शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

लिलीच्या शेतीतून प्राप्त होतेय अर्थार्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:31 IST

केळ्ये येथील स्वरूप श्रीहरी देसाई यांनी सिव्हील इंजिनिअरींग पूर्ण केल्यानंतर नोकरी किंवा व्यवसायाच्या मागे न लागता शेतीचा निर्णय घेतला. ...

केळ्ये येथील स्वरूप श्रीहरी देसाई यांनी सिव्हील इंजिनिअरींग पूर्ण केल्यानंतर नोकरी किंवा व्यवसायाच्या मागे न लागता शेतीचा निर्णय घेतला. वडिलोपार्जित जागेत लागवडीचा निर्णय घेतला. कोणत्या प्रकारची शेती करावी, याबाबत विचार सुरू असतानाच लिलीच्या फुलांची शेती करण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. चार एकर क्षेत्रावर लिलीची लागवड केली आहे.

पुणे येथील नर्सरीतून लिलीचे कंद आणून लागवड केली. गादी वाफे तयार करून कंद लागवड केली. शेणखतही वापरण्यात आले. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी ठिबक सिंचन व्यवस्था केली आहे. गेली चार वर्षे त्यांनी लिलीची लागवड वाढवित नेली. पावसाळ्यात स्लॅक सिझन असल्याने दोनशे दिवसांत चांगले उत्पादन प्राप्त होते. या काळात ८० हजार जुड्या प्राप्त होत असून, वर्षाला आठ लाखांचे उत्पन्न सहज प्राप्त होते. पीक व्यवस्थापन ते उत्पादन प्राप्त होईपर्यंत पन्नास टक्के खर्च येतो.

लागवडीपासून फुले काढणीपर्यंत त्यांच्याकडे मजुरांचा सतत राबता असतो. १४६० मजुरांना वर्षभर काम मिळत आहे. लिलीच्या शेतीमध्ये त्यांनी चवळी, मटकी, भुईमूगाची लागवड केली असून चांगले उत्पादन त्यांना प्राप्त होत आहे. शहरातील फुलविक्रेत्यांना ते सकाळी स्वत: येऊन मागणीनुसार फुलांच्या जुड्या देत आहेत. प्रती जुडी आठ ते दहा रुपये दर प्राप्त होत असून ४० कळ्यांची जुडी बांधत आहेत. फुले काढणे, जुड्या बांधण्यासाठी स्वरूप यांना पत्नी, आईची साथ लाभत आहे. शेतीतही फायदा असल्याचे सिध्द केले आहे.

मशागतीला प्राधान्य

कोणत्याही प्रकारची शेती करताना, मशागत आवश्यक आहे. त्यामुळे लिलीचे कंद लावल्यानंतर योग्य वेळी खते, कीटकनाशक फवारणी, वाढलेल्या रोपांची ठरावीक वेळी छाटणी करीत असल्याने वर्षभरात उत्पादन सुरू झाले. दररोज फुलांच्या जुड्या बांधून ते शहरातील फुलविक्रेत्यांना विकत आहेत. ४० कळ्यांच्या जुड्या बांधल्या जात आहेत. त्यामुळे फुलविक्रेत्यांना जुड्या देणे सुलभ होत असून व्यवसायात हळूहळू वृध्दी झाली आहे.

गुलाबाची शेती करण्याचा निश्चय

वडिलोपार्जित शेतात ते लिलीबरोबर सेंद्रिय पद्धतीने आंबा उत्पादन घेत आहेत. लिलीच्या शेतात मटकी, चवळी, भूईमुगाचे उत्पादन घेत आहेत. शहरात फुलांना चांगली मागणी होत असल्याने गुलाबाची शेती रिकाम्या प्लॉटमध्ये करण्याचे निश्चित केले आहे. पावसाळ्यात चार महिने फुलांचा व्यवसाय धोक्यात असला तरी उर्वरित आठ महिने चांगला व्यवसाय होतो.

एक वर्षानंतर उत्पन्न

लिलीच्या कंदाची लागवड केल्यानंतर एक वर्षानंतर उत्पन्न सुरू होते. वेळेवर योग्य मशागत असेल तर उत्पन्न चांगले प्राप्त होते. लिलीच्या फुलांना बाजारात चांगली मागणीही आहे.

- चार एकर क्षेत्रावर लिलीची लागवड.

- वर्षभर १४६० मजुरांना झाला रोजगार प्राप्त.

- वार्षिक आठ लाखाचे उत्पन्न पैकी ५० टक्के खर्च.