदेने प्रयत्न करावेत, असे मत ज्येष्ठ अभिनेते अरूण नलावडे यांनी परिषदेच्या कार्यालयाला भेट दिली असता व्यक्त केले.रत्नागिरीत एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी अरूण नलावडे गुरुवारी रत्नागिरीत आले होते. त्यांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सावरकर नाट्यगृहातील कार्यालयाला सायंकाळी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत चित्रपट महामंडळाचे सदस्य आणि मराठीसह भोजपुरी चित्रपटाचे निर्माते दिलीप दळवी हेही होते. नलावडे म्हणाले, मी आता जो चित्रपट करतोय, तो शाळेशी संबंधित असल्याने येथील शाळेतील मुलांचा त्यात समावेश आहे. इथल्या मुलांमध्ये अभिनय गुणवत्ता आहे. त्यामुळे परिषदेने त्यांचे पुढे आणण्यासाठी, अभिनयात त्यांना सक्षम करण्यासाठी अभ्यासवर्ग घ्यावा, असेही त्यांनी सुचविले. कोकणात बाहेरची संस्कृती दाखवण्यापेक्षा आपली इथली संस्कृती दाखवणे गरजेचे आहे आणि ती चांगल्या पद्धतीनेच दाखवली पाहिजे. यासाठी त्यात स्थानिक कलाकारांना प्राधान्य मिळावे, यासाठी नाट्य परिषदेने प्रयत्न करावेत, अशी आग्रही भूमिका नलावडे यांनी याप्रसंगी मांडली. कोकणातील निसर्ग व तेथील माणसे यांचे आकर्षण बाहेरील चित्रपट निर्मात्यांना राहिले आहे. दिवसेंदिवस ते वाढतच जाणार आहे.कोकणची स्तुती करताना ते म्हणाले की, येथील सिनेमे आता वाढू लागले आहेत. त्याचे कारण हे आहे की, येथील निसर्गसौंदर्य कुणालाही खिळवून ठेवणारे असेच आहे. इतर ठिकाणी जेवणाचीही वानवा जाणवते. मात्र, कोकणात माणसांची आणि त्यांच्या सहकार्याची भ्रांत नाही, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. बदललेली जीवनशैली आणि पटकन मिळणारी प्रसिद्धी यासाठी नवीन कलाकार धावत असल्याचे यावेळी नलावडे यांनी सांगितले. त्याचबरोबर आता विविध वाहिन्यांचे मालिकागणिक चेहरे बदलण्याचे धोरण असल्याने नव्या कलाकारांना वाटेल तितका वेळ कामासाठी द्यावा लागतो. दुसरे काम मिळेल ना, ही असुरक्षितता असल्यानेच आता वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना निर्माता सांगेल, तितका वेळ नाईलाजाने द्यावा लागतो, असे मतही नलावडे यांनी व्यक्त केले. यावेळी दिलीप दळवी यांनी रत्नागिरीतच सुमारे १८० स्थळांवर चित्रिकरण होऊ शकते, असे सांगतानाच आपल्या मेलवर १०५ स्थळांची यादी आल्याची माहिती दिली. प्रस्तावना अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या येथील शाखेचे कार्याध्यक्ष सुनील तथा दादा वणजु यांनी केली. यावेळी कोषाध्यक्ष अनिल दांडेकर, आप्पा रणभिसे, राजकिरण दळी, चिटणीस आसावरी शेट्ये, जयश्री बापट, अभिनेते प्रफुल्ल घाग, अनुप पेंडसे, सुनील बेंडखळे, सुहास साळवी आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)