शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक
2
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले गुडघे
3
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
4
IND vs SA : सूर्यानं दुसऱ्यावरच दाखवला भरवसा; पांड्या म्हणाला, "मला काहीच फरक पडत नाही!"
5
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहनं रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
6
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात INDIA आघाडीचे महाभियोग अस्त्र; १२० खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव सादर
7
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
8
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
9
२६.६६ कोटींचा गंडा! बनावट स्टॉक स्कीमच्या जाळ्यात फसला व्यापारी; बँक कर्मचाऱ्यासह ७ जण अटकेत
10
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
11
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
12
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
13
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
14
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
15
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
16
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
17
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
18
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
19
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
20
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5

आखाडे यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:29 IST

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण भटक्या विमुक्त जाती जमाती आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी अ‍ॅड. नीलेश आखाडे यांची नियुक्ती करण्यात ...

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण भटक्या विमुक्त जाती जमाती आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी अ‍ॅड. नीलेश आखाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी पत्र देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. सर्वांना संघटित करून संघटना उभारणीबरोबरच विकास प्रक्रिया सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे आखाडे यांनी सांगितले.

वीजपुरवठा पूर्ववत करावा

रत्नागिरी : शहरातील किल्ले रत्नदुर्ग येथे जाणारा प्रमुख रस्ता श्रीराम मंदिर ते श्री हनुमानवाडी स्टॉपदरम्यान रहदारी मार्गावर एक जीर्ण झाड मोडून पडले होते. यामध्ये विजेचे दोन खांब निकामी झाले. यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला असून, ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमाकांत आयरे यांनी केली आहे.

पर्यावरण संवर्धन

रत्नागिरी : तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी कला व वाणिज्य महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पर्यावरण विभागातर्फे पर्यावरणातील बदल, वाढत जाणारे तापमान यांचा विचार करून नारळ, सुपारी रोपांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांना खाद्यान्न म्हणून सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प उभारला आहे.

शिमगोत्सव साधेपणाने

रत्नागिरी : जांभारी गावचा शिमगोत्सव कोरोनामुळे शासकीय नियमावलीचे पालन करून साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. ग्रामदैवत श्री भैरीची पालखी शिमगोत्सवात येते. मात्र यावेळी पालखी मांडावर पाडव्यापर्यंत ठेवण्यात येणार असून भाविकांनी गर्दी न करता दर्शनासाठी उपस्थित राहावे, असे सूचित केले आहे.

अधिकाऱ्यांची निवड

रत्नागिरी : आगामी शिमगोत्सव व रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर चार पोलीस अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या पोलीस स्थानकात तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. चारही अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रभारी अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ रिपोर्ट करून पूर्तता अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पालखी गावातच

दापोली : तालुक्यातील वागवे, कळंबट, सारंग यांच्यासह अनेक गावांच्या पालख्या इतर गावांमध्ये भेटीसाठी जातात. मात्र यावर्षी या पालख्या गावाबाहेर न नेण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनामुळे पालख्या वेस ओलांडून वेशीवरूनच मागे फिरणार आहेत व आपल्याच गावात राहणार आहे. त्यामुळे पालखी भेटीचा सोहळा यावर्षी रंगणार नाही.

गतिरोधक बसवावा

राजापूर : राजापूर धारतळे मार्गे नाटे रत्नागिरी मार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी वाहनचालक व ग्रामस्थांमधून होत आहे. या मार्गावरील अपघातांची संख्या वाढल्यानेच गतिरोधकांची मागणी जोर धरू लागली आहे. वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने अपघात वाढत आहेत.

आज वर्धापन दिन

गुहागर : तालुका अपंग पुनर्वसन संस्थेला दिनांक २५ मार्च रोजी १९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने वरवेली येथील संस्थेच्या कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, हळदी-कुंकू आदी कार्यक्रम होणार आहेत.