शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या शास्त्रज्ञांचे कलाविश्व उलगडणार!

By admin | Updated: January 13, 2015 00:10 IST

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन : आंबवच्या माने महाविद्यालयात अवतरणार विज्ञान युग

रत्नागिरी : ‘चिरंतन विश्वासाठी गणित, विज्ञान’ ही थीम घेऊन १७ ते २१ जानेवारी या कालावधीत आंबव येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार आहे. १९८३ साली रा. भा. शिर्के प्रशालेत विज्ञान प्रदर्शन झाले होते. तद्नंतर सुमारे ३२ वर्षांनंतर रत्नागिरी जिल्ह्याला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे यजमानपद भुषवण्याचा मान मिळाला आहे.राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाची जय्यत तयारी आंबव येथील राजेंद्र माने महाविद्यालयात सुरु आहे. शालेय विभाग महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, राज्य विज्ञान संस्था, नागपूर व राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबव यांच्या संयुक्त विद्यमाने आंबव येथे १७ ते २१ अखेर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रदर्शन होणार आहे. राज्यभरातून सुमारे ३६ जिल्हे प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. एकूण ४२६ विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.राज्यभरातील प्राथमिक विभागाकडून १२३, माध्यमिक विभागातील १२३, शैक्षणिक साहित्य प्रतिकृ ती, प्राथमिक विभागाच्या ३६, माध्यमिक विभागाच्या ३६, लोकसंख्या शिक्षण संबंधी शिक्षकांच्या प्रतिकृती मांडण्यात येणार आहेत. या विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक व प्राथमिक विभागांच्या प्रत्येकी ३६ प्रतिकृ ती सादर केल्या जाणार आहेत.याशिवाय प्रयोगशाळा परिचरांच्या ३६ वैज्ञानिक प्रतिकृती मिळून एकूण ४२६ विज्ञान प्रतिकृ ती सादर केल्या जाणार आहेत. राज्यभरातील ३६ जिल्हे या प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवणार असून, २४६ विद्यार्थी, २४६ शिक्षक, १८० प्रतिकृ ती सादर करणारे शिक्षक तसेच विज्ञान पर्यवेक्षक, अधिकारी मिळून सुमारे १००० ते १२०० लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.राज्यस्तरीय विज्ञान शिबिर असल्यामुळे जिल्ह्यातील विविध शाळा, विद्यार्थी तसेच नागरिकांना वैज्ञानिक प्रतिकृती पाहता याव्यात, याकरिता प्रत्येक तालुक्यातून खास एस. टी. बसेसची सुविधा करण्यात आली आहे.एस. टी. प्रशासनाने मागणीप्रमाणे गाड्या सोडण्याचे आश्वासन दिले आहे. दापोली, मंडणगड व रत्नागिरी तालुक्यासाठी १८ रोजी, खेड, राजापूर, लांजा तालुक्यासाठी १९ रोजी, चिपळूण, गुहागर तालुक्यातून २० रोजी, तर संगमेश्वर तालुक्यातून सलग चारही दिवस एस. टी.च्या गाड्या सोडण्यात येणार आहेत.राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन ३२ वर्षांनंतर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच होत असल्याने माने महाविद्यालयाच्या परिसरात विज्ञानमय वातावरण झाले आहे. (प्रतिनिधी)