शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

कोरोनामुळे भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून त्यासाठी लॉकडाऊनही जाहीर करण्यात आले आहे. कोविड नियम, अटी मोडणाऱ्यांविरोधात प्रशासनाने अखेर कारवाईचा बडगा उचलला. मात्र, कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टायर रिमोल्डिंग बंद

देवरुख : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार कोसुंब शाळेजवळ अनधिकृतपणे सुरू असलेला टायर रिमोल्डिंग कारखाना बंद करण्यात आला आहे. मागील ६ वर्षांपासूनची मागणी मंडळासह अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केल्याबद्दल कोसुंब ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

कासवांची ३३ घरटी संरक्षित

दापोली : मुरूड समुद्रकिनारी कासवाच्या पिलांचे नुकतेच जलार्पण करण्यात आले. आतापर्यंत सुमारे ५५ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. दरवर्षी मुरुडमध्ये ऑलिव्ह रिडले कासवाची अंडी सापडतात. येथील कासवमित्र ज्ञानेश्वर माने व सहकारी राजेश शिगवण यांनी कासवाची ३३ घरटी संरक्षित केली आहेत.

विशेष रेल्वेला मुदतवाढ

खेड : शिमगोत्सवात कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना उसळणारी गर्दी लक्षात घेऊन, चार फेस्टिव्हल सुपरफास्ट स्पेशल गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार दोन फेस्टिव्हल स्पेशल ३१ मार्चपासून व अन्य २ स्पेशल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून धावणार आहेत.

कारवाईची मागणी

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-देवरुख-संगमेश्वर या रस्त्याच्या कामात घोटाळा झाला आहे. त्याची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी राज्य सरकार आणि विरोधी पक्षाकडे केली आहे.

कुंबळे गावचे कौतुक

मंडणगड : प्रशासनाच्या मदतीने अतिशय उत्तम, सांघिक कार्य करत अत्यंत लोकोपयोगी काम कुंबळे ग्रामीण बाजार व कुंबळे ग्रामपंचायतीने नवीन कार्यालयाच्या रूपाने साकारले आहे. हे काम लोकोपयोगी असल्याने दोन्ही उपक्रमांचे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी कौतुक केले आहे.

अखेर ग्रामस्थ जिंकले

राजापूर : तालुक्यातील कशेळी फोडकरवाडी नळपाणी योजनेचा प्रश्न अखेर निकाली काढण्यात आला आहे. नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे लोकवर्गणी देण्याचा निर्णय देण्यात आला आहेे. कशेळी ग्रामपंचायत हद्दीतील फोडकरवाडी येथे १४ वर्षांपूर्वी नळपाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती.