शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

पीडित, अनाथ महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न

By admin | Updated: November 21, 2014 00:40 IST

प्रतिभा महिला वसतिगृह : अत्याचारग्रस्त, निराधारांना शासनाचा दिलासा

महिलांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आता ग्रामीण आणि शहरी भाग असे स्वतंत्र राहिले नसून, ग्रामीण भागाचेही झपाट्याने शहरीकरण होऊ लागले आहे. त्यामुळे महिलांच्या समस्यांमध्ये अधिकच भर पडू लागली आहे. समाजाची मानसिकता बदलू लागली आहे. नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्या स्त्रियांबरोबरच आता घरात राहाणाऱ्या स्त्रियांची सुरक्षितताही धोक्यात येऊ लागली आहे. अत्याचाराने पीडित अशा महिलेला समाजाकडूनही अवहेलना सोसावी लागते. मग त्यातूनच तिला वैफल्य येते आणि ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते. यात अगदी अल्पवयीन मुलीपासून प्रौढ महिलांचा समावेश आहे. आज अशा अत्याचाराच्या घटना दरदिवशीच वाचायला, ऐकायला मिळतात. म्हणूनच अशा महिलांना आधार देण्यासाठी शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे शासकीय महिला निवारा केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. अजूनही आपल्या समाजात पुरूषप्रधान संस्कृतीचा वरचष्मा आहे. त्यामुळे स्त्रीकडून क्षुल्लकशी जरी चूक झाली तरी ती तिच्यासाठी अक्षम्य अशीच असते. एवढेच नव्हे; तर बरेचदा पुरूषप्रवृत्तीला तिला बळी जावे लागते. अशावेळी समाजही त्या स्त्रीच्या बाजूने न राहता त्या पुरूषाचे समर्थन करतो आणि शिक्षा अखेर त्या स्त्रिला भोगावी लागते. परिणामी याची शिक्षा म्हणून ती स्वत:च मरणाला जवळ करते. समाजात असे अनेक प्रकार घडतात. अशा अत्याचारग्रस्त महिलांना आधार देण्यासाठी शासनाच्या जिल्हा व महिला बाल विकास विभागातर्फे महिलागृहे उभारण्यात आली आहेत. रत्नागिरीतही १८ ते ४० वयोगटातील निराश्रित, परित्यक्ता, कुमारी माता, बलात्कारित अथवा संकटग्रस्त महिलांना रत्नागिरी जिल्हा बालकल्याण समितीच्या आदेशाने आश्रय देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे महत्वपूर्ण कार्य शासकीय प्रतिभा महिला वसतिगृह ही संस्था स्थापनेपासून करीत आहे. सध्या या महिलागृहात १९ महिला आणि दोन नवजात बालके आहेत. १९७९ - ८० च्या सुमारास या महिलागृहाची स्थापना झाली. तेव्हापासून आजतागायत रात्री - अपरात्री येणाऱ्या पीडित, अत्याचारग्रस्त अशा अनेक महिलांना या महिलागृहाने आधार दिला आहे. या महिलागृहात आलेल्या महिलांना अन्न, वस्त्र व निवारा या सुविधा देतानाच आवश्यकतेनुसार त्यांना वैद्यकीय सुविधा तसेच व्यवसाय प्रशिक्षणाचीही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या साऱ्या सुविधा मोफतच दिल्या जातात. काही मुलींना त्यांच्या आयुष्यात घडलेल्या चुकीमुळे आई वडिलांनी काही कालावधीकरिता या महिलागृहात आणून ठेवले आहे. मात्र, महिलांना या महिलागृहात कुठेही हिणकस वागणूक न देता त्यांना त्यांच्या वास्तव्यात अधिकाधिक स्वावलंबी बनविण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. या संस्थेत आलेल्या कुमारीमातेच्या पुनर्वसनाबरोबरच तिच्या बाळाच्या पुनर्वसनाचीही जबाबदारी ही संस्था उचलते. काही वेळा तिच्या घरची मंडळी स्वीकारतही नाहीत. अशावेळी संस्थाच तिचे पालकत्व स्वीकारते. संस्थेत एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी झालेल्या महिलेला संस्थेतील अन्न, वस्त्र, निवारा या सुविधा मिळतातच. पण ‘माहेर’ योजनेचा लाभ एक वर्षाकरिता मिळू शकतो. या योजनेंतर्गत वर्षभर एक हजार रूपये दरमहा तिला दिले जातात. तिच्याबरोबर तिचे एक मूल असेल तर त्यालाही वर्षभर दरमहा ५०० रूपये मिळतात. दुसरे मूल असेल तर त्याला दरमहा ४०० रूपये मिळतात. या संस्थेत येणाऱ्या अविवाहिता अथवा घटस्फोटित महिलांच्या विवाहासाठीही संस्था प्रयत्न करते. कायदेविषयक मार्गदर्शनही देण्यात येते. या संस्थेत एक ते तीन वर्षे राहण्याची मर्यादा असली तरी काही वेळा त्या स्त्रीचे आप्त तिचा स्वीकार करून तिला परत नेतातच असे नाही. अशावेळी संस्था तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी उचलते. संस्थेंतर्गत अगरबत्त्या बनविणे, मेणबत्ती, पापड आदी पदार्थ बनविणे आदींचे प्रशिक्षण मिळाल्याने त्यातून तिला रोजगार मिळतो. या संस्थेत तर बालगृहातून आलेल्या अनाथ मुली आज विविध ठिकाणी उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांचे भवितव्य घडविण्याचे कामही ही संस्था करीत आहे. घरच्यांनी, समाजाने झिडकारले असले तरीही शासकीय प्रतिभा महिला वसतिगृहाच्या रूपाने त्यांना सुरक्षित निवारा मिळाल्याने त्याच्या छायेखाली त्या आपले जीवन आनंदाने, नि:शंकपणे व्यतित करीत आहेत. - शोभना कांबळेसमाजाच्या विविध घटकांचे सहकार्यआज अनेक संस्था अत्याचारग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांना सुरक्षित निवारा मिळवून देण्यासाठी कार्यरत आहेत. समाजात अशा अन्यायग्रस्त, पीडित अनेक महिला दिसतात. पण, त्यांना मदत करणाऱ्यांची संख्या फार कमी दिसते. आपणही समाजाचे जबाबदार घटक आहोत, याची जाणीव ठेवून अशा स्त्रीला मदत करण्यासाठी पुढे आलो तर निराशेतून आत्महत्या करणाऱ्या अनेक महिलांचे जीव वाचण्यास नक्कीच हातभार लागेल. शासन अशा महिलांना सुरक्षित निवारा मिळवून देत आहे. मात्र, अशा महिलांपर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत त्याची माहिती होणे आज तेवढेच गरजेचे आहे. संस्थेचा पत्ता : अधीक्षक, शासकीय प्रतिभा महिला वसतिगृह, १३१५, अभ्यंकर कपांऊंड, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, रत्नागिरी.