शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

गावाकडे येणाऱ्या प्रत्येकाला चाचणी करण्यास सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क पावस : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी गावाकडे येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्यांना चाचण्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

पावस : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी गावाकडे येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्यांना चाचण्या करून येणे हे अग्रक्रमाने सांगावे, जेणेकरून येणाऱ्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट राहणार नाही आणि प्रत्येकाला उत्सव आनंदाने साजरा करता येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी सांगितले.

पूर्णगड सागरी पोलीस स्थानकातर्फे गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावस येथे दक्षता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी व स्थानिक नागरिक यांच्या माध्यमातून विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यकते नियम न पाळल्यामुळे दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसला. त्यामुळे या कालावधीमध्ये पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली होती. सध्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. मात्र, ही घट कायम ठेवण्यासाठी मुंबईतून येणाऱ्या प्रत्येकाला चाचण्या करून येण्यास भाग पाडावे, असे वाघमारे यांनी सांगितले. प्रत्येकाने उत्सव सर्व नियमांचे पालन करून, साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा. प्रत्येकाने कोणत्याही नियमाला बाधा न येऊ देता, घरोघरी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन वाघमारे यांनी केले.

यावेळी माजी सरपंच लाइफ फोडू यांनी काही चाकरमानी अथवा नागरिक यांना काही त्रास जाणवल्यास जवळच्या ग्राम विलगीकरण कक्षात सोय करावी, जेणेकरून त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही, असे सांगितले. याबाबत उपविभागीय पाेलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी आम्ही संबंधित ग्राम विलगीकरण कक्ष या दरम्यान पुन्हा सुरू करण्याचे संबंधित यंत्रणेला सांगू, जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही, असे सांगितले.

त्यानंतर, मुस्लीम बांधवांतर्फे अश्रफ कप्तान यांनी मुस्लीम बांधवांप्रमाणे हिंदू बांधवही नियमांचे पालन करून गणेशाेत्सव साजरा करतील, अशी ग्वाही पोलीस यंत्रणेला दिले. काेराेना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी या वर्षी मंगलमूर्ती सजावट स्पर्धा स्थगित केल्याची माहिती देण्यात आली. विषाणूचा संसर्ग संपुष्टात आल्यानंतर पुन्हा नव्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्पर्धा सुरू होतील, असे आयोजकांनी सांगितले.