शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

महिलेचे आॅटोरिक्षातून अपहरण करून खुनाचा प्रयत्न

By admin | Updated: July 1, 2015 00:12 IST

घराकडे जाण्यासाठी आॅटोरिक्षात बसलेल्या एका महिलेचे अपहरण करण्यात आले. तिचे दागिने हिसकावल्यानंतर ...

चिपळूण : शहरातील खेंड - बावशेवाडी येथील गटार तसेच मच्छी मार्केट इमारतीसमोरील कॉक्रीटीकरणाचे काम बोगस झाल्याचे उघड झाल्याने या कामावरुन सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये शाब्दिक खडाजंगी उडाली. संबंधित कामांची येत्या दहा दिवसात चौकशी करुन अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर काम बोगस झाल्याचे स्पष्ट झाल्यास ठेकेदारावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी सांगितले. चिपळूण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आज (मंगळवारी) सकाळी ११.४५ वाजता श्रावणशेठ दळी सभागृहात नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शहरातील खेंड - बावशेवाडी येथे गटाराचे काम बोगस झाले असल्याचे उघड झाले आहे. या कामाबाबत ठेकेदाराची मनमानी सुरु आहे. संबंधित अधिकाऱ्यांचा कामावर अंकुश नसल्याने अशी निकृष्ट कामे होत असल्याचा आरोप नगरसेवक मिलिंद कापडी यांनी केला आहे. त्याचा धागा पकडून नगरसेवक मोहन मिरगल यांनीदेखील मटण मच्छीमार्केट येथील कॉक्रीटीकरणाचे काम निकृष्ट झाले असल्याचे सांगून बोगस कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली. सुरु असणाऱ्या कामावरुन सत्ताधारी व विरोधी नगरसेवक यांच्यात चांगलीच जुंपली. बावशेवाडी येथे गटार काम व मटण मच्छी मार्केट येथील कॉक्रीटीकरण या कामांची चौकशी करुन येत्या १० दिवसात अहवाल सादर करण्याची सूचना बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांना मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी केली. चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर झालेल्या कामामध्ये संबंधित ठेकेदार दोषी आढळल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले. शहरात होणारी विविध कामे अंदाजपत्रकाप्रमाणे होत आहेत की नाही, हे पाहिले जात नसल्याने जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, असा सवाल पाणी पुरवठा सभापती लियाकत शाह यांनी केला. शहरातील काही भागात गेल्या दोन महिन्यांपासून पथदीप बंद आहेत. तक्रार करुनही हे पथदीप सुरु होत नाहीत, अशी खंत नगरसेवक संजय रेडीज यांनी व्यक्त केली. शहरातील मार्कंडी येथील पेट्रोल पंपाचे थकीत भाडे नवीन मूल्यांकनानुसार ३ लाख ८९ हजार असून, ते लवकरात लवकर वसूल होण्याच्या दृष्टीने कार्यवाही व्हावी, असाही मुद्दा पुढे आला.शहरात सध्या गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी नगरसेविका आदिती देशपांडे यांनी केली. जंतुनाशक फवारणीसाठी वर्षाला अंदाजे १२ लाख रुपये खर्च येत असून, डासांचे प्रमाण कमी होत आहे. ३ लाखापेक्षा जास्त असलेल्या कामांसाठी ई - टेंडर पध्दत राबवावी, असा मुद्दाही या सभेत मांडण्यात आला. (वार्ताहर)उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल झालेल्या जनहित याचिकेनुसार नगर परिषद हद्दीत जैविक विविधता समिती गठीत करण्यावर शिक्कामोर्तब झाले. या समितीमध्ये नगरध्यक्षा सावित्री होमकळस, रिहाना बिजले, समीर जाधव, कबीर काद्री यांचा समावेश आहे. नगर परिषदेच्या २०१४-१५च्या जमा-खर्च अहवालावर चर्चा झाली. प्रत्यक्षात जमा व खर्च यामध्ये ८ कोटी ३२ लाखांची तफावत असून, पहिल्याच पानावर चूक असल्याचे नगरसेविका सुरेखा खेराडे यांनी निदर्शनास आणून दिले. पडताळणी करुनच जमा-खर्च अहवाल सादर केला जावा, असे खेराडे यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानअंतर्गत घर तेथे शौचालय यासाठी शहर परिसरातील ५७० अर्ज नगर परिषद आरोग्य विभागाकडे प्राप्त झाले असल्याचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी सांगितले.