शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

सेना, राष्ट्रवादीची झाकली मूठ?

By admin | Updated: October 18, 2015 23:58 IST

पालिका पोटनिवडणूक : किमान दोन जागा जिंकण्याचा खटाटोप!--रणसंग्राम

प्रकाश वराडकर- रत्नागिरी नगरपालिकेच्या ४ जागांसाठी १ नोव्हेंबरला होत असलेल्या पोटनिवडणुकीत चारही जागांवर बाजी मारण्याचा सेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र, किमान दोन जागा जिंकून झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवण्याचा खटाटोप सेना, राष्ट्रवादीकडून सुरू आहे. त्यावरच उमेश शेट्ये व उदय सामंत यांचे राजकीय वजन ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.गेल्या आठवडाभरात झालेला प्रचार पाहता राष्ट्रवादी व शिवसेना या दोन पक्षांमध्येच ही कडवी झूंज होत आहे. चारही जागा जिंकण्याचा दावा दोन्ही पक्षांकडून सुरुवातीपासून केला जात होता. प्रचाराच्या दोन फेऱ्या पूूर्ण झाल्यानंतर निवडणुकीत नेमके काय होणार, याचे चित्र काही प्रमाणात स्पष्ट होऊ लागले आहे. चारही जागा जिंकणे सोपे नाही, हे सेना व राष्ट्रवादीचे नेते खासगीत मान्य करीत आहेत. मात्र, दोन जागा तर जिंकाव्याच लागतील. त्यामुळेच तर झाकली मूठ सव्वा लाखाची राखता येईल, अशी रणनीती सेना, राष्ट्रवादीकडून अमलात आणली जात आहे. आधी सेनेत गेलेले उमेश शेट्ये पालिका पोटनिवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राष्ट्रवादीत परतले. त्यामुळे फार चर्चेत नसलेल्या पोटनिवडणुकीला कलाटणी मिळाली. त्यानंतर गेल्या आठवड्यात उमेश शेट्ये व मिलिंद कीर यांच्यातील कडवट व शेलक्या भाषेतील आरोप - प्रत्यारोपांनी राजकीय प्रचाराचे वातावरण ढवळून निघाले आहे. या आरोपांबाबत जनतेतही चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीत परतलेल्या उमेश शेट्ये यांना या पोटनिवडणुकीतील चारही जागा जिंंकून २०१६ची पालिका निवडणूक व २०१९ची विधानसभा निवडणूक यासाठी आपण प्रबळ दावेदार आहोत, हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना दाखवून द्यावे लागणार आहे. दुसरीकडे सेनेचे आमदार उदय सामंत यांच्यासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यांच्या मतदारसंघात होत असलेल्या या पोटनिवडणुकीतील चारही जागा जिंकण्यासाठी त्यांनी आपल्या शिलेदारांना कामाला लावले आहे. भारतीय जनता पक्षाकडून पोटनिवडणुकीसाठी छुपा प्रचार सुरू आहे. प्रचारात त्यांच्याकडून आक्रमकपणा अद्यापतरी दिसून आलेला नाही. या चार जागा जिंंकल्याने नगरपालिकेतील सत्तेचे गणित बदलणार नसले तरी भावी काळातील राजकीय स्थैर्याचा पाया मात्र या पोटनिवडणुकीने घातला जाणार आहे. या निवडणुकीतील यश हे या दोन्ही नेत्यांचे त्यांच्या पक्षातील वजन वाढविणारे आहे. त्यामुळेच प्रचाराला गती आली आहे. प्रथम चारही जागा राष्ट्रवादीच जिंकणार असे वातावरण उमेश शेट्ये यांनी निर्माण केले होते. प्रभाग २ मधून उमेश शेट्ये यांची सून कौसल्या शेट्ये ही निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे तेथील दोन जागा जिंकण्यासाठी उमेश शेट्ये जीवाचे रान करीत आहेत. परंतु या प्रभागात शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते प्रचार करताना दिसून येत असून, या दोन्ही जागांवर जिंकणारच, असा दावा तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी केला आहे. (प्रतिनिधी)काटों की टक्कररत्नागिरी नगर परिषद प्रभाग २ या महिला राखीव मतदारसंघातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी सेनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे याठिकाणी काटों की टक्कर रंगण्याची चिन्हे आहेत.चर्चा सुरु : साहेब आलेच नाहीत...!एका पक्षाच्या नेत्यांकडून प्रचाराची नवीन टॅक्ट वापरली जात आहे. आपल्या प्रभागातील प्रलंबित विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी साहेब आपल्याला भेटायला येणार आहेत, निरोप संबंधितांना फोनवरून दिला जात आहे. मात्र, साहेब आलेच नाहीत, अशी स्थिती अनेक ठिकाणी घडल्याची चर्चा आहे. फोन करणारेच चर्चेला येतात, सोबत उमेदवारांना आणतात. त्यांना मतदारांच्या पायावर लोटांगण घालायला लावतात व मतांचा जोगवा मागून मागे फिरतात. न बोलावताही भेटायला येणार, असे सांगून साहेब भेटायला येत नसल्याच्या या प्रकाराची चर्चा रत्नागिरीत आहे. उमेश शेट्ये-उदय सामंत यांची राजकीय वजनदारी ठरवणारी निवडणूक.राष्ट्रवादी-शिवसेनेत कडवी झुंज.भाजपकडून पोटनिवडणुकीसाठी छुपा प्रचार?