शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

बारावीच्या मूल्यांकनास आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

रत्नागिरी : बारावी परीक्षेच्या मूल्यांकनाबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. ...

रत्नागिरी : बारावी परीक्षेच्या मूल्यांकनाबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बुधवार दि.७ जुलैपासून महाविद्यालयीनस्तरावर शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले जाणार आहे. दि.२३ जुलैपर्यंत मूल्यमापनाचे काम पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतरच बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याने शासनाने परीक्षा रद्द केल्या. शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा जाहीर केला होता. त्यानुसार आता कनिष्ठ महाविद्यालयांनी दि. ७ ते २३ जुलैपर्यंत अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर दि.१४ ते २१ जुलै या कालावधीत मुख्याध्यापक, प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरायचे आहेत. निकाल प्रमाणित करण्यासाठी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एक सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीने निकाल प्रमाणित केल्यानंतर आणि ते प्राचार्यांनी संगणकीय प्रणालीत भरल्यानंतर मंडळ स्तरावर अंतिम निकाल तयार करण्यात येणार आहे. गुण ऑनलाईन भरल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांनी ते सीलबंद पाकिटात विभागीय मंडळाकडे दि.२१ ते २३ जुलैअखेर सादर करायचे आहेत.

दहावीच्या गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे ४० टक्के यावर बारावीचा अंतिम निकाल तयार केला जाणार आहे. दहावीच्या वर्षांचे गुण लक्षात घेताना सर्वाधिक गुण असलेले तीन विषय विचारात घेतले जाणार आहेत. जुलैअखेर अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.