शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

रत्नागिरी जिल्ह्यात ५८ कोटी ८१ लाख रुपयांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वीजबिल वसुलीत सातत्याने अग्रक्रमावर राहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला ग्रहण लागले असून, थकबाकीच्या रकमेत कमालीची वाढ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वीजबिल वसुलीत सातत्याने अग्रक्रमावर राहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला ग्रहण लागले असून, थकबाकीच्या रकमेत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये लाॅकडाऊन झाले. तेव्हापासून वीजबिले वेळेवर न भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार १४३ ग्राहकांनी वीजबिलच न भरल्यामुळे ५८ कोटी ८१ लाख ५५ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. सर्वाधिक थकबाकी घरगुती ग्राहकांची आहे. जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार ९४३ ग्राहकांकडे २६ कोटी ३० लाख ५२ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

जिल्ह्यातील वाणिज्यिकच्या १९ हजार ९१ ग्राहकांकडे एक कोटी ९७ लाख ५५ हजार, औद्योगिकच्या २१५७ ग्राहकांकडे ६ कोटी १५ लाख ३४ हजार, कृषीच्या ४ हजार ४२१ ग्राहकांकडे ६१ लाख ५५ हजार, पथदीपाचे १,५४३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ८ कोटी ९७ लाख ९० हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाकडील १,६१९ ग्राहकांकडे २ कोटी ९९ लाख ४९ हजार, अन्य २,५४८ ग्राहकांकडे एक कोटी २५ लाख ७९ हजार मिळून एकूण एक लाख ८३ हजार १४३ ग्राहकांकडील ५८ कोटी ८१ लाख ५५ हजार रुपयांची थकबाकी वसुलीचे आव्हान महावितरणपुढे उभे ठाकले आहे.

चिपळूण विभागातील ३६ हजार ६१४ घरगुती ग्राहकांकडे सात कोटी ५५ लाख ११ हजार, वाणिज्यिकच्या पाच हजार ३३ ग्राहकांकडे ३ कोटी ३० लाख ६३ हजार, औद्योगिकच्या ५१३ ग्राहकांकडे एक कोटी ६३ लाख ९५ हजार रुपये थकबाकी आहे. कृषीच्या १,२६७ ग्राहकांकडे १७ लाख ४९ हजार, पथदीपच्या २२६ ग्राहकांकडे एक कोटी ६३ लाख ३५ हजार मिळून एकूण ४४ हजार ९५० ग्राहकांकडे १५ कोटी ६९ लाख ३१ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

खेड विभागातील ३७ हजार २४ ग्राहकांकडे ६ कोटी १३ लाख ८ हजार, वाणिज्यिकच्या ४ हजार ४४९ ग्राहकांकडे २ कोटी ४६ लाख ४३ हजार, औद्योगिकच्या ५६४ ग्राहकांकडे एक कोटी ६८ लाख ६८ हजार रुपये थकबाकी शिल्लक आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ४५८ ग्राहकांकडे ८७ लाख ६८ हजार, इतर ६९ ग्राहकांकडे ३ कोटी ९१ हजार मिळून एकूण ४५ हजार २६९ ग्राहकांकडे १४ कोटी ७१ लाख ३६ हजार रुपयांची थकबाकी आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ७४ हजार ३०५ ग्राहकांकडे १२ कोटी ६२ लाख ३२ हजार रूपयांची थकबाकी आहे. वाणिज्यिकच्या ९ हजार ६०९ ग्राहकांकडे पाच कोटी २० लाख ४८ हजार, औद्योगिकच्या एक हजार ८० ग्राहकांकडे दोन कोटी ८२ लाख ७१ हजार, कृषीच्या एक हजार ८४३ ग्राहकांकडे २५ लाख ५९ हजार, पथदीपच्या ८५४ ग्राहकांकडे ४ कोटी ३७ लाख ६० हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ८२१ ग्राहकांकडे एक कोटी १९ लाख ८९ हजार, अन्य २४२९ ग्राहकांकडे एक कोटी १८ लाख ९७ हजार मिळून एकूण ९२ हजार ९२४ ग्राहकांकडे २८ कोटी ४० लाख ८८ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी रत्नागिरी विभागात आहे.

कोट घ्यावा

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना घरच्या घरी देयक भरणा करण्याची सुविधा महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोपी व सुटसुटीत पद्धत असून, ग्राहकांनी अवलंब करणे गरजेचे आहे. ‘निसर्ग’ व ‘ताैक्ते’ वादळामुळे मोठा आर्थिक फटका महावितरणला बसला असून, सद्यस्थितीत वीजबिल न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा सुरू ठेवणे शक्य नसल्याने कारवाई करण्यात येणार आहे.

देवेंद्र सायनेकर, मुख्य अभियंता, महावितरण