शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

गावाकडे येणाऱ्या प्रत्येकाला चाचणी करण्यास सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क पावस : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी गावाकडे येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्यांना चाचण्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

पावस : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी गावाकडे येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्यांना चाचण्या करून येणे हे अग्रक्रमाने सांगावे, जेणेकरून येणाऱ्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट राहणार नाही आणि प्रत्येकाला उत्सव आनंदाने साजरा करता येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी सांगितले.

पूर्णगड सागरी पोलीस स्थानकातर्फे गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावस येथे दक्षता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी व स्थानिक नागरिक यांच्या माध्यमातून विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यकते नियम न पाळल्यामुळे दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसला. त्यामुळे या कालावधीमध्ये पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली होती. सध्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. मात्र, ही घट कायम ठेवण्यासाठी मुंबईतून येणाऱ्या प्रत्येकाला चाचण्या करून येण्यास भाग पाडावे, असे वाघमारे यांनी सांगितले. प्रत्येकाने उत्सव सर्व नियमांचे पालन करून, साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा. प्रत्येकाने कोणत्याही नियमाला बाधा न येऊ देता, घरोघरी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन वाघमारे यांनी केले.

यावेळी माजी सरपंच लाइफ फोडू यांनी काही चाकरमानी अथवा नागरिक यांना काही त्रास जाणवल्यास जवळच्या ग्राम विलगीकरण कक्षात सोय करावी, जेणेकरून त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही, असे सांगितले. याबाबत उपविभागीय पाेलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी आम्ही संबंधित ग्राम विलगीकरण कक्ष या दरम्यान पुन्हा सुरू करण्याचे संबंधित यंत्रणेला सांगू, जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही, असे सांगितले.

त्यानंतर, मुस्लीम बांधवांतर्फे अश्रफ कप्तान यांनी मुस्लीम बांधवांप्रमाणे हिंदू बांधवही नियमांचे पालन करून गणेशाेत्सव साजरा करतील, अशी ग्वाही पोलीस यंत्रणेला दिले. काेराेना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी या वर्षी मंगलमूर्ती सजावट स्पर्धा स्थगित केल्याची माहिती देण्यात आली. विषाणूचा संसर्ग संपुष्टात आल्यानंतर पुन्हा नव्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्पर्धा सुरू होतील, असे आयोजकांनी सांगितले.