शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

रत्नागिरी जिल्ह्यात ५८ कोटी ८१ लाख रुपयांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वीजबिल वसुलीत सातत्याने अग्रक्रमावर राहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला ग्रहण लागले असून, थकबाकीच्या रकमेत कमालीची वाढ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वीजबिल वसुलीत सातत्याने अग्रक्रमावर राहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला ग्रहण लागले असून, थकबाकीच्या रकमेत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये लाॅकडाऊन झाले. तेव्हापासून वीजबिले वेळेवर न भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार १४३ ग्राहकांनी वीजबिलच न भरल्यामुळे ५८ कोटी ८१ लाख ५५ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. सर्वाधिक थकबाकी घरगुती ग्राहकांची आहे. जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार ९४३ ग्राहकांकडे २६ कोटी ३० लाख ५२ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

जिल्ह्यातील वाणिज्यिकच्या १९ हजार ९१ ग्राहकांकडे एक कोटी ९७ लाख ५५ हजार, औद्योगिकच्या २१५७ ग्राहकांकडे ६ कोटी १५ लाख ३४ हजार, कृषीच्या ४ हजार ४२१ ग्राहकांकडे ६१ लाख ५५ हजार, पथदीपाचे १,५४३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ८ कोटी ९७ लाख ९० हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाकडील १,६१९ ग्राहकांकडे २ कोटी ९९ लाख ४९ हजार, अन्य २,५४८ ग्राहकांकडे एक कोटी २५ लाख ७९ हजार मिळून एकूण एक लाख ८३ हजार १४३ ग्राहकांकडील ५८ कोटी ८१ लाख ५५ हजार रुपयांची थकबाकी वसुलीचे आव्हान महावितरणपुढे उभे ठाकले आहे.

चिपळूण विभागातील ३६ हजार ६१४ घरगुती ग्राहकांकडे सात कोटी ५५ लाख ११ हजार, वाणिज्यिकच्या पाच हजार ३३ ग्राहकांकडे ३ कोटी ३० लाख ६३ हजार, औद्योगिकच्या ५१३ ग्राहकांकडे एक कोटी ६३ लाख ९५ हजार रुपये थकबाकी आहे. कृषीच्या १,२६७ ग्राहकांकडे १७ लाख ४९ हजार, पथदीपच्या २२६ ग्राहकांकडे एक कोटी ६३ लाख ३५ हजार मिळून एकूण ४४ हजार ९५० ग्राहकांकडे १५ कोटी ६९ लाख ३१ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

खेड विभागातील ३७ हजार २४ ग्राहकांकडे ६ कोटी १३ लाख ८ हजार, वाणिज्यिकच्या ४ हजार ४४९ ग्राहकांकडे २ कोटी ४६ लाख ४३ हजार, औद्योगिकच्या ५६४ ग्राहकांकडे एक कोटी ६८ लाख ६८ हजार रुपये थकबाकी शिल्लक आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ४५८ ग्राहकांकडे ८७ लाख ६८ हजार, इतर ६९ ग्राहकांकडे ३ कोटी ९१ हजार मिळून एकूण ४५ हजार २६९ ग्राहकांकडे १४ कोटी ७१ लाख ३६ हजार रुपयांची थकबाकी आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ७४ हजार ३०५ ग्राहकांकडे १२ कोटी ६२ लाख ३२ हजार रूपयांची थकबाकी आहे. वाणिज्यिकच्या ९ हजार ६०९ ग्राहकांकडे पाच कोटी २० लाख ४८ हजार, औद्योगिकच्या एक हजार ८० ग्राहकांकडे दोन कोटी ८२ लाख ७१ हजार, कृषीच्या एक हजार ८४३ ग्राहकांकडे २५ लाख ५९ हजार, पथदीपच्या ८५४ ग्राहकांकडे ४ कोटी ३७ लाख ६० हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ८२१ ग्राहकांकडे एक कोटी १९ लाख ८९ हजार, अन्य २४२९ ग्राहकांकडे एक कोटी १८ लाख ९७ हजार मिळून एकूण ९२ हजार ९२४ ग्राहकांकडे २८ कोटी ४० लाख ८८ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी रत्नागिरी विभागात आहे.

कोट घ्यावा

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना घरच्या घरी देयक भरणा करण्याची सुविधा महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोपी व सुटसुटीत पद्धत असून, ग्राहकांनी अवलंब करणे गरजेचे आहे. ‘निसर्ग’ व ‘ताैक्ते’ वादळामुळे मोठा आर्थिक फटका महावितरणला बसला असून, सद्यस्थितीत वीजबिल न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा सुरू ठेवणे शक्य नसल्याने कारवाई करण्यात येणार आहे.

देवेंद्र सायनेकर, मुख्य अभियंता, महावितरण