शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

रत्नागिरी जिल्ह्यात ५८ कोटी ८१ लाख रुपयांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वीजबिल वसुलीत सातत्याने अग्रक्रमावर राहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला ग्रहण लागले असून, थकबाकीच्या रकमेत कमालीची वाढ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वीजबिल वसुलीत सातत्याने अग्रक्रमावर राहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला ग्रहण लागले असून, थकबाकीच्या रकमेत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये लाॅकडाऊन झाले. तेव्हापासून वीजबिले वेळेवर न भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार १४३ ग्राहकांनी वीजबिलच न भरल्यामुळे ५८ कोटी ८१ लाख ५५ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. सर्वाधिक थकबाकी घरगुती ग्राहकांची आहे. जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार ९४३ ग्राहकांकडे २६ कोटी ३० लाख ५२ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

जिल्ह्यातील वाणिज्यिकच्या १९ हजार ९१ ग्राहकांकडे एक कोटी ९७ लाख ५५ हजार, औद्योगिकच्या २१५७ ग्राहकांकडे ६ कोटी १५ लाख ३४ हजार, कृषीच्या ४ हजार ४२१ ग्राहकांकडे ६१ लाख ५५ हजार, पथदीपाचे १,५४३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ८ कोटी ९७ लाख ९० हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाकडील १,६१९ ग्राहकांकडे २ कोटी ९९ लाख ४९ हजार, अन्य २,५४८ ग्राहकांकडे एक कोटी २५ लाख ७९ हजार मिळून एकूण एक लाख ८३ हजार १४३ ग्राहकांकडील ५८ कोटी ८१ लाख ५५ हजार रुपयांची थकबाकी वसुलीचे आव्हान महावितरणपुढे उभे ठाकले आहे.

चिपळूण विभागातील ३६ हजार ६१४ घरगुती ग्राहकांकडे सात कोटी ५५ लाख ११ हजार, वाणिज्यिकच्या पाच हजार ३३ ग्राहकांकडे ३ कोटी ३० लाख ६३ हजार, औद्योगिकच्या ५१३ ग्राहकांकडे एक कोटी ६३ लाख ९५ हजार रुपये थकबाकी आहे. कृषीच्या १,२६७ ग्राहकांकडे १७ लाख ४९ हजार, पथदीपच्या २२६ ग्राहकांकडे एक कोटी ६३ लाख ३५ हजार मिळून एकूण ४४ हजार ९५० ग्राहकांकडे १५ कोटी ६९ लाख ३१ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

खेड विभागातील ३७ हजार २४ ग्राहकांकडे ६ कोटी १३ लाख ८ हजार, वाणिज्यिकच्या ४ हजार ४४९ ग्राहकांकडे २ कोटी ४६ लाख ४३ हजार, औद्योगिकच्या ५६४ ग्राहकांकडे एक कोटी ६८ लाख ६८ हजार रुपये थकबाकी शिल्लक आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ४५८ ग्राहकांकडे ८७ लाख ६८ हजार, इतर ६९ ग्राहकांकडे ३ कोटी ९१ हजार मिळून एकूण ४५ हजार २६९ ग्राहकांकडे १४ कोटी ७१ लाख ३६ हजार रुपयांची थकबाकी आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ७४ हजार ३०५ ग्राहकांकडे १२ कोटी ६२ लाख ३२ हजार रूपयांची थकबाकी आहे. वाणिज्यिकच्या ९ हजार ६०९ ग्राहकांकडे पाच कोटी २० लाख ४८ हजार, औद्योगिकच्या एक हजार ८० ग्राहकांकडे दोन कोटी ८२ लाख ७१ हजार, कृषीच्या एक हजार ८४३ ग्राहकांकडे २५ लाख ५९ हजार, पथदीपच्या ८५४ ग्राहकांकडे ४ कोटी ३७ लाख ६० हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ८२१ ग्राहकांकडे एक कोटी १९ लाख ८९ हजार, अन्य २४२९ ग्राहकांकडे एक कोटी १८ लाख ९७ हजार मिळून एकूण ९२ हजार ९२४ ग्राहकांकडे २८ कोटी ४० लाख ८८ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी रत्नागिरी विभागात आहे.

कोट घ्यावा

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना घरच्या घरी देयक भरणा करण्याची सुविधा महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोपी व सुटसुटीत पद्धत असून, ग्राहकांनी अवलंब करणे गरजेचे आहे. ‘निसर्ग’ व ‘ताैक्ते’ वादळामुळे मोठा आर्थिक फटका महावितरणला बसला असून, सद्यस्थितीत वीजबिल न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा सुरू ठेवणे शक्य नसल्याने कारवाई करण्यात येणार आहे.

देवेंद्र सायनेकर, मुख्य अभियंता, महावितरण