शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
4
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
5
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
6
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
7
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
8
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
9
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
10
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
11
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
12
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
13
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
14
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
15
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
16
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
17
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
18
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
19
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
20
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

गावाकडे येणाऱ्या प्रत्येकाला चाचणी करण्यास सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क पावस : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी गावाकडे येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्यांना चाचण्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

पावस : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी गावाकडे येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्यांना चाचण्या करून येणे हे अग्रक्रमाने सांगावे, जेणेकरून येणाऱ्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट राहणार नाही आणि प्रत्येकाला उत्सव आनंदाने साजरा करता येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी सांगितले.

पूर्णगड सागरी पोलीस स्थानकातर्फे गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावस येथे दक्षता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी व स्थानिक नागरिक यांच्या माध्यमातून विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यकते नियम न पाळल्यामुळे दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसला. त्यामुळे या कालावधीमध्ये पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली होती. सध्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. मात्र, ही घट कायम ठेवण्यासाठी मुंबईतून येणाऱ्या प्रत्येकाला चाचण्या करून येण्यास भाग पाडावे, असे वाघमारे यांनी सांगितले. प्रत्येकाने उत्सव सर्व नियमांचे पालन करून, साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा. प्रत्येकाने कोणत्याही नियमाला बाधा न येऊ देता, घरोघरी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन वाघमारे यांनी केले.

यावेळी माजी सरपंच लाइफ फोडू यांनी काही चाकरमानी अथवा नागरिक यांना काही त्रास जाणवल्यास जवळच्या ग्राम विलगीकरण कक्षात सोय करावी, जेणेकरून त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही, असे सांगितले. याबाबत उपविभागीय पाेलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी आम्ही संबंधित ग्राम विलगीकरण कक्ष या दरम्यान पुन्हा सुरू करण्याचे संबंधित यंत्रणेला सांगू, जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही, असे सांगितले.

त्यानंतर, मुस्लीम बांधवांतर्फे अश्रफ कप्तान यांनी मुस्लीम बांधवांप्रमाणे हिंदू बांधवही नियमांचे पालन करून गणेशाेत्सव साजरा करतील, अशी ग्वाही पोलीस यंत्रणेला दिले. काेराेना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी या वर्षी मंगलमूर्ती सजावट स्पर्धा स्थगित केल्याची माहिती देण्यात आली. विषाणूचा संसर्ग संपुष्टात आल्यानंतर पुन्हा नव्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्पर्धा सुरू होतील, असे आयोजकांनी सांगितले.