शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

डाॅक्टर्स उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:27 IST

राजापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकणातील परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिवशी ५०० ते ७०० रुग्ण ...

राजापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकणातील परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिवशी ५०० ते ७०० रुग्ण आढळत आहेत. कोकणामध्ये एमबीबीएस व एमडी फिजिशिअन डॉक्टर्सची कमतरता भासत आहे. जिल्ह्यात एमबीबीएस व एमडी फिजिशिअन डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनाद्वारे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकणातील परिस्थिती अत्यंत भयावह बनल्याचे म्हटले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक दिवशी ५०० ते ७०० रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्यात जे डॉक्टर्स उपलब्ध आहेत, त्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयाची यंत्रणा चालत असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयावर भार पडत आहे. त्यामुळे यंत्रणा अपुरी पडत असल्याचे दिसत आहे. कोविडच्या आजारावर मात करण्यासाठी तालुक्या-तालुक्यामध्ये हॉस्पिटल उभारणे व त्यामध्ये एमबीबीएस व एमडी फिजिशिअन डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार साळवी यांनी केली आहे.