शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

चिमुकल्या शास्त्रज्ञांचे कलाविश्व उलगडणार!

By admin | Updated: January 13, 2015 00:10 IST

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन : आंबवच्या माने महाविद्यालयात अवतरणार विज्ञान युग

रत्नागिरी : ‘चिरंतन विश्वासाठी गणित, विज्ञान’ ही थीम घेऊन १७ ते २१ जानेवारी या कालावधीत आंबव येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार आहे. १९८३ साली रा. भा. शिर्के प्रशालेत विज्ञान प्रदर्शन झाले होते. तद्नंतर सुमारे ३२ वर्षांनंतर रत्नागिरी जिल्ह्याला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे यजमानपद भुषवण्याचा मान मिळाला आहे.राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाची जय्यत तयारी आंबव येथील राजेंद्र माने महाविद्यालयात सुरु आहे. शालेय विभाग महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, राज्य विज्ञान संस्था, नागपूर व राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबव यांच्या संयुक्त विद्यमाने आंबव येथे १७ ते २१ अखेर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रदर्शन होणार आहे. राज्यभरातून सुमारे ३६ जिल्हे प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. एकूण ४२६ विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.राज्यभरातील प्राथमिक विभागाकडून १२३, माध्यमिक विभागातील १२३, शैक्षणिक साहित्य प्रतिकृ ती, प्राथमिक विभागाच्या ३६, माध्यमिक विभागाच्या ३६, लोकसंख्या शिक्षण संबंधी शिक्षकांच्या प्रतिकृती मांडण्यात येणार आहेत. या विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक व प्राथमिक विभागांच्या प्रत्येकी ३६ प्रतिकृ ती सादर केल्या जाणार आहेत.याशिवाय प्रयोगशाळा परिचरांच्या ३६ वैज्ञानिक प्रतिकृती मिळून एकूण ४२६ विज्ञान प्रतिकृ ती सादर केल्या जाणार आहेत. राज्यभरातील ३६ जिल्हे या प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवणार असून, २४६ विद्यार्थी, २४६ शिक्षक, १८० प्रतिकृ ती सादर करणारे शिक्षक तसेच विज्ञान पर्यवेक्षक, अधिकारी मिळून सुमारे १००० ते १२०० लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.राज्यस्तरीय विज्ञान शिबिर असल्यामुळे जिल्ह्यातील विविध शाळा, विद्यार्थी तसेच नागरिकांना वैज्ञानिक प्रतिकृती पाहता याव्यात, याकरिता प्रत्येक तालुक्यातून खास एस. टी. बसेसची सुविधा करण्यात आली आहे.एस. टी. प्रशासनाने मागणीप्रमाणे गाड्या सोडण्याचे आश्वासन दिले आहे. दापोली, मंडणगड व रत्नागिरी तालुक्यासाठी १८ रोजी, खेड, राजापूर, लांजा तालुक्यासाठी १९ रोजी, चिपळूण, गुहागर तालुक्यातून २० रोजी, तर संगमेश्वर तालुक्यातून सलग चारही दिवस एस. टी.च्या गाड्या सोडण्यात येणार आहेत.राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन ३२ वर्षांनंतर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच होत असल्याने माने महाविद्यालयाच्या परिसरात विज्ञानमय वातावरण झाले आहे. (प्रतिनिधी)