शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सेना - मनसेतच टक्कर

By admin | Updated: October 30, 2016 23:50 IST

खेड नगरपालिका : दुसऱ्यांदा होणाऱ्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरस

खेड : खेड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद हे इतर मागासवर्गीय उमेदवारासाठी आरक्षित झाल्याने मनसे व आघाडीच्यावतीने वैभव खेडेकर यांनी तर शिवसेनेच्यावतीने उद्योजक बिपीन पाटणे यांनी अर्ज भरला आहे़ पालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत असून, येथील दोन दिग्गजांमध्ये ही थेट निवडणूक होत असल्याने अवघ्या खेडवासीयांचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले आहे़ या लढतीमध्ये भाजपचे उमेदवार अ‍ॅड. मिलिंद जाडकर यांची झालेली ‘एंट्री’देखील महत्त्वाची ठरणार आहे. गेली १० वर्षे याठिकाणी महिला नगराध्यक्ष काम पाहत आहेत़ सन २००१मध्ये खेड पालिकेची निवडणूक काहीशी एकतर्फी झाली होती. थेट नगराध्यक्ष पदासाठीची ती पहिलीच निवडणूक होती़ त्यावेळी शिवसेनेच्या वैशाली कवळे या खेड पालिकेत पहिल्या थेट नगराध्यक्षा म्हणून विराजमान झाल्या होत्या. त्यानंतर २००५मधील पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा महिला आरक्षण पडले होते. यावेळी पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेला बहुमत मिळाले होते़ तर शिवसेना बॅकफूटवर गेली होती़ त्यावेळी पालिकेत प्रथमच मनसेपेक्षा जास्त नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आल्याने अगोदर ठरल्याप्रमाणे शुभांगी टाकळे या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. मात्र, राष्ट्रवादी व मनसेची सत्ता असतानाही मनसेचे २ नगरसेवक शिवसेनेचे रामदास कदम यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत दाखल झाले. यामुळे शिवसेना पुन्हा सत्तेत आली़ नगराध्यक्षा शुभांगी टाकळे यांच्या कामाबाबतही नागरिक समाधानी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे टाकळे यांना पदावरून दूर करण्याबाबत मनसे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्येही एकमत झाले होते़ याचाच परिणाम म्हणून खेड पालिकेत पुन्हा शिवसेनेची सत्ता आली़ त्यावेळी मनसेच्या २ नगरसेवकांनी शिवसेनेला सहकार्य केल्याने शिवसेनेच्या रईसा मुजावर या अडीच वर्षासाठी नगराध्यक्षपदी आरूढ झाल्या़ यानंतर २०११ मध्ये झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मनसेचे ९ नगरसेवक निवडून आल्याने पालिकेची सत्ता पुन्हा मनसेच्या हाती आली़ यावेळी मनसेचे ९, शिवसेना ७ व राष्ट्रवादी काँग्रेस १ असे बलाबल पालिकेत होते़ विद्यमान पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा २०१०मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गुहागर विधानसभा मतदार संघात पराभव झाल्याने काहीकाळ ते खेडमधील राजकारणापासून दुर राहिले़ खेड पालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी रस दाखविला नसल्याने आणि एकूणच राजकारणापासून ते अलिप्त राहिल्याने खेड पालिकेवरील शिवसेनेची पकड काहीशी सैल झाल्याचे दिसून आले. यामुळे मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत सत्ता स्थापनेपुरते का होईना यश मिळाले़ मनसेने पालिकेतील आपल्या ५ वर्षाच्या कार्यकालात काही चांगली विकासात्मक कामे केल्याचे नागरिकांमधून ऐकावयास मिळते. सध्या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या दोन्ही उमेदवारांच्या कामांचे मोजमाप झाल्यास या निवडणुकीत कोणता उमेदवार निवडून येईल, हे सांगणे अवघड आहे़ मनसेचे वैभव खेडेकर हे दूरदृष्टीपणा आणि राजकीय मुत्सद्देगिरी यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिले आहेत़ त्यांचे आकर्षक व्यक्तीमत्व अनेकांच्या चर्चेचा विषय बनले आहे़ शिवसेनेत असताना त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्षपद सांभाळत तत्कालिन आमदार रामदास कदम यांच्या सान्निध्यात राहून राजकीय धडे गिरवले आहेत. तसेच राजकारणात त्यांचा विशेष बोलबाला हा विकासाच्या कामातही राहिला आहे़ राज ठाकरे यांनी मनसे पक्षाची घोषणा केल्यानंतर वैभव खेडेकर यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश केला आणि वैभव खेडेकर यांची खरी राजकीय कारकीर्द सुरू झाली़ मनसेच्यावतीने शहर आणि तालुक्यातील विविध प्रश्न आणि समस्या घेऊन त्यांनी अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले. यावेळी वैभव खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अनेक गुन्हेदेखील दाखल झाले. नगरपालिकेतील सत्तापदाच्या काळात तर ते शहर विकासाबाबत सदैव जागरूक राहिले आहेत. तर अंतिम वर्षात त्यांनी काही लक्षात राहतील अशी विकासकामे पालिकेच्या माध्यमातून केली़ आहेत. यामध्ये रस्ते, गटारे आणि सांस्कृतिक भवनसारखी कामे आजही येथील नागरिकांच्या लक्षात राहिली आहेत. तसेच पथदीपासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प खेडेकर यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्णत्वास नेले आहेत. खेड शहरातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खेडेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह केलेले मदतकार्य व नगरपालिकेला स्वच्छतेकामी केलेले सहकार्य येथील नागरिकांच्या कायम लक्षात राहण्यासारखे आहे़ याचा लाभ त्यांना कितपत मिळतो हे निकालानंतर कळेल. (प्रतिनिधी) अखेरच्या क्षणी विकासकामे नगरपालिकेत सत्तास्थानी असलेल्या मनसेने सुरूवातीच्या चार वर्षात कामाचा वेग कमी ठेवला होता. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविण्यात आली होती. मात्र, अखेरच्या वर्षात सत्ताधाऱ्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही कामे करून पक्षाने जनमानसात आपले स्थान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्याचा उपयोग प्रत्यक्ष निवडणुकीत किती मिळतो, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मनसेने सत्तापदाच्या काळात केलेली ही कामे मतदानाच्या रूपाने पेटीत पडणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.